शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

बाजार कर घोटाळाप्रकरणी कारवाई गुल - इचलकरंजी नगरपालिका : अहवाल मिळूनही निर्णय प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:08 IST

इचलकरंजी : येथील नगरपालिकेकडील बाजार कर विभागाकडे वसुलीमध्ये लाखो रुपयांचा घोटाळा होत असल्याच्या कारणावरून चौकशीसाठी पथक नेमले होते.

राजाराम पाटील ।इचलकरंजी : येथील नगरपालिकेकडील बाजार कर विभागाकडे वसुलीमध्ये लाखो रुपयांचा घोटाळा होत असल्याच्या कारणावरून चौकशीसाठी पथक नेमले होते. पथकाचा अहवाल महिन्यापूर्वी सादर झाला असतानाही त्याचे निष्कर्ष आणि कारवाई गुलदस्त्यातच राहिल्याने नगरपालिका क्षेत्रात हा विषय चर्चेचा ठरला आहे.

आॅक्टोबर महिन्याच्या तिसºया आठवड्यात दीपावली सण झाल्यानंतर नगरपालिकेकडे वसूल होणारा बाजार कर घटल्याची माहिती उजेडात आली. मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी बाजार कराबाबत प्राथमिक चौकशी केली असता कर वसुलीमध्ये काही गैरव्यवहार होत असल्याचा संशय आला. म्हणून मुख्याधिकाºयांनी अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ. पवन म्हेत्रे यांच्या नियंत्रणाखाली सहाजणांचे चौकशी पथक नेमले.

चौकशी पथकाने शहरातील मुख्य रस्त्यांवर बसणारे फळ विक्रेते, फेरीवाले, तसेच अनेक प्रकारच्या विविध वस्तंूची विक्री करणाºया किरकोळ विक्रेत्यांकडे चौकशी केली. त्याचबरोबर मंगळवारी व शुक्रवारी थोरात चौक, विकली मार्केट, विक्रमनगर, अण्णा रामगोंडा शाळा, डेक्कन चौक, जय सांगली नाका व शहापूर याठिकाणी भरणारे आठवडी बाजार येथेही प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली.

या चौकशीत आणि पाहणीमध्ये काही किरकोळ विक्रेते, फेरीवाले व हातगाडीवरून विक्री करणारे यांच्याकडे गेल्या काही वर्षांत कर वसुलीची पावती झालीच नसल्याचे निदर्शनास आले. त्याचबरोबर काही ठिकाणी बाजार करासाठी आवश्यक असलेले पैसे घेऊनसुद्धा पावती दिली नाही किंवा कमी रकमेची पावती दिली, असेही अनेक प्रकार उघडकीस आले.

अशा प्रकारे बाजार कर चौकशीसाठी नेमलेल्या पथकाकडून डिसेंबर महिन्यात प्रत्यक्ष केलेले सहा वेगवेगळे अहवाल अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ. म्हेत्रे यांच्याकडे सादर केले. अतिरिक्त मुख्याधिकाºयांनी या अहवालावर अभ्यास करून त्याबाबत सारांशाने निष्कर्ष काढणारा अहवाल मुख्याधिकारी डॉ. रसाळ यांच्याकडे सादर केला. सदरचा अहवाल सादर करून साधारणत: महिना लोटला आहे. मात्र, त्याबाबतचे अंतिम निष्कर्ष व कारवाई अद्यापही प्रलंबित आहे.काही फेरीवाल्यांकडे  गेली अनेक वर्षे पावतीच नाहीचौकशी पथकाकडून प्रत्यक्ष पाहणी केली असता थोरात चौकातील खाद्यपदार्थ विक्री करणाºया एका विक्रेत्याकडे गेल्या पंधरा वर्षांहून अधिक काळ कर वसुलीची पावतीच उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. तसेच गेल्या दिवाळीमध्ये मंदीच्या कारणावरून बाजारामध्ये विक्रेते आणि खरेदीदारांची गर्दी कमी झाली होती. त्याचा परिणाम दिवाळीच्या बाजारावर झाला आणि कर वसुलीमध्ये आवश्यकतेपेक्षा जादा घट दाखविण्यात आली, असेही काही जाणकारांचे म्हणणे आहे.

 

टॅग्स :MarketबाजारTaxकर