शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

बांधावर जावून कृषी आराखडा तयार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:23 IST

कोल्हापूर : जिल्ह्यात ग्राम कृषी विकास समिती स्थापन करण्यात यावी. समितीच्या माध्यमातून प्रत्यक्ष शेतावर जावून अधिकाऱ्यांनी सत्य परिस्थिती पाहावी ...

कोल्हापूर : जिल्ह्यात ग्राम कृषी विकास समिती स्थापन करण्यात यावी. समितीच्या माध्यमातून प्रत्यक्ष शेतावर जावून अधिकाऱ्यांनी सत्य परिस्थिती पाहावी व त्यावर आधारित कृषी आराखडा सादर करावा, असे निर्देश कृषी मंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व तयारी बैठकीत त्यांनी व्हिसीद्वारे अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी आमदार

ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, कृषी सहसंचालक उमेश पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, आत्माच्या प्रकल्प संचालक सुनंदा कुऱ्हाडे, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, उल्हास पाटील आदी उपस्थित होते.

मंत्री भुसे म्हणाले की, चालू वर्षी वेधशाळेने चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. कोणत्या पिकाखाली किती क्षेत्र येणार आहे, कोणत्या ठिकाणी किती पाऊस होतो, कोणत्या प्रकारची पिके किती क्षेत्रावर होतात, याबाबतची वस्तूनिष्ठ आकडेवारी हवी. त्यासाठी अधिकाऱ्यांनी शेतावर जाणे आवश्यक आहे. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत खराब होत असून, माणसांवरही त्याचे दुष्परिणाम होत आहेत. तरी खतांच्या १० टक्के कमी वापराबद्दल नियोजन करावे, चहाची शेती व कृषी पर्यटनाबाबत नाविण्यपूर्ण प्रयोग करून शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे. पीक कर्ज लवकर कसे उपलब्ध होईल, याबाबतही नियोजन करा

-

एक खिडकी योजना

मंत्री भुसे म्हणाले की, शेतकऱ्यांना त्यांच्या समस्या, अडीअडचणी मांडण्यासाठी आणि त्या सोडवण्यासाठी आयुक्त कार्यालयात एक खिडकी योजना राबवावी. युरियासोबतच कोणत्या जिल्ह्यात किती वाण लागतो, याचा अभ्यास करून बफर स्टॉक करावा.

--

फोटो नं ०९०४२०२१-कोल-कृषी बैठक

ओळ : कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी आयोजित राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व तयारी बैठकीत कृषी मंत्री दादा भुसे यांनी व्हिसीद्वारे अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

-