शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
2
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
3
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
4
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
5
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
6
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
7
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
8
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
9
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
10
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
11
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
12
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
13
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
14
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
15
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
16
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
17
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
18
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
19
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
20
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
Daily Top 2Weekly Top 5

गुळवे, मजुरांअभावी गुऱ्हाळघरे बंदच

By admin | Updated: October 26, 2014 23:26 IST

गुऱ्हाळमालक हतबल : १४५० पैकी सुमारे ६०० गुऱ्हाळघरे सुरू होण्याच्या मार्गावर

किरण मस्कर -कोतोली -यंदाच्या गूळ हंगामाला सुरुवात झाली असली तरी या हंगामासाठी गुऱ्हाळमालकांसमोर गुळव्याच्या व मजुरांच्या टंचाईचे मोठे संकट उभे राहिले आहे. जिल्ह्यातील अनेक गुऱ्हाळमालकांकडून गुळव्यांचा व मजुरांचा शोध सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.गुळव्याबरोबर अन्य मजुरांच्या टंचाईमुळे यंदा जिल्ह्यामधील १४५० पैकी सुमारे ६०० गुऱ्हाळघरे सुरू होण्याची शक्यता बाजार समितीने वर्तवली आहे. गेल्या हंगामात बाजार समितीकडे जिल्ह्यातून २५ लाख ५० हजार ३० किलो गुळाची आवक होऊन २५ ते ३० कोटींची मोठी उलाढाल झाली. यामध्ये बहुतांश गूळ गुजरात बाजारपेठेकडे गेला. पारंपरिक पद्धतीचा गूळ बनविणारे गुळवे पन्हाळा, गगनबावडा, शाहूवाडीस डोंगराळ भागात आहेत. मात्र, गुळव्यांच्या टंचाईमुळे गेल्या काही महिन्यांपासून कोल्हापुरातील अनेक गुऱ्हाळमालक, शेतकरी गुळव्यांचा शोध घेत आहेत. दरवर्षी चार महिन्यांच्या हंगामासाठी गुऱ्हाळावर काम करणाऱ्या मजुरांची तीन ते पाच लाखांपर्यंत मजुरी द्यावी लागते. गेल्या काही वर्षांपासून काही मजुरांच्या टोळ्यांनी पैसे घेऊनदेखील कामाला न येता गुऱ्हाळमालकाला फसविल्याचे प्रकार घडले. या भीतीपोटी परजिल्ह्यांतील मजुरांना गुऱ्हाळावर आणण्याचे टाळले आहे.अनेक गुऱ्हाळमालकांनी गुळव्यांच्या टंचाईमुळे गुळव्यांचे तंत्र आत्मसात करण्याचा प्रयत्न केला आहे, तर स्थानिक मजुरासह घरातील काही सदस्यांना घेऊन गुऱ्हाळघर चालविण्याचा निर्णय काही गुऱ्हाळ मालकांनी घेतला आहे. दरवर्षी मजुरांची कमतरता जाणवू लागल्याने जिल्ह्यातील गुऱ्हाळघरांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. १४५० गुऱ्हाळघरांसाठी सुमारे ५० ते ६० हजार मजुरांची गरज असताना अवघे २० ते २५ हजार मजूर उपलब्ध होतात. त्यामुळे मजुरांअभावी अनेक गुऱ्हाळघरे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.गुळवे प्रशिक्षण केंद्र स्थापण्याची गरजदरवर्षी मजूर व गुळवे यांची कमतरता भासते. त्याकडे शासनाने लक्ष देऊन अथवा कृषी संशोधन केंद्राने हे प्रशिक्षण केंद्र स्थापन करून गुळवे तयार करण्याची गरज आहे. बाजार समितीकडून प्रशिक्षणाचे आयोजन केले जात नाही. शासन पातळीवर कृषी महाविद्यालयांनी फक्त प्रदर्शनापुरत्या गूळ बनविण्याच्या कार्यशाळा घेतल्या, असे मत कोलोली (ता. पन्हाळा) येथील गुऱ्हाळमालक राजाराम श्रीपती जाधव, डॉ. मानसिंग सर्जेराव जाधव, बाबासो हणमंत जाधव, विकास राजाराम पाटील यांनी व्यक्त केले आहे.