शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

गुंड, खाकीच्या जोरावर सावकारीचा जाच

By admin | Updated: February 8, 2016 00:49 IST

वस्त्रनगरी पठाणी पाशात : छोट्या व्यवसायाकडून आता बड्या उद्योगात शिरकाव; कर्ज देतानाच व्याज वसूल

राजाराम पाटील --इचलकरंजीछोटा-मोठा उद्योग-व्यवसाय करण्यासाठी आणि सहज उपलब्ध होणाऱ्या सुविधेमुळे वस्त्रनगरी आणि परिसरात खासगी सावकारी मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. शासनाने सावकारांच्या अन्याय आणि पिळवणुकीच्या विरोधात सावकारी विरोधी कायदा केला असला तरी त्यांची खाकी आणि गुंडांबरोबर असलेली सलगी, यामुळे त्याची अंमलबजावणी होत नाही.इचलकरंजीला सावकारी काही नवीन नाही. अत्यंत किरकोळ स्वरुपात असलेली सावकारी आता बोकाळली असून, तिने आता बड्या उद्योग-व्यवसायातही शिरकाव केला आहे. वसुलीसाठी गुंड आणि त्यातून काही अडचणी निर्माण झाल्यास ‘काही परसेंटवर’ खाकीची मदत घेतली जाते. त्यामुळे सावकारीने आता उग्र स्वरूप प्राप्त केले आहे.इचलकरंजी परिसरामध्ये साधारणत: तीस वर्षांपूर्वी छोटे विक्रेते (फेरीवाले-आठवडा बाजारकरू) निर्माण झाल्यापासून त्यांना व्याजाने रक्कम देण्यासाठी सावकारांची उत्पत्ती झाली. मात्र, त्यावेळी बोटावर मोजण्याइतकीच त्यांची संख्या होती. सुरुवातीला व्याज कपात करून दिलेल्या रकमेची हप्ता पद्धतीने वसुली होत असे. त्यापाठोपाठ कार्ड पद्धती आली. त्यावेळी सावकार स्वत: किंवा एखाद्या हस्तकामार्फत आठवडी बाजारात फिरून वसुली करीत असे. कालांतराने अनेक सावकार निर्माण झाले आणि त्यातील बड्या सावकारांनी मोठ्या उद्योग-व्यवसायात लक्ष घातले. त्यामुळे सावकारीची व्याप्ती वाढली असून, बड्या रकमांच्या वसुलीसाठी गुंड पोसण्याबरोबरच परस्पर वसुलीसाठी खाकीची सुद्धा मदत घेण्यात येते.येथील वर्षा म्हसकर या महिलेने मंडप साहित्य विक्रीच्या व्यवसायासाठी पाच वर्षांपूर्वी एका सावकाराकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी म्हसकर गुरफटत गेले. आणि एका सावकारीच्या परतफेडीसाठी दुसरा अशा पाच सावकारांच्या फेऱ्यात म्हसकर अडकले. त्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाली. त्यापाठोपाठच लतीफ मुल्ला यांनी यंत्रमाग व्यवसायासाठी बडा सावकार-बादशहा बागवान यांच्याकडून वीस लाख रुपये घेतले आणि त्याची पठाणी वसुली होत असल्याबद्दल मुल्ला यांनीसुद्धा पोलिसांत धाव घेतली आहे. मुल्ला यांनी वीस लाखांसाठी सव्वीस लाख रुपयांची परतफेड केली. अजूनही त्यांच्याकडे दहा लाख रुपयांच्या मागणीसाठी धमकावले जात आहे. त्यामुळे ते त्रस्त झाले आहेत. पतसंस्था बुडाल्यामुळे सावकारकी पुन्हा जोमातखासगी सावकारीचे ‘पठाणी’ व्याज आणि वसुलीतून गोरगरीब जनतेची मुक्तता व्हावी, यासाठी सुमारे २५ वर्षांपूर्वी गावोगावी पतसंस्था स्थापन करण्यासाठी तत्कालीन राज्य शासनाने प्रोत्साहन दिले. त्याला त्यावेळचे सहकार राज्यमंत्री प्रकाश आवाडे यांनी व्यापक स्वरूप प्राप्त करून दिले. पतसंस्थांमार्फत तळागाळातील माणसांची पत सुधारण्यास मदत केली. सुरुवातीला जोमात असलेल्या पतसंस्थांतील काही संचालकांनी गैरव्यवहार केले. अनेक पतसंस्था बुडाल्याने लोकांचा विश्वास उडाला. मात्र, याला मोजक्या नामांकित पतसंस्थांचा अपवाद आहे. अशा पार्श्वभूमीवर सावकारीने अलीकडे पुन्हा डोके वर काढले आहे.कायदा असूनही निष्प्रभसावकारीच्या विरोधात शासनाने दोन वर्षे कैद व २५ हजार रुपये दंडाच्या तरतुदीचा कायदा केला. परवाना नसेल तर पाच वर्षे कैद व ५० हजार रुपये आणि कोरे बंधपत्र, चिठ्ठी, अन्य कागद घेतल्यास तीन वर्षे कैद व २५ हजार रुपये दंड होऊ शकतो. मात्र, सावकार स्थावर मालमत्ता विक्री, दीर्घ भाडेतत्त्वावर, गहाणवट अशा पद्धतीने राजरोसपणे घेत असूनही त्यांना ‘काय द्याचे बोला’ या रितीमुळे कायद्याचा धाकच राहिला नाही.