शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

दादा, गाठ बळिराजाशी...

By admin | Updated: October 17, 2015 00:18 IST

राजू शेट्टींचा सहकारमंत्र्यांना इशारा : शरद पवार गुरू नव्हे ‘भस्मासूर’ : सदाभाऊंचा हल्ला

कोल्हापूर : ‘एफआरपी’ कायद्यात दुरुस्ती करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी अभ्यास करून बोलावे. आमच्या वाट्याला येऊ नका; अन्यथा गाठ बळिराजाशी आहे, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला.‘स्वाभिमानी’च्यावतीने शुक्रवारी एकरकमी ‘एफआरपी’साठी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर विराट इशारा मोर्चा काढण्यात आला. त्यामध्ये खासदार शेट्टी व सदाभाऊ खोत यांनी सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा खरपूस समाचार घेतला. खासदार शेट्टी म्हणाले, एकरकमी ‘एफआरपी’बाबत सहकारमंत्र्यांनी चुकीचे वक्तव्य केले आहे. त्यांनी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन, अभ्यास करून बोलावे. सल्ला अनेकजण देतात, त्यामुळे नीट ऐकून बोला; अन्यथा घोटाळा होईल. तोंडाला येईल ते बोलू नका, गाठ बळिराजाशी आहे. राजू शेट्टी विष्णूचा अवतार आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना ‘एफआरपी’ देण्याचे काम त्यांनी करावे, असे सहकारमंत्री म्हणत आहेत, या वाक्याचा खरपूस समाचार घेत, मला विष्णू किंवा राक्षस म्हणा; पण दादा, शेतकऱ्यांच्या वाट्याला जाऊ नका; अन्यथा मला राक्षसासारखे वागावे लागेल, असा इशाराही शेट्टी यांनी दिला. ‘राजारामबापू’ने ‘एफआरपी’मधून १४३ रुपये, ‘छत्रपती-पुणे’ने १०० रुपये, ‘मोहनराव शिंदे’ने १४३ रुपये, ‘हुतात्मा’ने १०० रुपये कपात केली आहे. शेतकऱ्यांची सहमती न घेताच ही बेकायदेशीर कपात केली आहे. साखर जीवनावश्यक वस्तूमध्ये येत असल्याने ‘एफआरपी’शी छेडछाड केल्याने संबंधितांवर फौजदारी दाखल करा. तसेच संबंधित बॅँकांच्या व्यवस्थापकांवर कारवाई करण्यासाठी रिझर्व्ह बॅँकेकडे पाठपुरावा करणार असल्याचेही शेट्टी यांनी सांगितले. सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर थेट हल्ला चढवत सदाभाऊ खोत म्हणाले, आमचे सहकारमंत्री हे शरद पवार यांना आपले गुरू मानत आहेत. दादा, पवार गुरू नव्हेत, तर ‘भस्मासूर’ आहेत. शेतकऱ्यांना अडचणीत आणणारे तुमचे गुरू कसे होऊ शकतात? दादा, साखरसम्राटांना वटणीवर आणण्यासाठी राजू शेट्टींच्या हातात काठी द्या. मुख्यमंत्री ऐकत नाही म्हटल्यावर शरद पवार यांनी लॉबिंग सुरू केले आहे. त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घालवायचे आहे. दादा, पवार साहेबांच्या नादाला लागून शेतकऱ्यांना अंगावर घेऊ नका. आम्ही अनेकांचे जळण केले, याचे भान ठेवा, असा इशारा देत मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने राहावे. तुमच्या खुर्चीला धक्का लागणार नाही, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी) ंस्वाभिमानीचा मोर्चा : राष्ट्रवादी दिसणार नाही सोसायटीमधील लाख-दोन लाखांच्या घोटाळ्याबद्दल सहा महिने तुरुंगात जावे लागते; पण कोल्हापूर जिल्हा बॅँकेत दोनशे कोटींचा घोटाळा करणारे मोकाट सुटले आहेत. जिल्हा बॅँकेची चौकशी लावा. त्यांच्या बोलत्या बंद होतील. साखर कारखान्यांची विक्री कोणी केली, कोणी खरेदी केली, याची चौकशी केली, तर राष्ट्रवादीचे कसपटही राज्यात दिसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.