शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
4
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
5
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
6
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
7
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
10
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
11
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
12
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
13
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
14
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
15
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
16
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
20
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान

शासनाने साखर उद्योग वाचवावा

By admin | Updated: April 4, 2015 00:15 IST

चंद्रदीप नरके : ‘कुंभी-कासारी’च्या ५२व्या गळीत हंगामाची सांगता

कोपार्डे : साखरेचे दर दिवसेंदिवस गडगडत असल्याने संपूर्ण साखर कारखानदारीच आर्थिक अरिष्टात सापडली आहे. या उद्योगाला सावरण्याची शासनाची संपूर्ण जबाबदारी असून, ही परिस्थिती अशीच सुरू राहिली, तर पुढील हंगामात साखर कारखाने सुरूच होणार नाहीत, अशी भीती कुंभी-कासारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार चंद्रदीप नरके यांनी व्यक्त केली. ‘कुंभी-कासारी’चा ५२ वा गळीत हंगाम नुकताच झाला. या हंगामाचा सांगता समारंभ कारखान्याचे संचालक बळवंत पाटील (वरणगे पाडळी) व त्यांच्या सुविद्य पत्नी लीलाताई यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पत्रकारांशी बोलताना आ. चंद्रदीप नरके म्हणाले, या हंगामात कुंभी कारखान्याने १३६ दिवसांत १३.०१ च्या सरासरी उताऱ्याने सहा लाख २० हजार ९०८ मे. टन उसाचे गाळप केले असून, आठ लाख नऊ हजार ३४० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. यावेळी कारखान्याचे संचालक, सभासद, आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, गेले पाच दिवस कुंभी-कासारी बचाव मंचच्यावतीने ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. बचाव मंचच्या ठिय्या आंदोलनाला आ. नरके यांनी सर्व संचालकांसमवेत भेट देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. आ. नरके यांनी शासनाची येत्या मंगळवारी मदतीची कोणती भूमिका होणार यावरच सर्व अवलंबून असल्याचे सांगत, आपण जाहीर केलेला २६४० रुपये दर देण्याची जबाबदारी आपली असल्याचे सांगतिले. मात्र, बचाव मंचने ही भूमिका अमान्य करून ठिय्या आंदोलन पुढे सुरू ठेवणार असल्याचा निर्णय जाहीर केला.