शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

सरकारने आमिषे दाखवून मराठा संघटना दाबल्या : सुरेश पाटील यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 01:32 IST

कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यातील संघटना गप्प आहेत. एकालाही दौरा काढून समाजाची म्हणणे ऐकून घेण्याची गरज वाटत नाही.

ठळक मुद्देआरक्षणाच्या लढ्याची दिशा ठरविण्यासाठी १२ मार्चला कोल्हापुरात गोलमेज परिषदआरक्षणासह समाजाच्या मागण्यांसाठी प्रसंगी मंत्र्यांच्या गाड्याही फोडू.

कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यातील संघटना गप्प आहेत. एकालाही दौरा काढून समाजाची म्हणणे ऐकून घेण्याची गरज वाटत नाही. या संघटनांना सरकारने विविध आमिषे दाखवून दाबण्याचे काम केले आहे, असा आरोप मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी शनिवारी येथे केला. आरक्षणासाठी पुन्हा एकदा आंदोलन उभारण्याची गरज असून १२ मार्चला कोल्हापुरात राज्यातील १७ संघटनांची गोलमेज परिषद घेऊन रणशिंग फुंकूया असेही त्यांनी जाहीर के ले.

शाहू स्मारक भवनात मराठा संघटनेतर्फे मराठा आरक्षणाच्या लढ्यासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मराठा संघटनेचे अध्यक्ष बाळ घाटगे होते.छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू सावंत, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील, अ‍ॅड. सुरेश कुराडे, श्रीकांत भोसले, किशोर घाटगे आदींची प्रमुख उपस्थिती होती.सुरेश पाटील म्हणाले, मराठा समाजातील मुला-मुलींना नोकरी व शिक्षणात आरक्षण द्यावे, अरबी समुद्रात छत्रपती शिवरायांचे स्मारक करावे व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे बजेट ५००० कोटी रुपये करून हे महामंडळ फक्त मराठा समाजापुरते सीमित करावे या तीन मागण्यांसासाठी लढा सुरु आहे. सरकारने या मागण्यांबाबत कोणताही निर्णय न घेता समाजाची फसगत केली आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अनेक संघटनांसोबत अनेक बैठका घेतल्या, पण समाजाच्या पदरात काहीच पडले नाही.

बाळ घाटगे म्हणाले, मराठ्यांची चळवळ मोडून काढण्याचे काम मुख्यमंत्री फडणवीस करत असल्याचा आरोप केला. लाखोंच्या संख्येने मोर्चे निघूनही त्याची दखल घेतलेली नाही. पूर्वीच्या कॉँग्रेस-राष्टÑवादीच्या सरकारने केले तेच हे सरकार करत असल्याची टीकाही त्यांनी केली. जे या सरकारमध्ये आहेत पण समाजाच्या प्रश्नावर काहीच करत नाहीत, अशा आमदारांच्या विरोधात काहीतरी भूमिका घ्यावी लागेल.

राजू सावंत म्हणाले, मराठा समाजाच्या १९ प्रश्नांच्या निवेदनाबाबत सरकारने काय केले ते जाहीर करावे. आता समाजाला रस्त्यावरची लढाई लढावी लागेल. आरक्षणासह समाजाच्या मागण्यांसाठी प्रसंगी मंत्र्यांच्या गाड्याही फोडू.प्रा. मधुकर पाटील म्हणाले, मराठा समाजाच्या प्रश्नाकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे येणाºया काळात कायदा सुव्यवस्था बिघडली तर याची जबाबदारी मुख्यमंत्री व महसूलमंत्र्यांवर राहील.यावेळी रयत क्रांती संघटनेचे शहराध्यक्ष परेश भोसले, संतोष कांदेकर, प्रताप साळोखे, शिवाजी पाटील, आदी उपस्थित होते.शैक्षणिक वर्षात मराठा मुला-मुलींची फी भरामराठा आरक्षण कधी देणार याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा; तसेच येणाºया शैक्षणिक वर्षात मराठा समाजातील मुला-मुलींची वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठीची फी सरकारने भरावी, असे आवाहन सुरेश पाटील यांनी केले.चिंंगारी कोल्हापुरातूनमराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही. राज्यातील १७ संघटनांना एकत्र करून या आंदोलनाची चिंगारी कोल्हापुरातून पेटवूया, असे आवाहन सुरेश पाटील यांनी केले.पुढील अधिवेशन होऊ देणार नाहीअधिवेशनात मराठा आरक्षणाबाबत सरकारने निर्णय घेतला नाही तर पुढील अधिवेशन होऊ देणार नाही, असा इशारा बाळ घाटगे यांंनी दिला.आमदारांना डांबणारया अधिवेशनामध्ये मराठा समाजाच्या मागण्यांबाबत आमदारांनी आवाज उठविला नाही तर त्यांना पुढील अधिवेशनाला उपस्थित राहू देणार नाही. त्यांना घरातच डांबून ठेवून घराभोवती गराडा घालू, असा इशारा घाटगे यांनी दिला.पालकमंत्र्यांनी एकदाही बैठक घेतली नाहीमराठा आरक्षणासंदर्भात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एकदाही बैठक घेतलेली नाही. चर्चा सुरू असल्याचे ते सांगतात; पण निर्णय काही होतनाही, असा टोलाही घाटगे यांनी लगावला.मंत्र्यांवर जबाबदारीआरक्षणाबाबत या अधिवेशनामध्ये सरकारने ठोस निर्णय न घेतल्यास समाजाचा प्रक्षोभ वाढेल. त्याची सर्वस्वी जबाबदारी मराठा आरक्षण समन्वय समितीचे अध्यक्ष महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची राहील, असे घाटगे यांनी सांगितले.