शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

सरकारचे दिवस भरले

By admin | Updated: June 10, 2014 02:09 IST

‘एन.डी.’ कडाडले : ‘टोल गेला खड्ड्यात’, हा शाहूंच्या अस्मितेचा लढा

कोल्हापूर : गेली दोन वर्षे आंदोलन सुरू असताना या प्रश्नाकडे लक्ष देण्यास मुख्यमंत्र्यांना वेळ नसेल, तर आम्हालाही चर्चा करण्याची गरज नाही. लोकसभेच्या निवडणुकीनंतर अजूनही ही मंडळी शुद्धीवर येत नसतील, तर अशा मुजोर राज्यकर्त्यांना जनतेची ताकद दाखवा, असे आवाहन करत या निष्क्रिय सरकारचे दिवस भरले आहेत, असा इशारा ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी आज, सोमवारी टोलविरोधी महामोर्चाच्या सांगताप्रसंगी दिला. कोल्हापूरला सत्ताधाऱ्यांनी नेहमीच सापत्नीकतेची वागणूक दिली आहे. त्यामुळे हा टोलचा प्रश्न नाहीच, ‘टोल गेला खड्ड्यात’ हा राजर्षी शाहू महाराज यांच्या अस्मितेचा लढा आहे, अशी संतप्त भावनाही त्यांनी व्यक्त केली. प्रा. पाटील म्हणाले, टोलविरोधी लढा सुरू राहणार आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील ३३ टोलनाके बंद केले, पण कोल्हापूरचा प्रश्न त्यांना सोडवता आला नाही. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरही या राज्यकर्त्यांना शहाणपण सूचत नसेल, तर या प्रवृत्तीला काय म्हणावे? जुने विसरता येत नाही आणि नवीन शिकता येत नाही, अशा प्रवृत्तीची माणसे असल्याने कोल्हापूरच्या जनभावनेची कदर होत नाही. ज्यांच्या चारचाकी गाड्या नाहीत, अशी जनता ईर्ष्येने आज रस्त्यावर उतरली आहे. गोविंद पानसरे म्हणाले, खासगीकरणाच्या विळख्यात सरकार अडकले असून, जळगावमध्ये धरणाच्या बांधकामाचेही खासगीकरण केले आहे. आ. चंद्रदीप नरके म्हणाले, राजकारण बाजूला ठेवून महामोर्चात जनता सहभागी झालेली आहे. आ. राजेश क्षीरसागर व आ. सुजित मिणचेकर यांनी टोलबाबत स्थगन प्रस्ताव मांडला, पण तो ऐकून घेतला नाही. या आमदारांना बाजू मांडू न देता निलंबित केले. विरोधी आमदारांना निलंबन करण्याचा उच्चांक आघाडी सरकारने केला आहे. आता आघाडी सरकारचे निलंबन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. ‘आयआरबी’च्या दादागिरीला पोलीस सहकार्य करत असल्याचा आरोप करत कितीही दावे दाखल करा, त्याची फिकीर करत नाही, पण हे भूत कोल्हापुरातून घालवल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे आ. नरके यांनी सांगितले. यावेळी महापौर सुनीता राऊत, उपमहापौर मोहन गोंजारे, रामभाऊ चव्हाण, निवासराव साळोखे, बाबा पार्टे, प्रा. शहाजी कांबळे, उत्तम कांबळे, भगवान काटे, अनिल मादनाईक, अ‍ॅड. विवेक घाटगे, अ‍ॅड. शिवाजीराव राणे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)