शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
4
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
5
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
6
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
7
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
8
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
9
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
10
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
12
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
13
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
14
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
15
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
16
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
17
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
18
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
19
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
20
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री

लक्ष्मी टेकडीवरील निवळे वसाहतीस शासन मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:21 IST

कागल : जहाँगीर शेख : पुणे-बंगलोर महामार्गालगत निसर्गरम्य वातावरण असलेल्या लक्ष्मी टेकडीच्या विस्तीर्ण पठारावर चांदोली अभयारण्यातील सह्याद्री व्याघ्र ...

कागल

: जहाँगीर शेख

: पुणे-बंगलोर महामार्गालगत निसर्गरम्य वातावरण असलेल्या लक्ष्मी टेकडीच्या विस्तीर्ण पठारावर चांदोली अभयारण्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी विस्थापित केलेल्या निवळे गावाचे पुनर्वसन करण्यास महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिली आहे. येथे रहिवासी भूखंडाबरोबरच शेतीसाठीही जमीन दिली जाणार आहे. ही जागा कागलच्या हद्दीत असली तरी ती वनविभागाच्या मालकीची आहे. वनविभागाची मंजुरीही अंतिम टप्प्यात असून, त्याची मंजुरी आली की वसाहत उभी करण्याचे काम सुरू होणार आहे.

कागलची ग्रामदैवता असलेल्या श्री लक्ष्मी देवीची दोन मंदिरे आहेत. रस्त्यालगत असलेली गोडी लक्ष्मी आणि टेकडीवर खारी लक्ष्मी म्हणून ओळखली जाते. येथे असलेल्या झाडीमुळे हा परिसर निसर्गरम्य बनला आहे. या टेकडीवर विस्तीर्ण असे पठार असून, त्यामध्ये खासगी व्यक्तीच्या शेतजमिनी आहेत. तसेच वनविभागाची मोठी जमीन आहे. टेकडीवरील हे पठार कणेरीवाडीच्या हद्दीपर्यंत आहे. कणेरीवाडीकडील बाजूने गट नंबर २०३ आणि २०१ मधील जमीन निवळे ग्रामस्थांनी मागितली आहे. नगरपालिकेने यापूर्वीच ना हरकत दाखला दिला आहे. तसेच या हद्दीत येणाऱ्या प्रभागाची शाहू काॅलनीतील मंडलिक हाॅलमध्ये जनसुनावणीही घेतली होती. या जनसुनावणीत काही ग्रामस्थांनी विरोध, तर काहींनी हरकत नसल्याचे सांगितले होते. तो अहवाल पाहून महाराष्ट्र शासनाने या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. त्यावर वनमंत्र्याचीही सही झाली आहे. केंद्रीय वन विभागाच्या अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव नागपूर मुख्यालयात सादर झाला आहे.

चौकट

● कागलमधील हिलस्टेशन वसाहत..

कागल शहराची हद्दवाढ झाली आहे. पण, ही जागा वनविभागाच्या मालकीची आहे. निवळे गावाचे पुनर्वसन झाल्यावर शहरात एक हिल स्टेशन वसाहत उभी राहणार असून, शाहू काॅलनी प्रभागाशी जोडली जाणार आहे. साधारणत: पन्नास ते साठ कुटुंबे येथे राहावयास येतील असा अंदाज आहे. सध्या वन तपासणी नाक्याच्या जवळून खडी क्रेशरकडे एक रस्ता गेला आहे. तोच या वसाहतीकडे जाण्याचा मार्ग असणार आहे.

काय आहे ही निवळे वसाहत... शाहूवाडी तालुक्यातील निवळे गाव हे चांदोली अभयारण्यात येते. वाघांचे संरक्षण आणि पुनर्वसन होण्यासाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी हे गाव उठविण्यात आले. एकूण १५७ कुटुंबे होती. त्यापैकी ७३ कुटुंबांचे कागल तालुक्यातील गलगले गावात पुनर्वसन करण्यात आले. उर्वरित वाठार तर्फ वडगाव येथे आहेत. १९९९ मध्ये पुनर्वसन झाले त्यातील फक्त ३५ जणांना जमीन मिळाली. तीही चुकीच्या पद्धतीने. न्यायालयात ही जमीन मूळ मालकाला देण्याचा निर्णय झाल्याने ही सर्व कुटुंबे उघड्यावर पडली म्हणून वन विभागाच्या जागेत शेतीसह पुनर्वसन करण्याचे नियोजन होऊन लक्ष्मी टेकडीचा विचार झाला.

.