शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

तंबाखू संघाच्या गतवैभवासाठी सरकार पाठीशी : चंद्रकांतदादांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 17:24 IST

कोल्हापूर : व्यक्तीप्रमाणे संस्थांच्या वाटचालीत चढउतार येत जातात; त्यातून मार्ग काढून जे पुढे जातात, तेच यशस्वी होतात. याप्रमाणे डॉ. संजय पाटील यांनी ‘तंबाखू’ संघाला पुन्हा उभारी आणण्याचा प्रयत्न केला असून, संघाच्या गतवैभवासाठी सरकार पाठीशी राहील, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.

ठळक मुद्दे तंबाखू संघ सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात स्मरणिकेचे प्रकाशन ‘अंबाबाई’बरोबर ‘महालक्ष्मी’ला साकडे‘शक्ती मिल’मधून कर्जमाफीएवढे पैसे‘आप्पा’,‘एस. के.’ नावांचा करिष्मा!

कोल्हापूर : व्यक्तीप्रमाणे संस्थांच्या वाटचालीत चढउतार येत जातात; त्यातून मार्ग काढून जे पुढे जातात, तेच यशस्वी होतात. याप्रमाणे डॉ. संजय पाटील यांनी ‘तंबाखू’ संघाला पुन्हा उभारी आणण्याचा प्रयत्न केला असून, संघाच्या गतवैभवासाठी सरकार पाठीशी राहील, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.

शेतकरी सहकारी तंबाखू संघाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त शनिवारी शाहू स्मारक भवन येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ‘तंबाखू संघा’च्या अधोगतीची कारणे शोधून बाहेर पडण्याच्या योजना शोधा. संस्थांच्या चौकशा कधीपासून प्रलंबित आहेत, याची माहिती द्या, असे सांगत मंत्री पाटील म्हणाले, आम्ही आतापर्यंत न्यायाच्या बाजूने उभे राहिलो आहोत; ‘तंबाखू संघ’, ‘मयूर’सह इतर संस्था ताकदीने सुरू करा, सरकारकडून लागेल ती मदत दिली जाईल.

सहकाराचा पाया खासगीकरणामुळे डळमळीत झाला असून, संस्था जागरूकपणे चालविणे गरजेचे असल्याचे सांगत खासदार धनंजय महाडिक म्हणाले, संजय पाटील यांनी ‘तंबाखू’ समूहाच्या माध्यमातून सहकार वाढविला; पण कदाचित राजकारणात आल्यामुळे त्यांच्यासमोर अडचणी निर्माण झाल्या. समाज बदलण्याची ताकद सहकारात असल्याने डॉ. पाटील यांनी संस्था पुन्हा सक्षम कराव्यात.

आमदार सुरेश हाळवणकर, आमदार उल्हास पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. शहाजी पाटील यांनी स्वागत केले. सुशांत पाटील यांनी आभार मानले. पाहुण्यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन व ज्येष्ठ संचालकांचा सत्कार करण्यात आला. कुरुंदवाडचे नगराध्यक्ष जयरामबापू पाटील, यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्ष हिंदुराव शेळके, बाबा देसाई, आदी उपस्थित होते.‘आप्पा’,‘एस. के.’ नावांचा करिष्मा!

जिल्ह्याच्या सामाजिक व राजकीय वाटचालीत ‘आप्पा’ (महादेवराव महाडिक) व ‘एस. के.’ (एस. के. पाटील) ही नावे प्रसिद्ध आहेत. या माणसांमुळे सामान्यांचे जीवन आनंदी होण्यास मदत झाल्याचे गौरवोद्गार मंत्री पाटील यांनी काढले.

‘शक्ती मिल’मधून कर्जमाफीएवढे पैसे

राज्यात अनेक प्रकरणे न्यायालयीन पातळीवर प्रलंबित आहेत. यासाठी मोठमोठ्या वकिलांची फौज घेऊनच आम्ही फिरत असून, मुंबईतील ‘शक्ती मिल’ सरकारच्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दोन महिन्यांत स्थगिती उठवू अन्यथा संबंधितांशी समझोता करू. यातून ३८ हजार कोटी उभा राहणार आहेत. आम्हाला कर्जमाफीसाठी ३४ हजार कोटी लागणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.

‘अंबाबाई’बरोबर ‘महालक्ष्मी’ला साकडे

तंबाखू संघाला गतवैभव मिळवून देण्यासाठी संजय पाटील यांना ‘अंबाबाई’नेच नव्हे तर ‘महालक्ष्मी’नेही ताकद द्यावी, असे समोर बसलेले वसंतराव मुळीक यांचा उल्लेख करीत मंत्री पाटील यांनी ‘अंबाबाई की महालक्ष्मी?’ या वादावर बोट ठेवल्याने सभागृहात एकच हशा पिकला.