शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
4
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
5
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
6
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
7
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
8
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
9
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
10
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
11
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air
12
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
13
"२.४६ कोटी घ्यायचेत"; बँकेच्या बाथरुममध्ये बिझनेसमनने स्वत:वर झाडल्या गोळ्या, कारण...
14
मानेत गोळी लागताच रक्ताची धार अन्...; चार्ली कर्कच्या हत्येचा VIDEO समोर, १८० मीटरवर होता शूटर
15
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
16
आम्ही नेपाळमध्ये सुरक्षित; कुठलीही गैरसोय नाही; ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांनी सांगितली परिस्थिती
17
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
18
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
19
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
20
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला

नंदवाळ येथील जागा भारत राखीव बटालियनसाठी शासनाची मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 11:58 IST

भारत राखीव बटालियन १ ते १६ च्या तळासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील नंदवाळ येथील ११५ एकरचा भूखंड उपलब्ध झाला आहे. या ठिकाणी बटालियनची उभारणी करण्यासाठी शासनाने अखेर मान्यता दिली. अनेक वर्षे बटालियनचा रखडत पडलेला प्रश्न अखेर मार्गी लागल्याने अधिकाऱ्यांसह जवानांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देनंदवाळ येथील जागा भारत राखीव बटालियनसाठी शासनाची मंजुरी ११५ एकरचा भूखंड, लवकरच उभारणी

कोल्हापूर : भारत राखीव बटालियन १ ते १६ च्या तळासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील नंदवाळ येथील ११५ एकरचा भूखंड उपलब्ध झाला आहे. या ठिकाणी बटालियनची उभारणी करण्यासाठी शासनाने अखेर मान्यता दिली. अनेक वर्षे बटालियनचा रखडत पडलेला प्रश्न अखेर मार्गी लागल्याने अधिकाऱ्यांसह जवानांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.राज्य राखीव पोलीस बलाच्या १ ते १६ बटालियनच्या अधिकारी व जवानांसाठी जागेची व्यवस्था करण्याचे काम सुरू होते. जागेअभावी बटालियनचा मुक्काम दौंड (जि. पुणे) येथे हलविण्यात आला आहे.

राज्य राखीव पोलीस बल गटाचा राज्यात, तसेच राज्याबाहेरही आपत्कालीन, तसेच संवेदनशील परिस्थितीत जीवित व वित्तहानी टाळणे, सरकारी व खासगी मालमत्तेचे संरक्षण, तसेच सुरक्षिततेकरिता वापर केला जात आहे.

बटालियनचे मुख्यालय बांधण्याचे नियोजन २०११-१२ मध्ये करण्यात आले. त्यानुसार प्रथमत: मजले (ता. हातकणंगले) व तमदलगे (ता. शिरोळ), रेंदाळ व दिंडनेर्ली येथील जागा निश्चित करण्यात आली होती; परंतु त्या ठिकाणीही काही समस्या निर्माण झाल्याने नंदवाळ येथील ११५ एकर जागा निश्चित केली होती. त्या ठिकाणी मुबलक पाणी, मुख्यालय, निवासस्थाने, शाळा, उद्यान, वाहनतळ उभारण्यासाठी सर्वसोयींनीयुक्त जागा उपलब्ध आहे.

या जागेची राज्य राखीव पोलीस बलाच्या अप्पर पोलीस महासंचालक अर्चना त्यागी यांनी डिसेंबर २०१९ मध्ये पाहणी केली होती. त्यासंबंधीचा प्रस्तावही शासनाला दिला होता.

गृहराज्यमंत्री सतेज पाटील, अप्पर पोलीस महासंचालक अर्चना त्यागी, बी. जी. शेखर, पुणे परीक्षेत्र व समादेशक जयंत मीना, विभागीय आयुक्त पुणे, जिल्हाधिकारी, समादेशक शिवाजी जमदाडे यांचे सहकार्य लाभले.

नंदवाळच्या जागेचा शासन आदेश झाला असून, त्याठिकाणी आम्ही पोलीस वसाहत, मुख्यालय, इमारत, शाळा, तसेच कवायत मैदान यांचे डिझाईन करून लवकरच संपूर्ण तळाची उभारणी करणार आहोत. अर्चना त्यागी, अप्पर पोलीस महासंचालक.

आम्ही मागणी केल्यानुसार मौजे नंदवाळ येथील गायरानमधील जागा भारत राखीव बटालियनचा तळ उभारण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे. या जागेत नियोजन करून लवकरच बांधकामास सुरुवात करण्यात येईल.- जयंत मीना, समादेशक,भारत राखीव बटालियन-३.

असा आहे शासन आदेश...मौजे नंदवाळ येथील गट क्र. ६३ मधील ४६ हे. ०८ आर क्षेत्रातील १८ मी. रुंद प्रस्तावित रस्त्याने बाधित भाग वगळून उर्वरित गायरान जमीन सार्वजनिक प्रयोजनाकरिता गृह विभागाच्या नियंत्रणाखाली भारत राखीव बटालियन क्रमांक-३, कोल्हापूर यांना भोगवटामूल्यरहीत रीतीने उपलब्ध करून देण्यासाठी शासन मान्यता देत असलेचा आदेश गृह विभागाचे उपसचिव कि. पा. वडते यांनी काढला आहे.

 

  • सदर जमिनीस किमान १२ मी. रुंदीचा रस्ता उपलब्ध होणे आवश्यक आहे.
  • जमिनीपैकी काही क्षेत्र उताराचे आहे.
  • १.५ पेक्षा तीव्र उताराच्या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे बांधकाम होणार नाही.
  • जमिनीवर विकास करताना नियंत्रण नियमावलीनुसार सक्षम अधिकाऱ्यांकडून रेखांकन व बांधकाम नकाशांना मंजुरी घेणे आवश्यक आहे.
  • सामाजिक वनीकरण विभागातर्फे वनीकरण केलेली जागा बांधकाम न करता मोकळी ठेवावी.
  • येथील झांडांची देखभाल व संवर्धन करण्यात यावे.

 

 

टॅग्स :Forceफोर्सkolhapurकोल्हापूर