शहरं
Join us  
Trending Stories
1
निशस्त्र आंदोलकांवर गोळीबार, बॉम्ब टाकण्याचे आदेश, शेख हसीना दोषी, कोर्टाने सुनावली फाशीची शिक्षा 
2
दिल्लीतील स्फोटात बुटाचा वापर, उमरने TATP स्फोटकांचा केला वापर; NIA च्या तपासात खळबळजनक माहिती
3
भाजपाचा यू टर्न! काशिनाथ चौधरींच्या पक्षप्रवेशाला स्थगिती; पालघर साधू हत्याकांडात झाले होते आरोप
4
Delhi Blast : नेपाळमध्ये खरेदी केले ७ सेकंड-हँड फोन, कानपूरमधून ६ सिमकार्ड; दिल्ली स्फोटात मोठा खुलासा
5
Video: माकडाच्या उडीने REEL मध्ये आलं वेगळंच 'थ्रिल' !! घाबरलेल्या मुलीने पुढे काय केलं बघा
6
चाणक्यनीती: कोणी त्रास देत असेल तर अशा हितशत्रूंशी लढण्यासाठी वापरा 'या' ३ गुप्त रणनीती! |
7
"मी मरायला तयार आहे, अनोळखी लोकांनी दिलेल्या अन्नावर जगतोय"; युवीच्या वडिलांना भावना अनावर
8
भारत सरकार शेख हसीना यांना बांगलादेशात परत पाठवणार? नियम काय सांगतात?
9
भाजपानं तिकीट नाकारल्यानं RSS कार्यकर्त्यांनं उचललं टोकाचं पाऊल?; अखेरच्या क्षणी केला होता शिवसेनेशी संपर्क
10
ATM मध्ये दोनदा 'कॅन्सल' बटन दाबल्यास तुमचे पैसे सुरक्षित राहतात? व्हायरल दाव्याचे सत्य काय?
11
Bihar CM: नितीश कुमारच होणार बिहारचे मुख्यमंत्री! भाजप प्रदेशाध्यक्षांनीच गोंधळ थांबवला; म्हणाले, "फक्त..."
12
काय सांगता! वय ९१ वर्षे, रोज १२ तास काम करतात, फिटनेसचे रहस्य वाचून अवाक् व्हाल
13
Amravati: अमरावतीत उपजिल्हा रुग्णालयात तीन बालकांसह गर्भवतीचा दुदैवी अंत!
14
अपघातातील मृत ४२ भारतीयांचे मृतदेह भारतात आणू शकत नाही?; सौदीचा 'हा' नियम ठरतोय अडथळा
15
ओवेसींच्या पाठिंब्याने आमदार बनले काँग्रेसचे नवीन यादव; विजयानंतर पाया पडून मानले आभार
16
UPI Transaction Failed: UPI ट्रान्झॅक्शन फेल झालं? घाबरू नका, त्वरित फॉलो करा 'या' स्टेप्स
17
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला घातल्या गोळ्या!
18
"भारत कुठल्याही युद्धासाठी तयार...!", जनरल द्विवेदी यांचा पाकिस्तानला थेट इशारा; चीनसंदर्भातही बोलले
19
नासिरशी निकाहाचा व्हिडीओ व्हायरल होताच पुन्हा गायब झाली सरबजीत कौर; वकिलाने केलं मोठं वक्तव्य! म्हणाला-
20
Pune Train Accident: पुण्यात भीषण अपघात! दौंडला जाणाऱ्या ट्रेनने उडवले; हडपसरमधील तीन तरुण जागीच ठार
Daily Top 2Weekly Top 5

बाजार कर घोटाळाप्रकरणी कारवाई गुल - इचलकरंजी नगरपालिका : अहवाल मिळूनही निर्णय प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:08 IST

इचलकरंजी : येथील नगरपालिकेकडील बाजार कर विभागाकडे वसुलीमध्ये लाखो रुपयांचा घोटाळा होत असल्याच्या कारणावरून चौकशीसाठी पथक नेमले होते.

