शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

योजना हजार, अधिकारी मात्र बेजार; लागोपाठच्या व्हीसी, प्रत्यक्ष बैठका, अहवाल अन् आढावा

By समीर देशपांडे | Updated: September 18, 2024 15:50 IST

जिल्हाधिकारी २२५ समित्यांचे अध्यक्ष

समीर देशपांडेकोल्हापूर : लागोपाठ लागणाऱ्या जिल्हा, विभागीय, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील व्हिडीओ कॉन्स्फरिंगच्या बैठका, स्थानिक कार्यालये आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयातील बैठका या सगळ्या बैठकांसाठी तयार करण्याचे अहवाल, ज्या त्या विभागाचा आढावा आणि ऑनलाइन भरावयाची माहिती यामुळे शासकीय अधिकारी आणि कर्मचारी अक्षरश: बेजार झाले आहेत. निवडणूक जवळ येईल तसे महाराष्ट्रात तर ‘योजनांचा पूर आणि बैठकांतून धूर’ निघत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर सरकार गतिमान पद्धतीने चालवले जात हे दाखवण्यासाठी अनेक योजना आखण्यात आल्या. आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर लाभ उठवत या सरकारने युद्धपातळीवर योजना राबवण्याचे उद्दिष्ट ठेवल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांची मात्र तहानभूक हरपली आहे. सद्य जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त, महिला बालकल्याण विभागाचे अधिकारी यांना दिवस कधी उजाडतो आणि मावळतो हे कळेनासे झाले आहे. या सगळ्यांवरचा भार मग खाली झिरपत जाऊन त्यांच्या हाताखालच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही कामासाठी वेळ अपुरा पडायला सुरुवात झाली आहे.‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना सुरू होऊन महिना होऊन गेला. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राबविण्यात आलेल्या या योजनेत अधिकाधिक महिलांची नोंदणी करण्यासाठी अंगणवाडीसेविकांपासून सर्वांनाच कामाला लावण्यात आले. परिणामी राज्यभरातून कोट्यवधी महिला लाभधारक बनल्या. परंतु ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सर्वांनाच रात्रीचा दिवस करावा लागला. आपापल्या विभागाचे दैनंदिन कामकाज, सर्व बैठका, त्यातून समोर येणारे प्रश्न, त्याची निर्गत, शासनाच्या येणाऱ्या सुधारित सूचना यातच हे अधिकारी अडकून पडले आहेत.

विधानसभेला लाभ उडविण्याचे नियोजन‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रे योजना’, लोकशाही दिन, विविध केंद्रीय आणि राज्यातील मंत्र्यांचे दौरे, गणेशोत्सवाचा बंदोबस्त, रस्त्यांची दुरुस्ती, त्यासाठीची आंदोलने, ‘मुख्यमंत्री योजनादूत’, मतदार याद्यांचा कार्यक्रम, विधानसभा निवडणुकीची तयारी, आयटीआयमध्ये उभारण्यात आलेली संविधान मंदिरे, ‘स्वच्छता ही सेवा योजना’, पूरस्थितीवर देखरेख, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, वयोश्री योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, प्रधानमंत्री सूर्यघर योजना, पंतप्रधान आवास योजना अशा सारख्या योजना युद्धपातळीवर राबविण्यात येत असून, याचा लाभ विधानसभेसाठी उठवण्याचे नियोजन सत्ताधाऱ्यांनी केले आहे.

अधिकाऱ्यांची कुचंबणासाहेब व्ही. सी.मध्ये आहेत. बघावे तेव्हा प्रमुख अधिकारी प्रत्यक्ष बैठक किंवा व्हीसीमध्येच असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे भेटायला आलेले अभ्यागतही वैतागत आहेत. कोरोनापासून व्हीसीव्दारे बैठका घेण्याचे सुरू झालेले सत्र आता चांगलेच रूळले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांपासून ते मुख्य सचिवांपर्यंत जो-तो आता व्हीसीच घेत असल्याने आणि प्रत्येक वरिष्ठ त्यांच्या साेयीने वेळा ठेवत असल्याने यात अधिकाऱ्यांची कुचंबणा होत आहे.

जिल्हाधिकारी २२५ समित्यांचे अध्यक्षएका जिल्हाधिकाऱ्यांवर सुमारे २२५ समित्यांची जबाबदारी असते. यातील अनेक समित्यांची महिन्यातून किमान एक बैठक घ्यावीच लागते. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात तर नेहमी वेगवेगळ्या दालनांत वेगवेगळ्या बैठकांचे सत्र चालूच असते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारीGovernmentसरकार