शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

कोल्हापुरात गुळाचे सौदे निघाले, दर घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 00:36 IST

कोल्हापूर : कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत हमाली दरवाढीच्या वादामुळे शनिवार (दि. १६)पासून खोळंबलेले गुळाचे सौदे बुधवारी सकाळी पूर्ववत ...

कोल्हापूर : कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत हमाली दरवाढीच्या वादामुळे शनिवार (दि. १६)पासून खोळंबलेले गुळाचे सौदे बुधवारी सकाळी पूर्ववत झाले; पण दरात मात्र क्विंटलमागे २०० ते ६०० रुपयांची घसरण झाली. अडते, हमालांच्या वादात गूळ उत्पादक शेतकरी मात्र भरडला गेला असून, त्याला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे.अडत्यांकडून १० टक्के हमाली दरवाढीच्या मागणीसाठी गेल्या शनिवारपासून बाजार समितीत आंदोलन सुरू आहे. शनिवारी सकाळी सौदा निघाला तरी ३६ हजार रवे शिलाई न केल्याने तसेच पडून राहिले. रविवार (दि. १७) च्या बैठकीत तोडगा निघाला असे गृहीत धरून सोमवारी (दि. १८) आणखी तीन हजार गूळ रव्यांची बाजारात आवक झाली; पण हमाल आणि अडत्यांच्या आंदोलनाने उग्र स्वरूप धारण केल्याने सोमवारी सौदेच निघाले नाहीत. मंगळवारीही (दि. १९) गुंता कायम राहिल्याने सौद्यासाठी माल आलाच नाही.मंगळवारी रात्री तोडगा निघाल्याने बुधवारी सकाळी सौदे पूर्ववत झाले. ९०६९ गूळरव्यांची नव्याने आवक झाली; तर शनिवार ते सोमवार या कालावधीत समितीत आलेल्या १०२९३ गूळरव्यांची विक्री झाली. अजूनही १८ हजार ३८६ रवे शिल्लक असून, त्यांचा सौदा आज, गुरुवारी होणार आहे.दरम्यान, सौदे पूर्ववत झाले पण दरात मात्र घसरण झाली आहे. सरासरी दर ३४०० ते ३५०० रुपये असा स्थिर राहिला असला तरी सर्वांत कमी प्रतीच्या गुळाचा दर २०० रुपयांनी कमी होऊन तो २८०० रुपये क्विंटलवर आला आहे. शनिवारी हाच दर ३००० ते ३१०० रुपये होता. हीच परिस्थिती एक नंबरच्या गुळाची आहे. शनिवारी सरासरी ४५०० ते ४८०० रुपये असणारा दर आता ३६०० ते ४१०० रुपयांपर्यंत खाली आला आहे. कमाल दरात ४०० ते ६०० रुपयांची घसरण झाल्याचे दिसत आहे. एक किलो गुळाचे ९२०० बॉक्स सौद्याला होते. त्याच्याही दरात १०० रुपयांची घसरण झाली.गुळाच्या दर्जानुसार रोजचे दर बदलत असतात; पण हंगाम सुरू झाल्यापासून सातत्याने ४००० रुपये क्विंटलच्या वर असणारे दर आता मात्र त्याच्याही खाली आल्याने गूळ उत्पादकांची अस्वस्थता आणि नाराजी वाढली आहे. अडते आणि हमालांच्या वादात शेतकरी नाहक भरडला गेल्याने आता गुळ उत्पादकामधून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या असून, बाजार समितीचे बोटचेपे धोरणच याला कारणीभूत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.गूळ उत्पादक शेतकरी अक्षरश: रस्त्यावरचार दिवसांनंतर सौदे सुरू झाल्यामुळे आनंद वाटला; पण प्रत्यक्षात सौदे सुरू झाल्यानंतर अडते, व्यापाऱ्यांकडून लूटच सुरू झाली. जो गूळ शनिवारी किमान ३६०० रुपये क्विंटलने विकला गेला होता, तोच गूळ आता ३१०० ते ३२०० रुपयांना द्यावा लागला. मुळातच ३८०० ते ३९०० रुपये किमान भाव मिळाला तर ‘ना नफा - ना तोटा’ या तत्त्वावर गुºहाळघर चालविता येते. आता त्याच्याही खाली दर आल्याने गूळ उत्पादक शेतकरी अक्षरश: रस्त्यावर आला आहे.- राजू पाटील,गूळ उत्पादक, निगवे, ता. करवीर