शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
2
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
3
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
4
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
5
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
6
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
7
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
8
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
9
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
10
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
11
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
12
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
13
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
14
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
15
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
16
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
17
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
18
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
19
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
20
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर

नंदवाळ येथील जागा भारत राखीव बटालियनसाठी शासनाची मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 11:58 IST

भारत राखीव बटालियन १ ते १६ च्या तळासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील नंदवाळ येथील ११५ एकरचा भूखंड उपलब्ध झाला आहे. या ठिकाणी बटालियनची उभारणी करण्यासाठी शासनाने अखेर मान्यता दिली. अनेक वर्षे बटालियनचा रखडत पडलेला प्रश्न अखेर मार्गी लागल्याने अधिकाऱ्यांसह जवानांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देनंदवाळ येथील जागा भारत राखीव बटालियनसाठी शासनाची मंजुरी ११५ एकरचा भूखंड, लवकरच उभारणी

कोल्हापूर : भारत राखीव बटालियन १ ते १६ च्या तळासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील नंदवाळ येथील ११५ एकरचा भूखंड उपलब्ध झाला आहे. या ठिकाणी बटालियनची उभारणी करण्यासाठी शासनाने अखेर मान्यता दिली. अनेक वर्षे बटालियनचा रखडत पडलेला प्रश्न अखेर मार्गी लागल्याने अधिकाऱ्यांसह जवानांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.राज्य राखीव पोलीस बलाच्या १ ते १६ बटालियनच्या अधिकारी व जवानांसाठी जागेची व्यवस्था करण्याचे काम सुरू होते. जागेअभावी बटालियनचा मुक्काम दौंड (जि. पुणे) येथे हलविण्यात आला आहे.

राज्य राखीव पोलीस बल गटाचा राज्यात, तसेच राज्याबाहेरही आपत्कालीन, तसेच संवेदनशील परिस्थितीत जीवित व वित्तहानी टाळणे, सरकारी व खासगी मालमत्तेचे संरक्षण, तसेच सुरक्षिततेकरिता वापर केला जात आहे.

बटालियनचे मुख्यालय बांधण्याचे नियोजन २०११-१२ मध्ये करण्यात आले. त्यानुसार प्रथमत: मजले (ता. हातकणंगले) व तमदलगे (ता. शिरोळ), रेंदाळ व दिंडनेर्ली येथील जागा निश्चित करण्यात आली होती; परंतु त्या ठिकाणीही काही समस्या निर्माण झाल्याने नंदवाळ येथील ११५ एकर जागा निश्चित केली होती. त्या ठिकाणी मुबलक पाणी, मुख्यालय, निवासस्थाने, शाळा, उद्यान, वाहनतळ उभारण्यासाठी सर्वसोयींनीयुक्त जागा उपलब्ध आहे.

या जागेची राज्य राखीव पोलीस बलाच्या अप्पर पोलीस महासंचालक अर्चना त्यागी यांनी डिसेंबर २०१९ मध्ये पाहणी केली होती. त्यासंबंधीचा प्रस्तावही शासनाला दिला होता.

गृहराज्यमंत्री सतेज पाटील, अप्पर पोलीस महासंचालक अर्चना त्यागी, बी. जी. शेखर, पुणे परीक्षेत्र व समादेशक जयंत मीना, विभागीय आयुक्त पुणे, जिल्हाधिकारी, समादेशक शिवाजी जमदाडे यांचे सहकार्य लाभले.

नंदवाळच्या जागेचा शासन आदेश झाला असून, त्याठिकाणी आम्ही पोलीस वसाहत, मुख्यालय, इमारत, शाळा, तसेच कवायत मैदान यांचे डिझाईन करून लवकरच संपूर्ण तळाची उभारणी करणार आहोत. अर्चना त्यागी, अप्पर पोलीस महासंचालक.

आम्ही मागणी केल्यानुसार मौजे नंदवाळ येथील गायरानमधील जागा भारत राखीव बटालियनचा तळ उभारण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे. या जागेत नियोजन करून लवकरच बांधकामास सुरुवात करण्यात येईल.- जयंत मीना, समादेशक,भारत राखीव बटालियन-३.

असा आहे शासन आदेश...मौजे नंदवाळ येथील गट क्र. ६३ मधील ४६ हे. ०८ आर क्षेत्रातील १८ मी. रुंद प्रस्तावित रस्त्याने बाधित भाग वगळून उर्वरित गायरान जमीन सार्वजनिक प्रयोजनाकरिता गृह विभागाच्या नियंत्रणाखाली भारत राखीव बटालियन क्रमांक-३, कोल्हापूर यांना भोगवटामूल्यरहीत रीतीने उपलब्ध करून देण्यासाठी शासन मान्यता देत असलेचा आदेश गृह विभागाचे उपसचिव कि. पा. वडते यांनी काढला आहे.

 

  • सदर जमिनीस किमान १२ मी. रुंदीचा रस्ता उपलब्ध होणे आवश्यक आहे.
  • जमिनीपैकी काही क्षेत्र उताराचे आहे.
  • १.५ पेक्षा तीव्र उताराच्या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे बांधकाम होणार नाही.
  • जमिनीवर विकास करताना नियंत्रण नियमावलीनुसार सक्षम अधिकाऱ्यांकडून रेखांकन व बांधकाम नकाशांना मंजुरी घेणे आवश्यक आहे.
  • सामाजिक वनीकरण विभागातर्फे वनीकरण केलेली जागा बांधकाम न करता मोकळी ठेवावी.
  • येथील झांडांची देखभाल व संवर्धन करण्यात यावे.

 

 

टॅग्स :Forceफोर्सkolhapurकोल्हापूर