शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
4
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
5
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
6
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
7
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
8
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
9
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
10
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
11
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
12
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
13
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
14
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
15
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
16
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
17
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
18
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
20
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या

आसऱ्यांसाठी गोशाळांची गरज

By admin | Updated: March 17, 2015 00:06 IST

गोवंश हत्याबंदी कायदा : जनावरे सामावण्याची पांजरपोळ संस्थेची क्षमता संपली

संदीप खवळे -कोल्हापूर शाहू मिल परिसरातील श्री पांजरपोळ संस्थेची जनावरे सामावून घेण्याची क्षमता संपली आहे. कोणतीही शासकीय मदत नाही, केवळ देणगीवरच ही संस्था चालत आहे. एखाद्दुसरा अपवाद वगळता भाकड गायींना आश्रय देणाऱ्या गोशाळा जिल्ह्यात नाहीत; त्यामुळे गोहत्या बंदी कायद्याची अंमलबजावणी करताना भाकड गायींसाठी आता गावोगावी गोशाळाच सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी गो-बचाव चळवळीतील कार्यकर्त्यांकडून होत आहे.भाकड जनावरांची देखभाल करणे शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यामुळे गाय किंवा म्हैस म्हातारे किंवा भाकड झाले की, त्यांना पांजरपोळचा रस्ता दाखविला जातो. म्हशीच्या तुलनेत कमी दूध आणि फॅट असल्यामुळे गायी पाळण्याकडे शेतकऱ्यांचा कल कमी झाला. जर्सी गायींची संख्या वाढल्यामुळे देशी गायींना, वयोवृद्ध किंवा भाकड गायींना पांजरपोळ किंवा कत्तलखान्याकडे पाठविले जाऊ लागले; परंतु गायींच्या कत्तलींना विरोध होऊ लागला. भाजप सरकारने गोवंश हत्याबंदी कायदा केला. त्यामुळे जिल्ह्यातील भाकड आणि वयोवृद्ध गायींच्या देखभालीसाठी यंत्रणा निर्माण करणे आवश्यक आहे. पांजरपोळ येथील शेडमध्ये पाचशे जनावरे मावतात. सध्या येथे चारशेच्यावर जनावरे आहेत. शिवाय येथे केवळ शेतकऱ्यांच्याच भाकड गायींना घेतले जाते. गायीबरोबरच म्हैस, बैलांनाही घेतले जाते. या जनावरांना लागणारा चारा, औषधोपचार, जनावरांची देखभाल करणारे कामगार यांसाठी प्रचंड खर्च होतो. भाकड गायींव्यतिरिक्त शहरामध्येही अनेक भाकड व मोकाट गायी आहेत, त्यांचेही संवर्धन होणे गरजेचे आहे; पण काटेभोगाव (ता. पन्हाळा) येथील आबा कांबळे यांची गोशाळा आणि इचलकरंजी येथील गोशाळेचा अपवाद सोडला, तर जिल्ह्यात कुठेही भाकड गायींची देखभाल करण्याची व्यवस्था नसल्याचे चित्र आहे. आता गोहत्या बंदी कायदा झाल्यामुळे कत्तलखान्याकडे जाणाऱ्या गायींची संख्या आपसूकच गोशाळांकडे वळणार आहे. या गोशाळांची जनावरे सामावून घेण्याची क्षमता संपली आहे. त्यामुळे कायदा झाला; आता गायींचा सांभाळ कोण करणार, असा प्रश्न शेतकरी आणि गोप्रेमींना पडला आहे. गावागावांत गोशाळा व्हावी गोहत्या बंदी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी भाकड गायींना सांभाळण्याची स्वतंत्र यंत्रणाच उभारावी लागणार आहे. भाकड गायी सांभाळणे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळे या गायींसाठी गावोगावी गोशाळाच उभारल्या पाहिजेत. सध्या आमच्याकडे शंभर गायी आहेत. गायींना चारा-पाणी देण्यासाठी येणारा खर्च आम्ही देणगीच्या माध्यमातून भागवत आहोत. गोसंवर्धनासाठी शासनाने अर्थसाहाय्य केले पाहिजे. - आबा कांबळे, गोशाळा चालक व सर्वोदय कार्यकर्ते