शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

शासकीय विभागांनी ‘व्हिजन २०२२’ च्या तयारीला लागावे : जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 21:45 IST

कोल्हापूर : राज्याच्या विविध क्षेत्रांत शाश्वत विकास होण्याच्या दृष्टीने जिल्हा हा विकासाचा केंद्रबिंदू मानून पुढील पाच वर्षांसाठी प्रत्येक शासकीय यंत्रणेने आपल्या विभागाचे ‘व्हिजन २०२२’ तयार करावे,

ठळक मुद्दे ध्वजनिधीचे उद्दिष्टही पूर्ण करण्यात यावे, नावीन्यपूर्ण योजनेतून अभिनव संकल्पना राबविण्यासाठीही यंत्रणांनी प्रस्ताव द्यावेत.

कोल्हापूर : राज्याच्या विविध क्षेत्रांत शाश्वत विकास होण्याच्या दृष्टीने जिल्हा हा विकासाचा केंद्रबिंदू मानून पुढील पाच वर्षांसाठी प्रत्येक शासकीय यंत्रणेने आपल्या विभागाचे ‘व्हिजन २०२२’ तयार करावे, या साठी कामाला लागा, असे निर्देश जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी शुक्रवारी येथे दिले.

जिल्हा सर्वसाधारण वार्षिक योजना आणि अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होेते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, उपवनसंरक्षक प्रभूनाथ शुक्ल, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव आदींची प्रमुख उपस्थिती होती.

राज्याच्या विविध क्षेत्रांत शाश्वत विकास होण्याच्या दृष्टीने जिल्हा हा विकासाचा केंद्रबिंदू मानून पुढील पाच वर्षांसाठी प्रत्येक शासकीय यंत्रणेने आपल्या विभागाचे ‘व्हिजन २०२२’ तयार करावे, असे निर्देश शासनाने दिले असून त्याची अंमलबजावणी करून यंत्रणांनी त्वरित ‘व्हिजन २०२२’ सादर करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी सुभेदार यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी सुभेदार म्हणाले, जिल्हा वार्षिक आराखड्यांतर्गत समाविष्ट कामांसाठी संबंधित शासकीय यंत्रणांनी प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव त्वरित सादर करावेत. आतापर्यंत करण्यात आलेल्या कामांची ज्या यंत्रणांनी उपयोगिता प्रमाणपत्रे सादर केलेली नाहीत त्यांनी ती त्वरित सादर करावीत. नावीन्यपूर्ण योजनेतून अभिनव संकल्पना राबविण्यासाठीही यंत्रणांनी प्रस्ताव द्यावेत. जिल्'ाशी निगडित महत्त्वाच्या विषयांवरील बैठकांना जे अधिकारी उपस्थित राहणार नाहीत त्यांना ‘कारणे दाखवा नोटिसा’ देण्यात येतील.

यावेळी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी १३ कोटी वृक्षलागवड अभियानांतर्गत जिल्'ाला देण्यात आलेल्या २२ लाख ४४ हजार वृक्षलागवड अभियानाचा आढावा घेतला तसेच जिल्हा सैनिक कल्याण विभागाला देण्यात आलेले ध्वजनिधीचे उद्दिष्टही पूर्ण करण्यात यावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी आयोजित जिल्हा वार्षिक योजनेच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपवनसंरक्षक प्रभूनाथ शुक्ल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव उपस्थित होते.