शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बांधावर जावून कृषी आराखडा तयार करा : मंत्री दादा भुसे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 18:01 IST

collectorOffice Minister Farmer Kolhapur- कोल्हापूर जिल्ह्यात ग्राम कृषी विकास समिती स्थापन करण्यात यावी. समितीच्या माध्यमातून प्रत्यक्ष शेतावर जावून अधिकाऱ्यांनी सत्य परिस्थिती पाहावी व त्यावर आधारित कृषी आराखडा सादर करावा, असे निर्देश कृषी मंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी दिले.

ठळक मुद्देबांधावर जावून कृषी आराखडा तयार करा : मंत्री दादा भुसे  खरीप हंगामपूर्व तयारी बैठकीत सुचना

कोल्हापूर : जिल्ह्यात ग्राम कृषी विकास समिती स्थापन करण्यात यावी. समितीच्या माध्यमातून प्रत्यक्ष शेतावर जावून अधिकाऱ्यांनी सत्य परिस्थिती पाहावी व त्यावर आधारित कृषी आराखडा सादर करावा, असे निर्देश कृषी मंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व तयारी बैठकीत त्यांनी व्हिसीद्वारे अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी आमदारऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, कृषी सहसंचालक उमेश पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, आत्माच्या प्रकल्प संचालक सुनंदा कुऱ्हाडे, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, उल्हास पाटील आदी उपस्थित होते.मंत्री भुसे म्हणाले, चालू वर्षी वेधशाळेने चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. कोणत्या पिकाखाली किती क्षेत्र येणार आहे, कोणत्या ठिकाणी किती पाऊस होतो, कोणत्या प्रकारची पिके किती क्षेत्रावर होतात याबाबतची वस्तूनिष्ठ आकडेवारी हवी. त्यासाठी अधिकाऱ्यांनी शेतावर जाणे आवश्यक आहे. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत खराब होत असून माणसांवरही त्याचे दुष्परिणाम होत आहेत. तरी खतांच्या १० टक्के कमी वापराबद्दल नियोजन करावे, चहाची शेती व कृषी पर्यटनाबाबत नाविण्यपूर्ण प्रयोग करून शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे. पीक कर्ज लवकर कसे उपलब्ध होईल याबाबतही नियोजन करा

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीAgriculture Sectorशेती क्षेत्रministerमंत्रीkolhapurकोल्हापूर