शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
2
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
3
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
4
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
5
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
6
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
7
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
8
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
9
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
10
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
11
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
12
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
13
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
14
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
15
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
16
रक्षाबंधन सणासाठी जाताना अपघात; आई-वडीलांच्या डोळ्यांदेखत चिमुकल्याचा मृत्यू, गडचिरोलीतील घटना
17
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
18
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
19
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
20
Monsoon Travel : कुर्ग की मुन्नार; पावसाळी पिकनिकसाठी कोणतं ठिकाण ठरेल बेस्ट?

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा

By admin | Updated: August 14, 2015 23:09 IST

मुख्यमंत्र्यांना निवेदन : ग्रामपंचायत करवसुली सुरू करण्याची मागणी; वसुली बंद असल्याने कर्मचाऱ्यांच्या पगारावर परिणाम

शिरोळ : न्यायालयीन निर्णयाचा आधार घेऊन शासनाने २८ हजार ग्रामपंचायतींना करवसुली करू नये, असे आदेश दिले आहेत. यामुळे ग्रामपंचायतींची करवसुली सध्या बंद आहे. याचा विपरीत परिणाम गावच्या सर्वांगीण विकासाबरोबर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या पगारावर होत आहे. शासनाने वेळीच हस्तक्षेप करून करवसुली सुरू करून कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्यावतीने काम बंद आंदोलन करण्याचा इशारा कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष गणपतराव गावडे यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील सर्वच ग्रामपंचायतींना कारभार करीत असताना तारेवरची कसरत करावी लागत असते. तुटपुंजे उत्पन्न व त्यावर नागरिकांना आवश्यक असणाऱ्या दिवाबत्ती, आरोग्य आणि पाणी या अत्यावश्यक सेवांचीही सोय करावी लागते. सर्व खर्च कर वसुलीतूनच करण्यात येतो. तसेच कर्मचाऱ्यांचा पगारही कर वसुली केल्यानंतर होतो. कर वसुली संदर्भात उच्च न्यायालयात कोणी एका व्यक्तीने याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने २८ हजार ग्रामपंचायतींना कर वसुली बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतींचा कारभार ठप्प झाला असून, ग्रामस्थांना सेवा पुरविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच २८ हजार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा पगारही थकला आहे. गेल्या चार महिन्यांपासून कर्मचारी वेतनाविना काम करीत आहेत. यामुळे कर्मचारी आर्थिक संकटात सापडला असून, उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. शासनाने कर्मचाऱ्यांची दखल घेऊन ग्रामपंचायतींना कर वसुलीस परवानगी द्यावी, अन्यथा संपूर्ण कर्मचारी संपावर जातील, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर राज्य उपाध्यक्ष गणपतराव गावडे, अध्यक्ष विलासराव कुमरवार, सरचिटणीस गिरीष दाभाडकर, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष आण्णासो कोळेकर, तालुकाध्यक्ष संदीप चुडमुंगे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (प्रतिनिधी)