शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
3
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
4
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
7
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
8
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
9
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
10
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
11
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
12
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
13
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
14
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
15
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
16
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
17
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
18
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
19
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
20
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

शासनाचे धोरण शेतकरी हिताचे नाही

By admin | Updated: October 24, 2015 00:27 IST

सतेज पाटील : डी. वाय. पाटील साखर कारखान्याच्या गळीत हंगामास प्रारंभ

गगनबावडा : केंद्र शासन साखर कारखान्यांना एफ.आर.पी.प्रमाणे ऊस बिले देणे बंधनकारक करते, पण त्याचवेळी साखरेचे दर वाढविण्यासाठी कोणतेही ठोस धोरण वेळेत ठरवत नाही. साखर उद्योगाच्या माध्यमातून हजारो कोटींचा कर शासनास मिळतो, पण राज्य व केंद्र शासनाचे धोरण साखर कारखाने व शेतकऱ्यांच्या हिताचे नाही. किमान एफ.आर.पी. देता येईल एवढी तरी भूमिका केंद्र शासनाने घेतली पाहिजे, असे मत कारखान्याचे अध्यक्ष व माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केले. ते पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याच्या १३ व्या गळीत हंगामाच्या प्रारंभप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत होते.सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत म्हणाले, डी. वाय. पाटील साखर कारखान्याच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ लाखाच्या जवळपास ऊस उत्पादन होत आहे. त्यामुळे कोकणातील लोकांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत झाली आहे. शेतकऱ्यांचे हित जोपासण्याचे काम या कारखान्याने केलेले असून त्यांच्या पाठीशी सिंधुदुर्ग जिल्हा बँक कायम खंबीररपणे उभी राहील.कारखान्याचे अध्यक्ष सतेज पाटील यांच्याहस्ते गव्हाणीत उसाची मोळी टाकून हंगामाचा प्रारंभ करण्यात आला. कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष संजय पाटील यांच्याहस्ते काटा पूजन करण्यात आले.कार्यक्रमास सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक प्रमोद धुरी, गुलाबराव चव्हाण, दिगंबर पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, करवीरच्या सभापती सुवर्णा बोटे, गगनबावड्याचे सभापती तानाजी पाटणकर, ‘गोकुळ’चे माजी संचालक बाबासो चौगले, बाजार समितीचे उपाध्यक्ष विलास साठे, आमदार पुष्पसेन सावंत, सज्जनकाका रावराणे, कारखान्याचे संचालक मानसिंग पाटील, दत्तात्रय पाटणकर, खंडेराव घाटगे, चंद्रकांत खानविलकर, बंडोपंत कोटकर, रवींद्र पाटील, रामचंद्र बोभाटे, बजरंग पाटील, बाजीराव शेळके, शामराव हंकारे, उदय देसाई यांच्यासह कारखाना कर्मचारी, शेतकरी सभासद व ऊसतोडणी वाहतूक, कंत्राटदार उपस्थित होते.प्रास्ताविक व स्वागत कार्यकारी संचालक जयदीप पाटील यांनी केले, तर संचालक मानसिंग पाटील यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)