शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
4
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
5
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
6
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
7
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
8
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
9
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
10
भाजपा नगसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
11
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
12
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
13
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
14
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
15
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
16
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
17
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
18
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
19
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
20
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?

कोल्हापुरात गुळाचे सौदे निघाले, दर घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 00:36 IST

कोल्हापूर : कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत हमाली दरवाढीच्या वादामुळे शनिवार (दि. १६)पासून खोळंबलेले गुळाचे सौदे बुधवारी सकाळी पूर्ववत ...

कोल्हापूर : कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत हमाली दरवाढीच्या वादामुळे शनिवार (दि. १६)पासून खोळंबलेले गुळाचे सौदे बुधवारी सकाळी पूर्ववत झाले; पण दरात मात्र क्विंटलमागे २०० ते ६०० रुपयांची घसरण झाली. अडते, हमालांच्या वादात गूळ उत्पादक शेतकरी मात्र भरडला गेला असून, त्याला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे.अडत्यांकडून १० टक्के हमाली दरवाढीच्या मागणीसाठी गेल्या शनिवारपासून बाजार समितीत आंदोलन सुरू आहे. शनिवारी सकाळी सौदा निघाला तरी ३६ हजार रवे शिलाई न केल्याने तसेच पडून राहिले. रविवार (दि. १७) च्या बैठकीत तोडगा निघाला असे गृहीत धरून सोमवारी (दि. १८) आणखी तीन हजार गूळ रव्यांची बाजारात आवक झाली; पण हमाल आणि अडत्यांच्या आंदोलनाने उग्र स्वरूप धारण केल्याने सोमवारी सौदेच निघाले नाहीत. मंगळवारीही (दि. १९) गुंता कायम राहिल्याने सौद्यासाठी माल आलाच नाही.मंगळवारी रात्री तोडगा निघाल्याने बुधवारी सकाळी सौदे पूर्ववत झाले. ९०६९ गूळरव्यांची नव्याने आवक झाली; तर शनिवार ते सोमवार या कालावधीत समितीत आलेल्या १०२९३ गूळरव्यांची विक्री झाली. अजूनही १८ हजार ३८६ रवे शिल्लक असून, त्यांचा सौदा आज, गुरुवारी होणार आहे.दरम्यान, सौदे पूर्ववत झाले पण दरात मात्र घसरण झाली आहे. सरासरी दर ३४०० ते ३५०० रुपये असा स्थिर राहिला असला तरी सर्वांत कमी प्रतीच्या गुळाचा दर २०० रुपयांनी कमी होऊन तो २८०० रुपये क्विंटलवर आला आहे. शनिवारी हाच दर ३००० ते ३१०० रुपये होता. हीच परिस्थिती एक नंबरच्या गुळाची आहे. शनिवारी सरासरी ४५०० ते ४८०० रुपये असणारा दर आता ३६०० ते ४१०० रुपयांपर्यंत खाली आला आहे. कमाल दरात ४०० ते ६०० रुपयांची घसरण झाल्याचे दिसत आहे. एक किलो गुळाचे ९२०० बॉक्स सौद्याला होते. त्याच्याही दरात १०० रुपयांची घसरण झाली.गुळाच्या दर्जानुसार रोजचे दर बदलत असतात; पण हंगाम सुरू झाल्यापासून सातत्याने ४००० रुपये क्विंटलच्या वर असणारे दर आता मात्र त्याच्याही खाली आल्याने गूळ उत्पादकांची अस्वस्थता आणि नाराजी वाढली आहे. अडते आणि हमालांच्या वादात शेतकरी नाहक भरडला गेल्याने आता गुळ उत्पादकामधून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या असून, बाजार समितीचे बोटचेपे धोरणच याला कारणीभूत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.गूळ उत्पादक शेतकरी अक्षरश: रस्त्यावरचार दिवसांनंतर सौदे सुरू झाल्यामुळे आनंद वाटला; पण प्रत्यक्षात सौदे सुरू झाल्यानंतर अडते, व्यापाऱ्यांकडून लूटच सुरू झाली. जो गूळ शनिवारी किमान ३६०० रुपये क्विंटलने विकला गेला होता, तोच गूळ आता ३१०० ते ३२०० रुपयांना द्यावा लागला. मुळातच ३८०० ते ३९०० रुपये किमान भाव मिळाला तर ‘ना नफा - ना तोटा’ या तत्त्वावर गुºहाळघर चालविता येते. आता त्याच्याही खाली दर आल्याने गूळ उत्पादक शेतकरी अक्षरश: रस्त्यावर आला आहे.- राजू पाटील,गूळ उत्पादक, निगवे, ता. करवीर