शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

‘बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 23:59 IST

इंद्रजित देशमुख पाठीमागे आपण ज्ञानोबारायांनी सांगितलेले दैवी गुण चिंतित असताना अभय या गुणाबद्दल चिंतन केलं होतं. अभयासोबत सलगच आणखीन ...

इंद्रजित देशमुखपाठीमागे आपण ज्ञानोबारायांनी सांगितलेले दैवी गुण चिंतित असताना अभय या गुणाबद्दल चिंतन केलं होतं. अभयासोबत सलगच आणखीन एक गुण माउलींनी चिंतिलेला आहे आणि तो म्हणजे शुद्ध व सात्विक बुद्धी होय. खरंतर आत्मविकसनासाठी आम्हाला जी धडपड करावी लागते त्या सर्व धडपडीच्या प्रयत्नांमध्ये आवश्यक असणारी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे शुद्ध सत्त्वात्मक बुद्धी होय. यासाठीच या बुद्धीला सत्व संशुद्धी असं म्हटलं गेलेलं आहे. या संशुद्धीच्या जोरावर आमचा भौतिक आणि आध्यात्मिक प्रवास सुगम होऊ शकतो आणि म्हणूनच आमच्याकडे ही बुद्धी असणे गरजेचे आहे. व्यक्ती, परिस्थिती, घटना यातून निर्माण झालेले चुकीचे संस्कार आणि त्या संस्कारांमुळे बुद्धीला आलेले मालिन्य एकदा निरसित झाले की, जी शिल्लक उरते ती म्हणजेच शुद्ध सत्त्वात्मक बुद्धी होय.निसर्गातील प्राणीचक्राची निर्मिती होत असताना माणूस नावाचा एक देखणा प्राणी मोठ्या वैशिष्ट्याने निर्मिला गेला आहे. अगदी संतांच्या शब्दात सांगायचं झालं तरआहार निद्रा भय मैथुन।सर्व योनिशी समसमान।परी मनुष्यदेहीचे ज्ञान।अधिक जान सर्वाशी।।माणूस नावाच्या प्राण्याची निर्मिती करत असताना त्याला एक वेगळेपण लाभलेले आहे. ते वेगळेपण म्हणजेच आहार, निद्रा, भय आणि मैथुन. यापेक्षा वेगळी असणारी बुद्धिमत्ता किंवा बुद्धिमत्तेच्या आधारावर पृथक्करण करता येणारं ज्ञान माणसाला अधिक मिळालेलंआहे. या बुद्धी वापराच्या जोरावरच माणूस भौतिक आणि आध्यात्मिक प्रगती करू पाहतो किंवा करू शकतो. भौतिक विश्वामध्ये माणसाने आपल्या जीवनामध्ये सुख किंवा सहजता येण्यासाठी कितीतरी प्रतिकूल गोष्टींना अनुकूलतेत परावर्तित केलेलं आहे. अगदी सहजगत्या सांगायचं झालं तर तुमच्या, माझ्याभोवती असणाऱ्या कितीतरी कष्ट कमी करणाºया गोष्टी माणसाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर संशोधित केलेल्या आहेत आणि या संशोधनात्मकतेच्या जोरावर माणूस आपलं जीवन सुगम करू पाहतो आहे. हा चमत्काराप्रमाणे वाटणारा बदल माणसाला लाभलेल्या बुद्धी नावाच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणामुळेच झालेला आहे.वास्तविक आपल्याला लाभलेला बुद्धी नावाचा देखणा गुण जसा विकासासाठी कारणीभूत असतो तसाच विनाशासाठीसुद्धा कारणीभूत असू शकतो. त्याला कारण असतं त्या बुद्धीवर झालेला संस्कार आणि त्यानुसार त्या बुद्धीचा झालेला योग्य किंवा अयोग्य वापर. जीवनात भेटलेली माणसं, त्या माणसांच्याकडून केलेलं वेगवेगळ्या गोष्टींचं अनुकरण व त्याच अंत:करणात झालेलं प्रतिबिंबनं आणि त्यास अनुसरून होणारं वर्तन यावरूनच ठरतं की, आपल्याकडून या बुद्धीवापरामुळे विकास होणार की विनाश. इथे एक गोष्ट मात्र नक्की आहे विनाशासाठी किंवा विकासासाठी कारण बुद्धिमत्ताच असते, पण त्या बुद्धीवर कोणाच्या संपर्कातील आणि कोणतं संस्करण झालं हे महत्त्वाचं असतं. एकाच घरात एकाच आईबापाच्या पोटी जन्माला आलेली चार लेकरं वर्तनाच्या बाबतीत एकसंगत असू शकत नाहीत हा विसंवाद त्या चार लेकरांनी अनुसरलेल्या बुद्धी धारणेमुळे होत असतो. बुद्धीवर झालेल्या शुद्ध व सात्विक संस्कारामुळेच कुणी जगाच्या हिताचा विचार करतो आणि स्वत:च्या सर्व तºहेच्या स्वार्थाला दूर दूर फेकून देतो, तर कुणी स्वत:च्या अंत:करणाचं अंथरूण जगाच्या वाटेवर पसरतो आणि जगाचा त्रास कमी करतो.इतरांच्या डोळ्यात अश्रू पाहून त्या संवेदनेने तो स्वत:ही व्याकुळ होतो. इतरांच्या आनंदात स्वत:ला खूप आनंदी समजतो. इतरांच्या हिताची वांच्छना करतो. जगाचे कल्याण चिंतित असतो. हा सगळा सात्विक आविष्कार या शुद्ध आणि सात्विक बुद्धी धारणेमुळे होत असतो आणि यातूनच या बुद्धीला परत परत महत्त्व प्राप्त होत असतं. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज आपल्या हरिपाठामध्ये म्हणतात ‘बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे’(लेखक : संत साहित्याचे अभ्यासक व परिवर्तनशील वक्ते आहेत)