शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

आसऱ्यांसाठी गोशाळांची गरज

By admin | Updated: March 17, 2015 00:06 IST

गोवंश हत्याबंदी कायदा : जनावरे सामावण्याची पांजरपोळ संस्थेची क्षमता संपली

संदीप खवळे -कोल्हापूर शाहू मिल परिसरातील श्री पांजरपोळ संस्थेची जनावरे सामावून घेण्याची क्षमता संपली आहे. कोणतीही शासकीय मदत नाही, केवळ देणगीवरच ही संस्था चालत आहे. एखाद्दुसरा अपवाद वगळता भाकड गायींना आश्रय देणाऱ्या गोशाळा जिल्ह्यात नाहीत; त्यामुळे गोहत्या बंदी कायद्याची अंमलबजावणी करताना भाकड गायींसाठी आता गावोगावी गोशाळाच सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी गो-बचाव चळवळीतील कार्यकर्त्यांकडून होत आहे.भाकड जनावरांची देखभाल करणे शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यामुळे गाय किंवा म्हैस म्हातारे किंवा भाकड झाले की, त्यांना पांजरपोळचा रस्ता दाखविला जातो. म्हशीच्या तुलनेत कमी दूध आणि फॅट असल्यामुळे गायी पाळण्याकडे शेतकऱ्यांचा कल कमी झाला. जर्सी गायींची संख्या वाढल्यामुळे देशी गायींना, वयोवृद्ध किंवा भाकड गायींना पांजरपोळ किंवा कत्तलखान्याकडे पाठविले जाऊ लागले; परंतु गायींच्या कत्तलींना विरोध होऊ लागला. भाजप सरकारने गोवंश हत्याबंदी कायदा केला. त्यामुळे जिल्ह्यातील भाकड आणि वयोवृद्ध गायींच्या देखभालीसाठी यंत्रणा निर्माण करणे आवश्यक आहे. पांजरपोळ येथील शेडमध्ये पाचशे जनावरे मावतात. सध्या येथे चारशेच्यावर जनावरे आहेत. शिवाय येथे केवळ शेतकऱ्यांच्याच भाकड गायींना घेतले जाते. गायीबरोबरच म्हैस, बैलांनाही घेतले जाते. या जनावरांना लागणारा चारा, औषधोपचार, जनावरांची देखभाल करणारे कामगार यांसाठी प्रचंड खर्च होतो. भाकड गायींव्यतिरिक्त शहरामध्येही अनेक भाकड व मोकाट गायी आहेत, त्यांचेही संवर्धन होणे गरजेचे आहे; पण काटेभोगाव (ता. पन्हाळा) येथील आबा कांबळे यांची गोशाळा आणि इचलकरंजी येथील गोशाळेचा अपवाद सोडला, तर जिल्ह्यात कुठेही भाकड गायींची देखभाल करण्याची व्यवस्था नसल्याचे चित्र आहे. आता गोहत्या बंदी कायदा झाल्यामुळे कत्तलखान्याकडे जाणाऱ्या गायींची संख्या आपसूकच गोशाळांकडे वळणार आहे. या गोशाळांची जनावरे सामावून घेण्याची क्षमता संपली आहे. त्यामुळे कायदा झाला; आता गायींचा सांभाळ कोण करणार, असा प्रश्न शेतकरी आणि गोप्रेमींना पडला आहे. गावागावांत गोशाळा व्हावी गोहत्या बंदी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी भाकड गायींना सांभाळण्याची स्वतंत्र यंत्रणाच उभारावी लागणार आहे. भाकड गायी सांभाळणे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळे या गायींसाठी गावोगावी गोशाळाच उभारल्या पाहिजेत. सध्या आमच्याकडे शंभर गायी आहेत. गायींना चारा-पाणी देण्यासाठी येणारा खर्च आम्ही देणगीच्या माध्यमातून भागवत आहोत. गोसंवर्धनासाठी शासनाने अर्थसाहाय्य केले पाहिजे. - आबा कांबळे, गोशाळा चालक व सर्वोदय कार्यकर्ते