शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा अन्यथा जलसमाधी घेणारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रुकडी माणगांव : महापुराने शेतकरीची वाताहात झाली असून हे आपत्कालीन संकट शासनास कळत नाही का? पूरग्रस्तांना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रुकडी माणगांव : महापुराने शेतकरीची वाताहात झाली असून हे आपत्कालीन संकट शासनास कळत नाही का? पूरग्रस्तांना तत्काळ मदत किती दिवसात देणार असा थेट सवाल माजी खासदार राजू शेट्टी यांनी रूकडी येथे आक्रोश शेतकऱ्यांचा परिक्रमा पंचगंगेचा या पदयात्राप्रसंगी केले.

रूकडी येथे अंबाबाई मंदिर मध्ये पदयात्रा आले असता तेथे सभेत रूपातंर झाले. शेट्टी म्हणाले, पंचगंगेचा पूर ओसरून सव्वा महिना झाला पण अद्यापही मदत मिळेना; मग तत्काळ मदत म्हणायची कशाला? केंद्र सरकारने आपत्कालीन मदतीसाठी निधी आयोगाची स्थापना केली. केंद्रीय अर्थमंत्री बजेट सादर करत असताना आपत्कालीन निधी या आयोगाकडे वर्ग करत असते. केंद्र सरकारने आपत्कालीन निधीमधून महाराष्ट्राला मदत अद्यापही दिलेला नाही. मग महाराष्ट्र भारताच्या बाहेर आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केले. पदयात्रेत जि.प. सदस्या वंदना मगदूम ,डॉ. पद्माराणी पाटील, अशोकराव माने, पं.स. सदस्य पिंटू मुरूमकर, संदीप कारंडे , माजी उपसभापती अरुण मगदूम, माजी सभापती राजेश पाटील,सरपंच राजू मगदूम, उपसरपंच अख्तर भालदार, जवाहरचे संचालक जिनगोंडा पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पाटील, रमेश कांबळे, जमीर मुजावर, महादेव कोळी , मुडशिंगीचे संतोष जाधव, ॲड. सुरेश पाटील, माजी उपसरपंच अमित भोसले, ग्रा.पं. सदस्य विजय पाटील शीतल देसाई ,अमित खोत, अभिनंदन खोत सामील होते

.............

पदयात्रा आवाडे गटाकडून हायजॅक

आक्रोश शेतकऱ्याचा परिक्रमा पंचगंगेचा ही यात्रा चोकाक येथे मुक्कामी आले असता यात्रेतील सहभागी कार्यकर्त्यांना जेवणापासून ते रूकडी येथून चिंचवाड येथे पोहचवूपर्यंत आवाडे गटाचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तीन-चार महिन्यांनंतर होणारे जि.प व पंचायत समितीचे इच्छुक उमेदवार या पदयात्रेला आवर्जून उपस्थित होते.