शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

आसऱ्यांसाठी गोशाळांची गरज

By admin | Updated: March 17, 2015 00:06 IST

गोवंश हत्याबंदी कायदा : जनावरे सामावण्याची पांजरपोळ संस्थेची क्षमता संपली

संदीप खवळे -कोल्हापूर शाहू मिल परिसरातील श्री पांजरपोळ संस्थेची जनावरे सामावून घेण्याची क्षमता संपली आहे. कोणतीही शासकीय मदत नाही, केवळ देणगीवरच ही संस्था चालत आहे. एखाद्दुसरा अपवाद वगळता भाकड गायींना आश्रय देणाऱ्या गोशाळा जिल्ह्यात नाहीत; त्यामुळे गोहत्या बंदी कायद्याची अंमलबजावणी करताना भाकड गायींसाठी आता गावोगावी गोशाळाच सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी गो-बचाव चळवळीतील कार्यकर्त्यांकडून होत आहे.भाकड जनावरांची देखभाल करणे शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यामुळे गाय किंवा म्हैस म्हातारे किंवा भाकड झाले की, त्यांना पांजरपोळचा रस्ता दाखविला जातो. म्हशीच्या तुलनेत कमी दूध आणि फॅट असल्यामुळे गायी पाळण्याकडे शेतकऱ्यांचा कल कमी झाला. जर्सी गायींची संख्या वाढल्यामुळे देशी गायींना, वयोवृद्ध किंवा भाकड गायींना पांजरपोळ किंवा कत्तलखान्याकडे पाठविले जाऊ लागले; परंतु गायींच्या कत्तलींना विरोध होऊ लागला. भाजप सरकारने गोवंश हत्याबंदी कायदा केला. त्यामुळे जिल्ह्यातील भाकड आणि वयोवृद्ध गायींच्या देखभालीसाठी यंत्रणा निर्माण करणे आवश्यक आहे. पांजरपोळ येथील शेडमध्ये पाचशे जनावरे मावतात. सध्या येथे चारशेच्यावर जनावरे आहेत. शिवाय येथे केवळ शेतकऱ्यांच्याच भाकड गायींना घेतले जाते. गायीबरोबरच म्हैस, बैलांनाही घेतले जाते. या जनावरांना लागणारा चारा, औषधोपचार, जनावरांची देखभाल करणारे कामगार यांसाठी प्रचंड खर्च होतो. भाकड गायींव्यतिरिक्त शहरामध्येही अनेक भाकड व मोकाट गायी आहेत, त्यांचेही संवर्धन होणे गरजेचे आहे; पण काटेभोगाव (ता. पन्हाळा) येथील आबा कांबळे यांची गोशाळा आणि इचलकरंजी येथील गोशाळेचा अपवाद सोडला, तर जिल्ह्यात कुठेही भाकड गायींची देखभाल करण्याची व्यवस्था नसल्याचे चित्र आहे. आता गोहत्या बंदी कायदा झाल्यामुळे कत्तलखान्याकडे जाणाऱ्या गायींची संख्या आपसूकच गोशाळांकडे वळणार आहे. या गोशाळांची जनावरे सामावून घेण्याची क्षमता संपली आहे. त्यामुळे कायदा झाला; आता गायींचा सांभाळ कोण करणार, असा प्रश्न शेतकरी आणि गोप्रेमींना पडला आहे. गावागावांत गोशाळा व्हावी गोहत्या बंदी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी भाकड गायींना सांभाळण्याची स्वतंत्र यंत्रणाच उभारावी लागणार आहे. भाकड गायी सांभाळणे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळे या गायींसाठी गावोगावी गोशाळाच उभारल्या पाहिजेत. सध्या आमच्याकडे शंभर गायी आहेत. गायींना चारा-पाणी देण्यासाठी येणारा खर्च आम्ही देणगीच्या माध्यमातून भागवत आहोत. गोसंवर्धनासाठी शासनाने अर्थसाहाय्य केले पाहिजे. - आबा कांबळे, गोशाळा चालक व सर्वोदय कार्यकर्ते