शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

अंबेच्या जयघोषात सुवर्णपालखी अर्पण

By admin | Updated: May 3, 2017 00:52 IST

अंबाबाई मंदिराला नवी झळाळी : नेत्रदीपक सोहळा आणि महाआरतीसाठी भाविकांची अलोट गर्दी

कोल्हापूर : सप्तरंगी फुलांची आरास, इंद्रधनुषी विद्युत रोषणाईने झळाळून निघालेले मंदिर, मराठमोळ्या वाद्यांना लाभलेली दाक्षिणात्य संगीताची साथ, पवित्रानुभूती देणारे मंत्रोच्चार, तीन पीठाधीशांचे आशीर्वचन, ‘अंबामाता की जय!’चा गजर, अखंड पुष्पवर्षाव आणि महाआरतीने आदिशक्ती करवीरनिवासिनी श्री अंबाबाईला सोमवारी (दि. १) सुवर्णपालखी अर्पण करण्यात आली. तब्बल २६ किलो सुवर्णपालखीेचा अर्पण सोहळा ‘याची देही, याची डोळा’ पाहण्यासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती. दोन वर्षांपूर्वी संकल्पित करण्यात आलेल्या या सुवर्णपालखीला देवीचरणी अर्पण करण्यासाठी सुरू असलेल्या जय्यत तयारीने सोमवारी अंतिम रूप घेतले. धार्मिक आणि ऐतिहासिक अधिष्ठान लाभलेल्या भवानी मंडपात साकारलेल्या आणि डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या रंगमंचावर हा सोहळा साकारला. कांचीपुरम् येथील श्री कांची कामकोटी पीठाचे पीठाधीश जयेंद्र सरस्वती स्वामीजी, करवीर पीठाचे शंकराचार्य परमपूज्य श्री विद्यानृसिंह भारती, राघवेंद्र स्वामी मठाचे पीठाधीश परमपूज्य सुबुधेंद्रतीर्थ स्वामीजी यांच्या हस्ते हा सोहळा झाला. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, संध्यादेवी कुपेकर, महापौर हसिना फरास, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, शाहू छत्रपती, जिल्हाधिकारी तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष अविनाश सुभेदार, अरुंधती महाडिक, भरत ओसवाल उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व पीठाधीशांच्या हस्ते सुवर्णपालखी व दस्तऐवज देवस्थान समितीचे अध्यक्ष अविनाश सुभेदार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन झाले. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, आजचा दिवस ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. एकीकडे राज्यातील सर्वांत मोठा ३०३ फुटी ध्वजस्तंभ उभारला गेला; तर दुसरीकडे सुवर्णपालखी देवीला अर्पण करण्यात आली. प्रत्येक चांगल्या कामातच लोकसहभाग आवश्यक असतो. कोल्हापूर हे समृद्ध शहर आहे. आता आपल्याला घेण्याची नाही, तर समाजाला काही देण्याची सवय लावून घेतली पाहिजे. ईश्वरभक्तीत आमच्या भावना गुंतल्या आहेत. संकल्पपूर्तीसाठी आलेल्या अडचणींवर मात करीत साकारलेली ही सुवर्णपालखी म्हणजे देवीला वाहिलेली श्रद्धा आहे. खासदार धनंजय महाडिक म्हणाले, लोकसहभागातून महाराष्ट्रातील एखाद्या देवस्थानासाठी साकारण्यात आलेली ही पहिली सुवर्णपालखी आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून अंबाबाई मंदिराचा विकास आराखडा राबविण्यात येणार आहे. या सगळ्यांमुळे कोल्हापूरची पर्यटनवृद्धी होईल. राघवेंद्र स्वामी पीठाचे पीठाधीश स्वामी सुबुधेंद्रतीर्थ म्हणाले, देवाने आपल्याला दिलेली संपत्ती सार्थ ठरण्यासाठी ती देवालाही समर्पित करावी. जगदंबेला अर्पण करण्यात आलेली ही पालखी म्हणजे ऐतिहासिक घटना आहे. करवीरपीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती म्हणाले, अंबाबाई आणि शंकराचार्य, शंकराचार्य आणि छत्रपती घराणे यांचा पुरातन संबंध आहे. कोल्हापूरकरांनी करवीर पीठात यावे. कांचीपुरम् पीठाचे पीठाधीश जयेंद्र सरस्वती स्वामीजी यांनी प्रत्येक व्यक्तीने आपल्या परंपरांचा अभिमान बाळगावा, त्यांचा गौरव करावा, गुरूंचा आशीर्वाद घ्यायला हवा, असे प्रतिपादन केले. शाहू छत्रपती व महापौर हसिना फरास यांनीही या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. भरत ओसवाल यांनी महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी सुवर्णपालखी साकारलेले हे पहिले पीठ आहे, असे नमूद केले. यावेळी पालखीचे कारागीर गणेश चव्हाण, देवीचंद ओसवाल, केतन शहा यांच्यासह प्रमुख देणगीदारांचा सत्कार करण्यात आला. वेदमूर्ती सुहास जोशी यांनी धार्मिक विधी केले. प्रसन्न मालेकर यांनी सूत्रसंचालन केले. संगीता खाडे यांनी आभार मानले. यावेळी देवस्थान समितीचे सचिव विजय पोवार, सदस्य शिवाजी जाधव, सुवर्णपालखी ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते. पालखी ट्रस्टचे विश्वस्त शिवप्रसाद पाटील यांच्या ब्लू बॉक्स इव्हेंट या संस्थेच्या वतीने या धार्मिक कार्यक्रमासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरून सुरेख व्यासपीठ, थेट प्रक्षेपण, फुलांची आरास असे सुरेख नियोजन करण्यात आले होते. त्यांना अमर पाटील यांचे सहकार्य लाभले. नवरात्रौत्सवाचा अनुभव या सोहळ्यानिमित्त अंबाबाई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती. या मंगलमयी वातावरणाने आणि भाविकांच्या अलोट गर्दीने नवरात्रौत्सवाची आठवण झाली. या सोहळ्यानंतर पालखी गरुड मंडपात भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात आली. त्यानंतर सुवासिनींच्या हस्ते महाआरती करून सोहळ्याची सांगता झाली.महाडिक केंद्रीय मंत्री होतीलभाषणाच्या सुरुवातीलच चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, मी खासदार महाडिक यांना विचारले की, तुम्ही सुवर्णपालखीचा निर्णय कसा घेतलात? देवीला काही नवस बोलला होतात का? यावर महाडिक म्हणाले, देवीने मला सगळं दिले आहे. नवस कशाला बोलू? पण अजूनही त्यांना सगळे मिळालेले नाही. केंद्रीय मंत्रिपद मिळायचे बाकी आहे. त्यांची ही इच्छासुद्धा अंबाबाई पूर्ण करील. आता ते राष्ट्रवादीचे खासदार आहेत; २०१९ नंतर त्यांची ही इच्छा पूर्ण होईल.