शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

‘बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 23:59 IST

इंद्रजित देशमुख पाठीमागे आपण ज्ञानोबारायांनी सांगितलेले दैवी गुण चिंतित असताना अभय या गुणाबद्दल चिंतन केलं होतं. अभयासोबत सलगच आणखीन ...

इंद्रजित देशमुखपाठीमागे आपण ज्ञानोबारायांनी सांगितलेले दैवी गुण चिंतित असताना अभय या गुणाबद्दल चिंतन केलं होतं. अभयासोबत सलगच आणखीन एक गुण माउलींनी चिंतिलेला आहे आणि तो म्हणजे शुद्ध व सात्विक बुद्धी होय. खरंतर आत्मविकसनासाठी आम्हाला जी धडपड करावी लागते त्या सर्व धडपडीच्या प्रयत्नांमध्ये आवश्यक असणारी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे शुद्ध सत्त्वात्मक बुद्धी होय. यासाठीच या बुद्धीला सत्व संशुद्धी असं म्हटलं गेलेलं आहे. या संशुद्धीच्या जोरावर आमचा भौतिक आणि आध्यात्मिक प्रवास सुगम होऊ शकतो आणि म्हणूनच आमच्याकडे ही बुद्धी असणे गरजेचे आहे. व्यक्ती, परिस्थिती, घटना यातून निर्माण झालेले चुकीचे संस्कार आणि त्या संस्कारांमुळे बुद्धीला आलेले मालिन्य एकदा निरसित झाले की, जी शिल्लक उरते ती म्हणजेच शुद्ध सत्त्वात्मक बुद्धी होय.निसर्गातील प्राणीचक्राची निर्मिती होत असताना माणूस नावाचा एक देखणा प्राणी मोठ्या वैशिष्ट्याने निर्मिला गेला आहे. अगदी संतांच्या शब्दात सांगायचं झालं तरआहार निद्रा भय मैथुन।सर्व योनिशी समसमान।परी मनुष्यदेहीचे ज्ञान।अधिक जान सर्वाशी।।माणूस नावाच्या प्राण्याची निर्मिती करत असताना त्याला एक वेगळेपण लाभलेले आहे. ते वेगळेपण म्हणजेच आहार, निद्रा, भय आणि मैथुन. यापेक्षा वेगळी असणारी बुद्धिमत्ता किंवा बुद्धिमत्तेच्या आधारावर पृथक्करण करता येणारं ज्ञान माणसाला अधिक मिळालेलंआहे. या बुद्धी वापराच्या जोरावरच माणूस भौतिक आणि आध्यात्मिक प्रगती करू पाहतो किंवा करू शकतो. भौतिक विश्वामध्ये माणसाने आपल्या जीवनामध्ये सुख किंवा सहजता येण्यासाठी कितीतरी प्रतिकूल गोष्टींना अनुकूलतेत परावर्तित केलेलं आहे. अगदी सहजगत्या सांगायचं झालं तर तुमच्या, माझ्याभोवती असणाऱ्या कितीतरी कष्ट कमी करणाºया गोष्टी माणसाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर संशोधित केलेल्या आहेत आणि या संशोधनात्मकतेच्या जोरावर माणूस आपलं जीवन सुगम करू पाहतो आहे. हा चमत्काराप्रमाणे वाटणारा बदल माणसाला लाभलेल्या बुद्धी नावाच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणामुळेच झालेला आहे.वास्तविक आपल्याला लाभलेला बुद्धी नावाचा देखणा गुण जसा विकासासाठी कारणीभूत असतो तसाच विनाशासाठीसुद्धा कारणीभूत असू शकतो. त्याला कारण असतं त्या बुद्धीवर झालेला संस्कार आणि त्यानुसार त्या बुद्धीचा झालेला योग्य किंवा अयोग्य वापर. जीवनात भेटलेली माणसं, त्या माणसांच्याकडून केलेलं वेगवेगळ्या गोष्टींचं अनुकरण व त्याच अंत:करणात झालेलं प्रतिबिंबनं आणि त्यास अनुसरून होणारं वर्तन यावरूनच ठरतं की, आपल्याकडून या बुद्धीवापरामुळे विकास होणार की विनाश. इथे एक गोष्ट मात्र नक्की आहे विनाशासाठी किंवा विकासासाठी कारण बुद्धिमत्ताच असते, पण त्या बुद्धीवर कोणाच्या संपर्कातील आणि कोणतं संस्करण झालं हे महत्त्वाचं असतं. एकाच घरात एकाच आईबापाच्या पोटी जन्माला आलेली चार लेकरं वर्तनाच्या बाबतीत एकसंगत असू शकत नाहीत हा विसंवाद त्या चार लेकरांनी अनुसरलेल्या बुद्धी धारणेमुळे होत असतो. बुद्धीवर झालेल्या शुद्ध व सात्विक संस्कारामुळेच कुणी जगाच्या हिताचा विचार करतो आणि स्वत:च्या सर्व तºहेच्या स्वार्थाला दूर दूर फेकून देतो, तर कुणी स्वत:च्या अंत:करणाचं अंथरूण जगाच्या वाटेवर पसरतो आणि जगाचा त्रास कमी करतो.इतरांच्या डोळ्यात अश्रू पाहून त्या संवेदनेने तो स्वत:ही व्याकुळ होतो. इतरांच्या आनंदात स्वत:ला खूप आनंदी समजतो. इतरांच्या हिताची वांच्छना करतो. जगाचे कल्याण चिंतित असतो. हा सगळा सात्विक आविष्कार या शुद्ध आणि सात्विक बुद्धी धारणेमुळे होत असतो आणि यातूनच या बुद्धीला परत परत महत्त्व प्राप्त होत असतं. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज आपल्या हरिपाठामध्ये म्हणतात ‘बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे’(लेखक : संत साहित्याचे अभ्यासक व परिवर्तनशील वक्ते आहेत)