शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा अन्यथा जलसमाधी घेणारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रुकडी माणगांव : महापुराने शेतकरीची वाताहात झाली असून हे आपत्कालीन संकट शासनास कळत नाही का? पूरग्रस्तांना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रुकडी माणगांव : महापुराने शेतकरीची वाताहात झाली असून हे आपत्कालीन संकट शासनास कळत नाही का? पूरग्रस्तांना तत्काळ मदत किती दिवसात देणार असा थेट सवाल माजी खासदार राजू शेट्टी यांनी रूकडी येथे आक्रोश शेतकऱ्यांचा परिक्रमा पंचगंगेचा या पदयात्राप्रसंगी केले.

रूकडी येथे अंबाबाई मंदिर मध्ये पदयात्रा आले असता तेथे सभेत रूपातंर झाले. शेट्टी म्हणाले, पंचगंगेचा पूर ओसरून सव्वा महिना झाला पण अद्यापही मदत मिळेना; मग तत्काळ मदत म्हणायची कशाला? केंद्र सरकारने आपत्कालीन मदतीसाठी निधी आयोगाची स्थापना केली. केंद्रीय अर्थमंत्री बजेट सादर करत असताना आपत्कालीन निधी या आयोगाकडे वर्ग करत असते. केंद्र सरकारने आपत्कालीन निधीमधून महाराष्ट्राला मदत अद्यापही दिलेला नाही. मग महाराष्ट्र भारताच्या बाहेर आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केले. पदयात्रेत जि.प. सदस्या वंदना मगदूम ,डॉ. पद्माराणी पाटील, अशोकराव माने, पं.स. सदस्य पिंटू मुरूमकर, संदीप कारंडे , माजी उपसभापती अरुण मगदूम, माजी सभापती राजेश पाटील,सरपंच राजू मगदूम, उपसरपंच अख्तर भालदार, जवाहरचे संचालक जिनगोंडा पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पाटील, रमेश कांबळे, जमीर मुजावर, महादेव कोळी , मुडशिंगीचे संतोष जाधव, ॲड. सुरेश पाटील, माजी उपसरपंच अमित भोसले, ग्रा.पं. सदस्य विजय पाटील शीतल देसाई ,अमित खोत, अभिनंदन खोत सामील होते

.............

पदयात्रा आवाडे गटाकडून हायजॅक

आक्रोश शेतकऱ्याचा परिक्रमा पंचगंगेचा ही यात्रा चोकाक येथे मुक्कामी आले असता यात्रेतील सहभागी कार्यकर्त्यांना जेवणापासून ते रूकडी येथून चिंचवाड येथे पोहचवूपर्यंत आवाडे गटाचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तीन-चार महिन्यांनंतर होणारे जि.प व पंचायत समितीचे इच्छुक उमेदवार या पदयात्रेला आवर्जून उपस्थित होते.