शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शासनाने साखर उद्योग वाचवावा

By admin | Updated: April 4, 2015 00:15 IST

चंद्रदीप नरके : ‘कुंभी-कासारी’च्या ५२व्या गळीत हंगामाची सांगता

कोपार्डे : साखरेचे दर दिवसेंदिवस गडगडत असल्याने संपूर्ण साखर कारखानदारीच आर्थिक अरिष्टात सापडली आहे. या उद्योगाला सावरण्याची शासनाची संपूर्ण जबाबदारी असून, ही परिस्थिती अशीच सुरू राहिली, तर पुढील हंगामात साखर कारखाने सुरूच होणार नाहीत, अशी भीती कुंभी-कासारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार चंद्रदीप नरके यांनी व्यक्त केली. ‘कुंभी-कासारी’चा ५२ वा गळीत हंगाम नुकताच झाला. या हंगामाचा सांगता समारंभ कारखान्याचे संचालक बळवंत पाटील (वरणगे पाडळी) व त्यांच्या सुविद्य पत्नी लीलाताई यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पत्रकारांशी बोलताना आ. चंद्रदीप नरके म्हणाले, या हंगामात कुंभी कारखान्याने १३६ दिवसांत १३.०१ च्या सरासरी उताऱ्याने सहा लाख २० हजार ९०८ मे. टन उसाचे गाळप केले असून, आठ लाख नऊ हजार ३४० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. यावेळी कारखान्याचे संचालक, सभासद, आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, गेले पाच दिवस कुंभी-कासारी बचाव मंचच्यावतीने ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. बचाव मंचच्या ठिय्या आंदोलनाला आ. नरके यांनी सर्व संचालकांसमवेत भेट देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. आ. नरके यांनी शासनाची येत्या मंगळवारी मदतीची कोणती भूमिका होणार यावरच सर्व अवलंबून असल्याचे सांगत, आपण जाहीर केलेला २६४० रुपये दर देण्याची जबाबदारी आपली असल्याचे सांगतिले. मात्र, बचाव मंचने ही भूमिका अमान्य करून ठिय्या आंदोलन पुढे सुरू ठेवणार असल्याचा निर्णय जाहीर केला.