शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

शिक्षक मागण्यांबाबत सरकार सकारात्मक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 01:03 IST

कोल्हापूर : प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न, मागण्यांची सरकारला जाण आहे. काही व्यावहारिक अडचणींमुळे त्यांच्या पूर्ततेला विलंब होत आहे. मात्र, सरकार सकारात्मक असून, या मागण्यांची पूर्तता केली जाईल. याबाबत मुख्यमंत्री, ग्रामविकासमंत्री यांच्यासमवेत महासंघाच्या शिष्टमंडळाची बैठक मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी येथे दिली.अखिल भारतीय प्राथमिक ...

कोल्हापूर : प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न, मागण्यांची सरकारला जाण आहे. काही व्यावहारिक अडचणींमुळे त्यांच्या पूर्ततेला विलंब होत आहे. मात्र, सरकार सकारात्मक असून, या मागण्यांची पूर्तता केली जाईल. याबाबत मुख्यमंत्री, ग्रामविकासमंत्री यांच्यासमवेत महासंघाच्या शिष्टमंडळाची बैठक मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी येथे दिली.अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघ संलग्न राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या महामंडळ सभेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मार्केट यार्ड येथील छत्रपती शाहू सांस्कृतिक सभागृहातील या कार्यक्रमास अध्यक्ष शिवाजीराव पाटील प्रमुख उपस्थित होते.पालकमंत्री पाटील म्हणाले, कर्जमाफीमुळे सरकारने मोठा आर्थिक भार उचलला आहे. त्यामुळे राज्याची आर्थिक घडी थोडी विस्कटली आहे. कर्ज घेण्यासह ती फेडण्याची क्षमता सरकारमध्ये आहे. त्यामुळे सातवा वेतन आयोग उशिरा लागू केला, तरी शिक्षकांचे नुकसान सरकार होऊ देणार नाही. एमएससीआयटीबाबत मुदतवाढ , महापालिकेच्या शाळेतील शिक्षकांना सरकारने वेतन देणे, आदींवर सकारात्मक कार्यवाही होण्याबाबत प्रयत्न केला जाईल.या कार्यक्रमात सेवानिवृत्तीबद्दल संघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरुटे यांचा आणि नूतन जिल्हाध्यक्ष संभाजी बापट यांचा पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते सत्कार केला.यावेळी मोहन भोसले, माधवराव पाटील, बाळासाहेब काळे, लायक पटेल, उत्तम सुतार, मारुती गुरव, वसंत जाधव, शशिकला वरुटे, दि. स. भालतडक, मधुकर काठोळे, नामदेव रेपे, अरुण पाटील, वसंतराव हारुगडे, विजय बहाकर, राहुल चिकोडे आदी उपस्थित होते. संभाजी बापट यांनी प्रास्ताविक केले.राज्यातील शिक्षकांमध्ये मोठी खदखदकार्यक्रमात महासंघाचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी विविध मागण्या मांडल्या. ते म्हणाले, राज्यातील तीन लाख प्राथमिक शिक्षकांपैकी अडीच लाख शिक्षक हे महासंघाचे सभासद आहेत. मुख्यमंत्र्यांनी वेळ द्यावा, अडीच लाख शिक्षक एकाच ठिकाणी आणतो. बदलीमुळे शिक्षक हैराण झाले आहेत. त्यामुळे तालुकाअंतर्गत बदल्या कराव्यात. जुनी पेन्शन पूर्ववत सुरू करा. ‘एमएससीआयटी’ पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ द्या. सातवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा करा. खेड्यापाड्यातील शाळा बंद करू नका. राज्यातील शिक्षकांमध्ये मोठी खदखद असून, ती दूर करण्यासाठी प्रश्नांची निर्गत करा. ती केल्यास आम्ही तुम्हाला बळ देऊ. मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी महासंघाच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घ्यावी.