शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

गो. मा. पवार यांचे कोल्हापूरशी घनिष्ठ संबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 23:51 IST

कोल्हापूर : लेखनाला केवळ साहित्य, संस्कृती आणि वाङ्मयापुरते मर्यादित न ठेवता त्याला समाजशास्त्राशीही जोडू पाहणारे लेखक गो. मा. पवार ...

कोल्हापूर : लेखनाला केवळ साहित्य, संस्कृती आणि वाङ्मयापुरते मर्यादित न ठेवता त्याला समाजशास्त्राशीही जोडू पाहणारे लेखक गो. मा. पवार यांचा कोल्हापूरशी ऋणानुबंध होता. शिवाजी विद्यापीठात मराठी विभागप्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी आपल्या सर्जनशील उपक्रमांनी या विभागाचा राज्यात दबदबा निर्माण केला. त्यांच्या मुशीत अनेक लेखक घडले.आधुनिक मराठी साहित्याचे पाठीराखे म्हणून पवार यांचे नाव घेता येईल. शिवाजी विद्यापीठात पहिले विभागप्रमुख म्हणून घेतलेल्या जबाबदारीपासून ते दर्जेदार अभ्यासक्रम, सर्जनशील उपक्रम आणि तज्ज्ञ लेखकांशी मुक्तसंवादातून त्यांनी नवलेखक घडविले. ‘दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभे’च्या वतीने पेठवडगाव येथे भरविण्यात आलेल्या अधिवेशनात त्यांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.विद्यापीठ हे त्यांचे मुख्य कार्यक्षेत्र असले तरी समाजवादी विचारसरणी असल्याने कोल्हापूरच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनाशी त्यांची नाळ जुळली होती. मराठीला वाङ्मयाच्या चौकटीत न बसविता तिला सामाजिकशास्त्राची जोड मिळावी यासाठी त्यांची धडपड असायची. ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील, कामगार नेते गोविंद पानसरे यांच्याशी त्यांची घट्ट मैत्री जुळली ती या विचारांच्या धाग्यामुळेच. शाहू छत्रपती यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. साहित्यक्षेत्रात रणजित देसाई, शिवाजी सावंत अशा लेखकांशी त्यांचा कायम संवाद असायचा.मराठी विभागाची उभारणीज्येष्ठ समीक्षक डॉ. गो. मा. पवार हे सन १९७९ मध्ये शिवाजी विद्यापीठामध्ये रुजू झाले. त्यांनी विद्यापीठातील मराठी विभागाची उभारणी केली. या विभागाचे ते पहिले प्रमुख होते. आपल्या कारकिर्दीत त्यांनी ज्येष्ठ साहित्यिक, वक्ते, कवी यांना निमंत्रित करून त्यांची चर्चासत्रे, व्याख्यानांचे आयोजन असे विविध उपक्रम सुरू केले. १९८४ साली त्यांनी ‘मराठी साहित्य : प्रेरणा आणि समाज’ या विषयावर आयोजित केलेल्या चर्चासत्रानंतर शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे नाव राज्यातील अन्य विद्यापीठांमध्येही आदराने घेतले जाऊ लागले. या विभागाचा वेगळा दबदबा त्यांनी निर्माण केला. ते १९९२ पर्यंत कार्यरत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १० विद्यार्थ्यांनी पीएच.डी., तर २२ विद्यार्थ्यांनी एम. फिल. पदवी संपादन केली आहे.विद्यापीठात महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जीवन, कार्याचा अभ्यास आणि संशोधन होण्यासाठी अध्यासन स्थापन करण्याबाबत डॉ. पवार यांनी विद्यापीठाच्या प्रशासनाला सुचविले होते. त्यानुसार सन २००० मध्ये विद्यापीठात ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासना’ची स्थापना करण्यात आली.डॉ. गो. मां.ची ग्रंथसंपदाच्विनोद : तत्त्व व स्वरूपच्मराठी विनोद : विविध अविष्काररूपेच्निवडक फिरक्याच्निवडक मराठी समीक्षाच्महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : जीवन व कार्यच्निवडक महर्षी विठ्ठल रामजी शिंदेच्महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : भारतीय साहित्याचे निर्मातेच्महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : समग्र वाङ्मय खंड १ व २च्द लाईफ अँड वर्क्स आॅफ महर्षी विठ्ठल रामजी शिंदेमिळालेले सन्मानच्साहित्य अकादमी पुरस्कार नवी दिल्ली च्भैरूरतन दमाणी पुरस्कार सोलापूर च्शिवगिरीजा प्रतिष्ठान पुरस्कार, कुर्डूवाडी च्रा. ना. चव्हाण प्रतिष्ठानचा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार, वाई च्पद्मश्री विखे-पाटील साहित्य पुरस्कार, प्रवरा नगर च्महाराष्ट्र फाउंडेशन मराठी साहित्य पुरस्कार, मुंबई च्महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार,च्धोंडिराम माने साहित्यरत्न पुरस्कार, औरंगाबादच्शरद प्रतिष्ठानचा शरद पुरस्कार, सोलापूर च्मराठवाडा साहित्य परिषदेचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार, औरंगाबादज्येष्ठ साहित्यिक गो. मा. पवार यांच्या निधनामुळे साहित्य क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अतिशय दु:ख होत आहे. शिवाजी विद्यापीठातील मराठी अधिविभागाच्या उभारणीत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी रुजू झाल्यानंतर ते मला भेटून गेले होते. एका मोठ्या साहित्यिकाला आपण मुकलो आहोत.- कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे,शिवाजी विद्यापीठ