राजाराम पाटील ।इचलकरंजी : येथील नगरपालिकेकडील बाजार कर विभागाकडे वसुलीमध्ये लाखो रुपयांचा घोटाळा होत असल्याच्या कारणावरून चौकशीसाठी पथक नेमले होते. पथकाचा अहवाल महिन्यापूर्वी सादर झाला असतानाही त्याचे निष्कर्ष आणि कारवाई गुलदस्त्यातच राहिल्याने नगरपालिका क्षेत्रात हा विषय चर्चेचा ठरला आहे.

आॅक्टोबर महिन्याच्या तिसºया आठवड्यात दीपावली सण झाल्यानंतर नगरपालिकेकडे वसूल होणारा बाजार कर घटल्याची माहिती उजेडात आली. मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी बाजार कराबाबत प्राथमिक चौकशी केली असता कर वसुलीमध्ये काही गैरव्यवहार होत असल्याचा संशय आला. म्हणून मुख्याधिकाºयांनी अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ. पवन म्हेत्रे यांच्या नियंत्रणाखाली सहाजणांचे चौकशी पथक नेमले.

चौकशी पथकाने शहरातील मुख्य रस्त्यांवर बसणारे फळ विक्रेते, फेरीवाले, तसेच अनेक प्रकारच्या विविध वस्तंूची विक्री करणाºया किरकोळ विक्रेत्यांकडे चौकशी केली. त्याचबरोबर मंगळवारी व शुक्रवारी थोरात चौक, विकली मार्केट, विक्रमनगर, अण्णा रामगोंडा शाळा, डेक्कन चौक, जय सांगली नाका व शहापूर याठिकाणी भरणारे आठवडी बाजार येथेही प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली.

या चौकशीत आणि पाहणीमध्ये काही किरकोळ विक्रेते, फेरीवाले व हातगाडीवरून विक्री करणारे यांच्याकडे गेल्या काही वर्षांत कर वसुलीची पावती झालीच नसल्याचे निदर्शनास आले. त्याचबरोबर काही ठिकाणी बाजार करासाठी आवश्यक असलेले पैसे घेऊनसुद्धा पावती दिली नाही किंवा कमी रकमेची पावती दिली, असेही अनेक प्रकार उघडकीस आले.

अशा प्रकारे बाजार कर चौकशीसाठी नेमलेल्या पथकाकडून डिसेंबर महिन्यात प्रत्यक्ष केलेले सहा वेगवेगळे अहवाल अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ. म्हेत्रे यांच्याकडे सादर केले. अतिरिक्त मुख्याधिकाºयांनी या अहवालावर अभ्यास करून त्याबाबत सारांशाने निष्कर्ष काढणारा अहवाल मुख्याधिकारी डॉ. रसाळ यांच्याकडे सादर केला. सदरचा अहवाल सादर करून साधारणत: महिना लोटला आहे. मात्र, त्याबाबतचे अंतिम निष्कर्ष व कारवाई अद्यापही प्रलंबित आहे.काही फेरीवाल्यांकडे  गेली अनेक वर्षे पावतीच नाहीचौकशी पथकाकडून प्रत्यक्ष पाहणी केली असता थोरात चौकातील खाद्यपदार्थ विक्री करणाºया एका विक्रेत्याकडे गेल्या पंधरा वर्षांहून अधिक काळ कर वसुलीची पावतीच उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. तसेच गेल्या दिवाळीमध्ये मंदीच्या कारणावरून बाजारामध्ये विक्रेते आणि खरेदीदारांची गर्दी कमी झाली होती. त्याचा परिणाम दिवाळीच्या बाजारावर झाला आणि कर वसुलीमध्ये आवश्यकतेपेक्षा जादा घट दाखविण्यात आली, असेही काही जाणकारांचे म्हणणे आहे.

 

टॅग्स :MarketबाजारTaxकर