शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

सरकारचा ‘बालसंगोपन’ योजनेला खो-अडीच वर्षे पैचे वाटप नाही । कोल्हापुरात होते सहाशे लाभार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 00:05 IST

अनाथ, निराधार मुलांसाठी कोणतीही निवासी संस्था ही कुटुंबाला पर्याय ठरू शकत नाही म्हणून मुलांचे संगोपन संस्थामध्ये होण्याऐवजी ते आईवडिलांच्या मायेच्या छत्राखालीच व्हावे या चांगल्या हेतूने सुरू झालेली बालसंगोपन योजना जवळपास बंदच पडली आहे. राज्यात या योजनेचे सुमारे १८ हजार लाभार्थी होते;

ठळक मुद्देअठरा वर्षांपर्यंतच्या मुलामुलींना दरमहा ४२५ रुपये याप्रमाणे हे अनुदान दिले जात होते.बालकल्याण संकुल संस्थेमार्फत ५० लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जात होता.

संडे अँकर ।   विश्वास पाटील ।कोल्हापूर : अनाथ, निराधार मुलांसाठी कोणतीही निवासी संस्था ही कुटुंबाला पर्याय ठरू शकत नाही म्हणून मुलांचे संगोपन संस्थामध्ये होण्याऐवजी ते आईवडिलांच्या मायेच्या छत्राखालीच व्हावे या चांगल्या हेतूने सुरू झालेली बालसंगोपन योजना जवळपास बंदच पडली आहे. राज्यात या योजनेचे सुमारे १८ हजार लाभार्थी होते; परंतु २०१६ पासून आपल्या कल्याणकारी मायबाप सरकारने या योजनेतून दिले जाणारे अनुदान बंद केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात या योजनेचे ६०० लाभार्थी होते. अठरा वर्षांपर्यंतच्या मुलामुलींना दरमहा ४२५ रुपये याप्रमाणे हे अनुदान दिले जात होते.

संयुक्त राष्ट्रसंघाची बालहक्क संहिता स्वीकारल्याने समाजातील सर्व बालकांना त्यांच्यासाठीचे हक्क मिळालेच पाहिजेत हे धोरण बंधनकारक आहे. तरीही बालकांच्या हक्कांची, प्राथमिक जबाबदारी ही त्या बालकाच्या जन्मदात्या, दत्तक किंवा फॉस्टर पालकांची असते. कोणत्याही बालकाची शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि भावनिक वाढ नैसर्गिकपणे कुटुंबामध्येच होत असते. या तत्त्वाला धक्का न लावता शासनाने पालकत्व स्वीकारणे अपेक्षित आहे. त्याचाच भाग म्हणून ही योजना राबविण्यात येत होती. त्याचा बालकांच्या संगोपनासाठी पालकांना हातभार लागत असे. परंतु गेल्या अडीच वर्षांपासून या योजनेचे अनुदानच सरकारने बंद केले आहे. मुळात या योजनेचा लाभ मिळवण्यास अर्ज करताना लाभार्थी बालकांच्या पालकांना वारेमाप खर्च करावा लागतो आणि अर्ज मात्र बालकल्याण कार्यालयात थप्पीला धूळ खात पडतात. सध्या जिल्हा कार्यालयाकडून नवीन अर्ज स्वीकारणेच बंद केले आहे. येथील आभास फाऊंडेशनने २०१२ मध्ये या योजनेतील गैरव्यवहारही उघडकीस आणले होते. येथील बालकल्याण संकुल संस्थेमार्फत ५० लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जात होता. परंतु त्यांनाही हा लाभ देण्यात अडचणी येत आहेत.यांना होता मोठा आधार...एक पालक असलेली व कौटुंबिक संघर्षात असलेली बालके, मृत्यू, घटस्फोट, विभक्तीकरण, परित्याग, अविवाहित मातृत्व, गंभीर आजार, पालक रुग्णालयात असणे, आदी कारणांमुळे विघटित कुटुंबांतील बालकांना योजनेचा मोठा आधार होता. रक्कम कमी होती; परंतु शैक्षणिक व वैद्यकीय खर्चासाठी तिची अल्पशी मदत होत असे. 

बालसंगोपनात उपयुक्त ठरणारी ही योजना सरकारने का बंद केली हेच समजत नाही. योजनेचे सरकारने सामाजिक लेखापरीक्षण करण्याची गरज आहे. बालगृहे म्हणजेच संस्थाधारित पुनर्वसन आणि बालसंगोपन योजनेसारख्या संस्थाबाह्य सुविधा यांचा अभ्यास होण्याची गरज आहे.- अतुल देसाई, बालकल्याणक्षेत्रातील अभ्यासू कार्यकर्ते

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgovernment schemeसरकारी योजना