शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

बाजार कर घोटाळाप्रकरणी कारवाई गुल - इचलकरंजी नगरपालिका : अहवाल मिळूनही निर्णय प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:08 IST

इचलकरंजी : येथील नगरपालिकेकडील बाजार कर विभागाकडे वसुलीमध्ये लाखो रुपयांचा घोटाळा होत असल्याच्या कारणावरून चौकशीसाठी पथक नेमले होते.

राजाराम पाटील ।इचलकरंजी : येथील नगरपालिकेकडील बाजार कर विभागाकडे वसुलीमध्ये लाखो रुपयांचा घोटाळा होत असल्याच्या कारणावरून चौकशीसाठी पथक नेमले होते. पथकाचा अहवाल महिन्यापूर्वी सादर झाला असतानाही त्याचे निष्कर्ष आणि कारवाई गुलदस्त्यातच राहिल्याने नगरपालिका क्षेत्रात हा विषय चर्चेचा ठरला आहे.

आॅक्टोबर महिन्याच्या तिसºया आठवड्यात दीपावली सण झाल्यानंतर नगरपालिकेकडे वसूल होणारा बाजार कर घटल्याची माहिती उजेडात आली. मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी बाजार कराबाबत प्राथमिक चौकशी केली असता कर वसुलीमध्ये काही गैरव्यवहार होत असल्याचा संशय आला. म्हणून मुख्याधिकाºयांनी अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ. पवन म्हेत्रे यांच्या नियंत्रणाखाली सहाजणांचे चौकशी पथक नेमले.

चौकशी पथकाने शहरातील मुख्य रस्त्यांवर बसणारे फळ विक्रेते, फेरीवाले, तसेच अनेक प्रकारच्या विविध वस्तंूची विक्री करणाºया किरकोळ विक्रेत्यांकडे चौकशी केली. त्याचबरोबर मंगळवारी व शुक्रवारी थोरात चौक, विकली मार्केट, विक्रमनगर, अण्णा रामगोंडा शाळा, डेक्कन चौक, जय सांगली नाका व शहापूर याठिकाणी भरणारे आठवडी बाजार येथेही प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली.

या चौकशीत आणि पाहणीमध्ये काही किरकोळ विक्रेते, फेरीवाले व हातगाडीवरून विक्री करणारे यांच्याकडे गेल्या काही वर्षांत कर वसुलीची पावती झालीच नसल्याचे निदर्शनास आले. त्याचबरोबर काही ठिकाणी बाजार करासाठी आवश्यक असलेले पैसे घेऊनसुद्धा पावती दिली नाही किंवा कमी रकमेची पावती दिली, असेही अनेक प्रकार उघडकीस आले.

अशा प्रकारे बाजार कर चौकशीसाठी नेमलेल्या पथकाकडून डिसेंबर महिन्यात प्रत्यक्ष केलेले सहा वेगवेगळे अहवाल अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ. म्हेत्रे यांच्याकडे सादर केले. अतिरिक्त मुख्याधिकाºयांनी या अहवालावर अभ्यास करून त्याबाबत सारांशाने निष्कर्ष काढणारा अहवाल मुख्याधिकारी डॉ. रसाळ यांच्याकडे सादर केला. सदरचा अहवाल सादर करून साधारणत: महिना लोटला आहे. मात्र, त्याबाबतचे अंतिम निष्कर्ष व कारवाई अद्यापही प्रलंबित आहे.काही फेरीवाल्यांकडे  गेली अनेक वर्षे पावतीच नाहीचौकशी पथकाकडून प्रत्यक्ष पाहणी केली असता थोरात चौकातील खाद्यपदार्थ विक्री करणाºया एका विक्रेत्याकडे गेल्या पंधरा वर्षांहून अधिक काळ कर वसुलीची पावतीच उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. तसेच गेल्या दिवाळीमध्ये मंदीच्या कारणावरून बाजारामध्ये विक्रेते आणि खरेदीदारांची गर्दी कमी झाली होती. त्याचा परिणाम दिवाळीच्या बाजारावर झाला आणि कर वसुलीमध्ये आवश्यकतेपेक्षा जादा घट दाखविण्यात आली, असेही काही जाणकारांचे म्हणणे आहे.

 

टॅग्स :MarketबाजारTaxकर