शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

सरकारी कर्मचारी होणार पोलिसांचे पंच

By admin | Updated: July 28, 2015 22:03 IST

फितुरी टाळण्यासाठी गृहविभागाचा उपाय

गिरीश परब - सिंधुदुर्गनगरी -गुन्ह्यांमध्ये घटनास्थळांचा पंचनामा करणारे न्यायालयात सुनावणीवेळी फितूर होतात. त्यामुळे राज्याच्या गृहविभागाने पंचनाम्याच्या कामी सरकारी कर्मचाऱ्यांना नेमण्याचा आदेश काढला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मन:स्तापात मात्र भर पडणार आहे. खून, बलात्कार, दरोडे यासारख्या मोठ्या गुन्ह्यांमध्ये पंच म्हणून सरकारी कर्मचारी राहणार असल्याने न्यायालयाच्या खेटा घालाव्या लागणार आहेत.गुन्हा घडल्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा तपासी अधिकारी करतात. पंचनाम्यावेळी उपस्थित पंचाची साक्ष खटल्याच्या सुनावणीदरम्यान महत्त्वाची ठरते. गुन्हा घडल्यानंतर खटला सुनावणीसाठी घेण्याकरिता काही प्रकरणामध्ये बराच कालावधी उलटून गेलेला असतो. तपासी अधिकाऱ्याने तत्कालीन परिस्थितीत उपस्थित केलेले पंच सुनावणीदरम्यान प्रामाणिक राहतील याची खात्री नसते. ऐनवेळी पंच फितूर होत असल्यामुळे बऱ्याचशा गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी निर्दोष सुटतात. त्यामुळे दोषारोप सिद्ध होऊन गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण घटत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे गुन्ह्यांच्या तपासादरम्यान पंच म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांची सेवा घेतल्यास सुनावणी दरम्यान पंच फितूर होण्याची शक्यता फार कमी राहणार असल्याचे गृह विभागाचे म्हणणे आहे. परिसरातील सरकारी कर्मचारीखटल्याची सुनावणी होणाऱ्या परिसरात वास्तव्य असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यास पंच म्हणून घेता येणार आहे. जेणेकरून खटल्याच्या सुनावणीदरम्यान संबंधित पंचास उपस्थित राहणे सुलभ होणार आहे. शिक्षकांनाही घेणारइतर शासकीय कर्मचाऱ्यांसह शिक्षकही पंच म्हणून ठेवण्यात येणार आहेत. अशैक्षणिक कामांचा बोजा वाहणाऱ्या शिक्षकांच्या कामात भरच पडणार असल्याने या आदेशामुळे शिक्षकवर्गासह इतरही सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे.