शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

शासनाने नवीन मराठा आरक्षण कायदा संमत करावा

By admin | Updated: December 19, 2014 23:27 IST

महत्त्वपूर्ण ठराव : कोल्हापुरातील ज्येष्ठ मराठा आमसभा, समाज आचारसंहितेच्या पालन करण्याचे आवाहन

कोल्हापूर : मराठा आरक्षणास सर्वपक्षीय संमती असल्याने यामधील त्रुटी दूर कराव्यात. पुन्हा टिकाऊ आरक्षणासाठी राज्य शासनाने न्यायालयात दाद मागावी, तसेच प्रसंगी कायद्यात बदल करून नवीन मराठा आरक्षण कायदा संमत करून घ्यावा, असा महत्त्वपूर्ण ठराव आज, शुक्रवारी कोल्हापुरात झालेल्या ज्येष्ठ मराठा आमसभेत संमत करण्यात आला. मराठा समाजाने आदर्श आचारसंहितेचे पालन करून विवाहातील बडेजाव टाळा, अनाठायी खर्चास फाटा द्या, सामुदायिक विवाहांना प्रोत्साहन द्या, असे प्रबोधनपर आवाहनही यावेळी करण्यात आले.राजर्षी शाहू स्मारक भवनात अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे ज्येष्ठ मराठा आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख उपस्थिती जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांची होती.यावेळी महत्त्वपूर्ण ठराव करण्यात आले. राज्य शासनाची मराठा आरक्षण याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्याने मूठभर सबळ मराठे वगळता ९० टक्के गरीब मराठ्यांवर दूरगामी परिणाम होणार आहे, तरी शासनाने संपूर्ण मराठा समाजाचा सर्व्हे करावा. मराठा आरक्षणास सर्वपक्षीय संमती असल्याने आरक्षणातील त्रुटी दूर करून पुन्हा टिकाऊ आरक्षणासाठी राज्य शासनाने न्यायालयात दाद मागावी प्रसंगी कायद्यात बदल करून नवीन मराठा आरक्षण कायदा संमत करून घ्यावा. समाजाच्या उन्नती आणि प्रगतीसाठी विज्ञाननिष्ठ आदर्श मराठा आचारसंहितेवर सखोल चर्चा होऊन ज्येष्ठांच्या सूचनेनुसार एकत्रित करण्यात आलेली आचारसंहितेला मान्यता देण्यात आली. प्रबोधनासह कर्मयोगावर अवलंबून राहून ‘प्रगतशील मराठा व उद्योगशील मराठा घडविण्यासाठी प्रयत्न करणे असे महत्त्वपूर्ण ठराव यावेळी संमत करण्यात आले. वसंतराव मुळीक यांनी मराठा आदर्श आचारसंहितेची सविस्तर माहिती दिली. यावेळी या आचारसंहितेचे आचरण केलेल्या दीपा डोणे, शैलजा भोसले, पंडित कंदले, भीमराव कोेतेकर, संभाजीराव जगदाळे, उमेश सूर्यवंशी यांच्यासह प्रभाकर आरडे, डॉ. डी. बी. चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी डॉ. शिवाजीराव हिलगे, शंकरराव शेळके, महादेवराव जाधव, विजय कदम, बाबासाो तिबिले, शैलजा भोसले, अनुराधा घोरपडे, अवधूत पाटील, डॉ. संदीप पाटील, अशोक देशमुख, शाहीर दिलीप सावंत, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)मराठा समाज आदर्श आचारसंहिता अशीछत्रपती शिवरायांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करावीमराठा संस्कृती टिकविण्यासाठी प्रयत्न करणे, समाज संस्कार करणेविवाह ठरविताना ९६ कुळीचा बाऊ करू नका, कर्तृत्वाला महत्त्व द्या, जन्मकुंडलीचा सांगोपांग विचार करून कालबाह्ण रूढी झुगारून द्या. विज्ञानाची कास धरून रक्तगट तपासणी व्हावी, विवाहपूर्व एचआयव्ही तपासणी व्हावी.समाजाच्या पूर्वजांची व वीरतेची कुलदैवते, कुलस्वामिनी (उदा. जोतिबा, खंडोबा, तुळजाभवानी आदी.)व्यक्तीच्या मृत्यूनंतर अनावश्यक रूढी व प्रदर्शन थांबवावे. बारा दिवसांचा दुखवट्याचा कार्यकाळ कमी करून तो ५ ते ७ दिवस करावा. दिवस कार्याला पाहुण्यांना भेटवस्तू देण्याची प्रथा बंद करावी.रक्षाविसर्जन करताना एक कलश रक्षा नदीमध्ये विसर्जन करून उर्वरित रक्षा कुंडात अथवा शेतामध्ये पसरावी.