शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
3
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
4
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
5
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
6
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
7
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
8
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
9
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
10
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
11
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
12
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
13
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
14
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
15
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
16
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
17
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
18
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
19
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
20
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पर्यटनाला चालना देणार : सुभेदार

By admin | Updated: April 27, 2017 01:00 IST

जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारला

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा हा नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आहे. जिल्ह्यात पर्यटन विकासाला प्राधान्य देऊन अ‍ॅग्रो टुरिझमचा विकास करून शेतकरी बांधवांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू. याबरोबरच जोतिबा परिसरासह जिल्ह्यातील सर्व देवस्थानांचा विकास करून भाविकांना सुविधा उपलब्ध करून देऊ, असे प्रतिपादन नूतन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी बुधवारी केले. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी नियुक्ती झालेल्या अविनाश सुभेदार यांनी डॉ. सैनी यांच्याकडून पदभार स्वीकारला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, विभागीय माहिती उपसंचालक सतीश लळित, करवीरचे प्रांताधिकारी सचिन इथापे, जिल्हा कोषागार अधिकारी रमेश लिथडे, जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त मुख्य लेखाधिकारी गणेश देशपांडे, जिल्हा अग्रणी बँकेचे महाव्यवस्थापक एस. जी. किणिंगे यांची उपस्थिती होती. यावेळी मावळते जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांनी नूतन जिल्हाधिकारी सुभेदार यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिकारी सैनीयांची बदली झाली असली तरी अद्याप त्यांच्या नेमणुकीचे ठिकाण निश्चित झालेले नाही.सुभेदार म्हणाले, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्णात यापूर्र्वी काम केले असल्याने जिल्ह्णातील महत्त्वाच्या प्रश्नांची आपल्याला माहिती आहे. सातबारा संगणकीकरणाला गती देण्याबरोबरच पर्यटन विकासाला चालना देणार आहे. कोल्हापूर जिल्हा हा विकासाचा ध्यास असलेल्या लोकांचा जिल्हा आहे. चांगल्या, नव्या कल्पना लोक स्वीकारतात व त्यामध्ये सहभागी होतात. जिल्ह्णात अ‍ॅग्रो टुरिझमला चांगली संधी असून त्याचा विकास करून शेतकऱ्यांना लाभ मिळवून देऊ. विमानतळ लवकर सुरू झाला तर दळणवळण वाढेल. त्यामुळे त्यासाठीही प्राधान्याने प्रयत्न केले जातील. जिल्ह्णातील गावे टंचाईग्रस्त घोषित करण्यात आली असून, या गावांमध्ये तातडीच्या उपाययोजना केल्या जातील. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत १८ गावे शासकीय निकषांनुसार निवडण्यात आली असली तरी ५६ गावांमध्ये हे अभियान राबविण्याची आवश्यकता आहे. तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. या सर्व गावांमधून जलयुक्त शिवारची कामे प्राधान्याने करण्यात येतील. तसेच पंचगंगेच्या प्रदूषण प्रश्नासह जोतिबा विकास आराखडा विमानतळ, आदी प्रश्नांवरही येणाऱ्या काळात लक्ष केंद्रित करण्यात येईल.