शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

मेघोली प्रकल्प दुर्घटनेबाबत सरकार ग्रामस्थांच्या पाठीशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:31 IST

मेघोली पाटबंधारे प्रकल्पाचे ५०-५० मीटरचा दोन्ही बाजूचा भराव वाहून गेला आहे. नशिबाने लोकवस्ती डोंगरावर असल्याने विशेष मनुष्यहानी झाली ...

मेघोली पाटबंधारे प्रकल्पाचे ५०-५० मीटरचा दोन्ही बाजूचा भराव वाहून गेला आहे. नशिबाने लोकवस्ती डोंगरावर असल्याने विशेष मनुष्यहानी झाली नाही. मात्र एका महिलेला आपला प्राण गमवावा लागला. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मोटारी, पाईप व जनावरे वाहून गेल्यामुळे नुकसान झाले. तर जमिनी खरडून गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मेघोली ग्रामस्थांचे धरणाचे तातडीने पुनर्भरण करण्याची मागणी आहे. मात्र, पाऊस कमी झाल्यानंतर याबाबत निर्णय घेऊन निश्चित पुनर्भरण केले जाईल. नुकसानभरपाईसाठी पंचनामे केले आहेत. सातबारा उताऱ्यावरून हद्द निश्चित करून जमिनीचे सपाटीकरण केले जाईल व शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई दिली जाईल. ओढ्याचे पात्र खुले करण्यासाठी पाटबंधारे विभागाला सूचना दिल्या आहेत. त्याचेही काम तातडीने सुरू होईल. वरकरवाडी पूल व रस्ता याबाबतही तातडीने निर्णय घेतला जाईल, असेही नामदार जयंत पाटील यांनी सांगितले.

मेघोली पाटबंधारे प्रकल्प दुर्घटनेबाबत तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई मिळावी यासाठी आमदार प्रकाश आबिटकर व माजी आमदार के. पी. पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली आहे. त्याप्रमाणे येत्या १४ सप्टेंबर रोजी मंत्रालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत बैठक घेऊन तातडीने नुकसानभरपाई देण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असेही नामदार जयंत पाटील यांनी सांगितले.