शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
2
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
3
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
4
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
5
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
6
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
7
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
8
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
9
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
10
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
11
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
12
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."
13
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
14
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
15
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
16
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
17
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
18
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
20
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!

‘गोकूळ’मध्ये नेत्यांचा निरोप आला की मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकूळ’मध्ये सत्ताधारी नेत्यांचा निरोप आला की कोणत्याही विषयाला मंजुरी द्यायची, ही पद्धत आहे. यालाच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ‘गोकूळ’मध्ये सत्ताधारी नेत्यांचा निरोप आला की कोणत्याही विषयाला मंजुरी द्यायची, ही पद्धत आहे. यालाच आपला विरोध होता. संघाचा हिताचा जरी मुद्दा असला तरी तो कोणी मांडला यालाच महत्त्व दिल्याने गेल्या पाच वर्षात अनेक निर्णय चुकीचे झाले, असा आरोप ‘गोकूळ’चे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

‘गोकूळ’चा डोलारा म्हैशीच्या दुधावर आहे, केवळ गायीवर संघ चालला नसता. अलीकडील काळात दूध वाढले, याला कारण संकलन विभाग आहे. खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केले. मात्र मार्केटिंगमध्ये खूप मागे राहिलो आहे. भविष्याची वाटचाल म्हणून नेतृत्वाने काहीच करू दिले नाही. आपल्या अध्यक्ष पदाच्या तीन वर्षाच्या कालावधीत संघाच्या प्रगतीचा आलेख चढा राहिला आहे, एक लाख लीटर दूध संकलन वाढविले. आनंदराव पाटील-चुयेकर यांचा विचार घेऊन काम केले. मात्र अलीकडे नेत्यांचा निरोप आला की त्यावर चर्चा न करताच मंजुरी देण्याची प्रथा सुरू झाली, त्याला संचालक मंडळातील ८० टक्के लोक हाेय म्हणायचे. आम्ही संघाचे हिताचे विषय मांडले की त्याला दुर्लक्षित करायचे, असे अरुण डोंगळे यांनी सांगितले.

बारा लाख संकलन, भरती मात्र २० लाखांची

देशातील अनेक नामवंत दूध संघ कमी कर्मचाऱ्यांवर अतिशय उत्तम सुरू आहेत. पाचशे कर्मचाऱ्यांवर ४० लाख दूध संकलन करणारे संघही आहेत. ‘गोकूळ’मध्ये मात्र १२ लाख दूध संकलन असताना २० लाख लीटर दूध संकलनाएवढी नोकरभरती केल्याचा आरोप डोंगळे यांनी केला.