शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
8
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
9
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
10
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
11
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
12
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
13
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
14
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
15
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
16
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
17
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
18
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
19
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
20
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!

सरकारचे दिवस भरले

By admin | Updated: June 10, 2014 02:09 IST

‘एन.डी.’ कडाडले : ‘टोल गेला खड्ड्यात’, हा शाहूंच्या अस्मितेचा लढा

कोल्हापूर : गेली दोन वर्षे आंदोलन सुरू असताना या प्रश्नाकडे लक्ष देण्यास मुख्यमंत्र्यांना वेळ नसेल, तर आम्हालाही चर्चा करण्याची गरज नाही. लोकसभेच्या निवडणुकीनंतर अजूनही ही मंडळी शुद्धीवर येत नसतील, तर अशा मुजोर राज्यकर्त्यांना जनतेची ताकद दाखवा, असे आवाहन करत या निष्क्रिय सरकारचे दिवस भरले आहेत, असा इशारा ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी आज, सोमवारी टोलविरोधी महामोर्चाच्या सांगताप्रसंगी दिला. कोल्हापूरला सत्ताधाऱ्यांनी नेहमीच सापत्नीकतेची वागणूक दिली आहे. त्यामुळे हा टोलचा प्रश्न नाहीच, ‘टोल गेला खड्ड्यात’ हा राजर्षी शाहू महाराज यांच्या अस्मितेचा लढा आहे, अशी संतप्त भावनाही त्यांनी व्यक्त केली. प्रा. पाटील म्हणाले, टोलविरोधी लढा सुरू राहणार आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील ३३ टोलनाके बंद केले, पण कोल्हापूरचा प्रश्न त्यांना सोडवता आला नाही. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरही या राज्यकर्त्यांना शहाणपण सूचत नसेल, तर या प्रवृत्तीला काय म्हणावे? जुने विसरता येत नाही आणि नवीन शिकता येत नाही, अशा प्रवृत्तीची माणसे असल्याने कोल्हापूरच्या जनभावनेची कदर होत नाही. ज्यांच्या चारचाकी गाड्या नाहीत, अशी जनता ईर्ष्येने आज रस्त्यावर उतरली आहे. गोविंद पानसरे म्हणाले, खासगीकरणाच्या विळख्यात सरकार अडकले असून, जळगावमध्ये धरणाच्या बांधकामाचेही खासगीकरण केले आहे. आ. चंद्रदीप नरके म्हणाले, राजकारण बाजूला ठेवून महामोर्चात जनता सहभागी झालेली आहे. आ. राजेश क्षीरसागर व आ. सुजित मिणचेकर यांनी टोलबाबत स्थगन प्रस्ताव मांडला, पण तो ऐकून घेतला नाही. या आमदारांना बाजू मांडू न देता निलंबित केले. विरोधी आमदारांना निलंबन करण्याचा उच्चांक आघाडी सरकारने केला आहे. आता आघाडी सरकारचे निलंबन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. ‘आयआरबी’च्या दादागिरीला पोलीस सहकार्य करत असल्याचा आरोप करत कितीही दावे दाखल करा, त्याची फिकीर करत नाही, पण हे भूत कोल्हापुरातून घालवल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे आ. नरके यांनी सांगितले. यावेळी महापौर सुनीता राऊत, उपमहापौर मोहन गोंजारे, रामभाऊ चव्हाण, निवासराव साळोखे, बाबा पार्टे, प्रा. शहाजी कांबळे, उत्तम कांबळे, भगवान काटे, अनिल मादनाईक, अ‍ॅड. विवेक घाटगे, अ‍ॅड. शिवाजीराव राणे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)