शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
4
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
5
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
7
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
8
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
9
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
10
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
11
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
12
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
13
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
14
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
15
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
16
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
17
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
18
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
19
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
20
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर

शासनाने नवीन मराठा आरक्षण कायदा संमत करावा

By admin | Updated: December 19, 2014 23:27 IST

महत्त्वपूर्ण ठराव : कोल्हापुरातील ज्येष्ठ मराठा आमसभा, समाज आचारसंहितेच्या पालन करण्याचे आवाहन

कोल्हापूर : मराठा आरक्षणास सर्वपक्षीय संमती असल्याने यामधील त्रुटी दूर कराव्यात. पुन्हा टिकाऊ आरक्षणासाठी राज्य शासनाने न्यायालयात दाद मागावी, तसेच प्रसंगी कायद्यात बदल करून नवीन मराठा आरक्षण कायदा संमत करून घ्यावा, असा महत्त्वपूर्ण ठराव आज, शुक्रवारी कोल्हापुरात झालेल्या ज्येष्ठ मराठा आमसभेत संमत करण्यात आला. मराठा समाजाने आदर्श आचारसंहितेचे पालन करून विवाहातील बडेजाव टाळा, अनाठायी खर्चास फाटा द्या, सामुदायिक विवाहांना प्रोत्साहन द्या, असे प्रबोधनपर आवाहनही यावेळी करण्यात आले.राजर्षी शाहू स्मारक भवनात अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे ज्येष्ठ मराठा आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख उपस्थिती जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांची होती.यावेळी महत्त्वपूर्ण ठराव करण्यात आले. राज्य शासनाची मराठा आरक्षण याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्याने मूठभर सबळ मराठे वगळता ९० टक्के गरीब मराठ्यांवर दूरगामी परिणाम होणार आहे, तरी शासनाने संपूर्ण मराठा समाजाचा सर्व्हे करावा. मराठा आरक्षणास सर्वपक्षीय संमती असल्याने आरक्षणातील त्रुटी दूर करून पुन्हा टिकाऊ आरक्षणासाठी राज्य शासनाने न्यायालयात दाद मागावी प्रसंगी कायद्यात बदल करून नवीन मराठा आरक्षण कायदा संमत करून घ्यावा. समाजाच्या उन्नती आणि प्रगतीसाठी विज्ञाननिष्ठ आदर्श मराठा आचारसंहितेवर सखोल चर्चा होऊन ज्येष्ठांच्या सूचनेनुसार एकत्रित करण्यात आलेली आचारसंहितेला मान्यता देण्यात आली. प्रबोधनासह कर्मयोगावर अवलंबून राहून ‘प्रगतशील मराठा व उद्योगशील मराठा घडविण्यासाठी प्रयत्न करणे असे महत्त्वपूर्ण ठराव यावेळी संमत करण्यात आले. वसंतराव मुळीक यांनी मराठा आदर्श आचारसंहितेची सविस्तर माहिती दिली. यावेळी या आचारसंहितेचे आचरण केलेल्या दीपा डोणे, शैलजा भोसले, पंडित कंदले, भीमराव कोेतेकर, संभाजीराव जगदाळे, उमेश सूर्यवंशी यांच्यासह प्रभाकर आरडे, डॉ. डी. बी. चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी डॉ. शिवाजीराव हिलगे, शंकरराव शेळके, महादेवराव जाधव, विजय कदम, बाबासाो तिबिले, शैलजा भोसले, अनुराधा घोरपडे, अवधूत पाटील, डॉ. संदीप पाटील, अशोक देशमुख, शाहीर दिलीप सावंत, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)मराठा समाज आदर्श आचारसंहिता अशीछत्रपती शिवरायांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करावीमराठा संस्कृती टिकविण्यासाठी प्रयत्न करणे, समाज संस्कार करणेविवाह ठरविताना ९६ कुळीचा बाऊ करू नका, कर्तृत्वाला महत्त्व द्या, जन्मकुंडलीचा सांगोपांग विचार करून कालबाह्ण रूढी झुगारून द्या. विज्ञानाची कास धरून रक्तगट तपासणी व्हावी, विवाहपूर्व एचआयव्ही तपासणी व्हावी.समाजाच्या पूर्वजांची व वीरतेची कुलदैवते, कुलस्वामिनी (उदा. जोतिबा, खंडोबा, तुळजाभवानी आदी.)व्यक्तीच्या मृत्यूनंतर अनावश्यक रूढी व प्रदर्शन थांबवावे. बारा दिवसांचा दुखवट्याचा कार्यकाळ कमी करून तो ५ ते ७ दिवस करावा. दिवस कार्याला पाहुण्यांना भेटवस्तू देण्याची प्रथा बंद करावी.रक्षाविसर्जन करताना एक कलश रक्षा नदीमध्ये विसर्जन करून उर्वरित रक्षा कुंडात अथवा शेतामध्ये पसरावी.