शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात गुळाचे सौदे निघाले, दर घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 00:36 IST

कोल्हापूर : कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत हमाली दरवाढीच्या वादामुळे शनिवार (दि. १६)पासून खोळंबलेले गुळाचे सौदे बुधवारी सकाळी पूर्ववत ...

कोल्हापूर : कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत हमाली दरवाढीच्या वादामुळे शनिवार (दि. १६)पासून खोळंबलेले गुळाचे सौदे बुधवारी सकाळी पूर्ववत झाले; पण दरात मात्र क्विंटलमागे २०० ते ६०० रुपयांची घसरण झाली. अडते, हमालांच्या वादात गूळ उत्पादक शेतकरी मात्र भरडला गेला असून, त्याला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे.अडत्यांकडून १० टक्के हमाली दरवाढीच्या मागणीसाठी गेल्या शनिवारपासून बाजार समितीत आंदोलन सुरू आहे. शनिवारी सकाळी सौदा निघाला तरी ३६ हजार रवे शिलाई न केल्याने तसेच पडून राहिले. रविवार (दि. १७) च्या बैठकीत तोडगा निघाला असे गृहीत धरून सोमवारी (दि. १८) आणखी तीन हजार गूळ रव्यांची बाजारात आवक झाली; पण हमाल आणि अडत्यांच्या आंदोलनाने उग्र स्वरूप धारण केल्याने सोमवारी सौदेच निघाले नाहीत. मंगळवारीही (दि. १९) गुंता कायम राहिल्याने सौद्यासाठी माल आलाच नाही.मंगळवारी रात्री तोडगा निघाल्याने बुधवारी सकाळी सौदे पूर्ववत झाले. ९०६९ गूळरव्यांची नव्याने आवक झाली; तर शनिवार ते सोमवार या कालावधीत समितीत आलेल्या १०२९३ गूळरव्यांची विक्री झाली. अजूनही १८ हजार ३८६ रवे शिल्लक असून, त्यांचा सौदा आज, गुरुवारी होणार आहे.दरम्यान, सौदे पूर्ववत झाले पण दरात मात्र घसरण झाली आहे. सरासरी दर ३४०० ते ३५०० रुपये असा स्थिर राहिला असला तरी सर्वांत कमी प्रतीच्या गुळाचा दर २०० रुपयांनी कमी होऊन तो २८०० रुपये क्विंटलवर आला आहे. शनिवारी हाच दर ३००० ते ३१०० रुपये होता. हीच परिस्थिती एक नंबरच्या गुळाची आहे. शनिवारी सरासरी ४५०० ते ४८०० रुपये असणारा दर आता ३६०० ते ४१०० रुपयांपर्यंत खाली आला आहे. कमाल दरात ४०० ते ६०० रुपयांची घसरण झाल्याचे दिसत आहे. एक किलो गुळाचे ९२०० बॉक्स सौद्याला होते. त्याच्याही दरात १०० रुपयांची घसरण झाली.गुळाच्या दर्जानुसार रोजचे दर बदलत असतात; पण हंगाम सुरू झाल्यापासून सातत्याने ४००० रुपये क्विंटलच्या वर असणारे दर आता मात्र त्याच्याही खाली आल्याने गूळ उत्पादकांची अस्वस्थता आणि नाराजी वाढली आहे. अडते आणि हमालांच्या वादात शेतकरी नाहक भरडला गेल्याने आता गुळ उत्पादकामधून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या असून, बाजार समितीचे बोटचेपे धोरणच याला कारणीभूत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.गूळ उत्पादक शेतकरी अक्षरश: रस्त्यावरचार दिवसांनंतर सौदे सुरू झाल्यामुळे आनंद वाटला; पण प्रत्यक्षात सौदे सुरू झाल्यानंतर अडते, व्यापाऱ्यांकडून लूटच सुरू झाली. जो गूळ शनिवारी किमान ३६०० रुपये क्विंटलने विकला गेला होता, तोच गूळ आता ३१०० ते ३२०० रुपयांना द्यावा लागला. मुळातच ३८०० ते ३९०० रुपये किमान भाव मिळाला तर ‘ना नफा - ना तोटा’ या तत्त्वावर गुºहाळघर चालविता येते. आता त्याच्याही खाली दर आल्याने गूळ उत्पादक शेतकरी अक्षरश: रस्त्यावर आला आहे.- राजू पाटील,गूळ उत्पादक, निगवे, ता. करवीर