शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
3
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
4
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
6
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
7
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
8
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
9
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
10
प्रेमानंद महाराज सांगतात, 'बुधवारी केस कापल्याने येते धन-समृद्धी आणि टळतो अकाली मृत्यू!'
11
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?
12
बापमाणूस! ४ वर्षे जमा केली १०-१० रुपयांची नाणी; चहावाल्याने लेकीचं स्वप्न केलं पूर्ण, घेतली स्कूटी
13
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
14
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
15
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
16
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
17
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
18
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
19
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
20
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर

जिल्ह्यात पर्यटनाला चालना देणार : सुभेदार

By admin | Updated: April 27, 2017 01:00 IST

जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारला

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा हा नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आहे. जिल्ह्यात पर्यटन विकासाला प्राधान्य देऊन अ‍ॅग्रो टुरिझमचा विकास करून शेतकरी बांधवांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू. याबरोबरच जोतिबा परिसरासह जिल्ह्यातील सर्व देवस्थानांचा विकास करून भाविकांना सुविधा उपलब्ध करून देऊ, असे प्रतिपादन नूतन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी बुधवारी केले. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी नियुक्ती झालेल्या अविनाश सुभेदार यांनी डॉ. सैनी यांच्याकडून पदभार स्वीकारला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, विभागीय माहिती उपसंचालक सतीश लळित, करवीरचे प्रांताधिकारी सचिन इथापे, जिल्हा कोषागार अधिकारी रमेश लिथडे, जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त मुख्य लेखाधिकारी गणेश देशपांडे, जिल्हा अग्रणी बँकेचे महाव्यवस्थापक एस. जी. किणिंगे यांची उपस्थिती होती. यावेळी मावळते जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांनी नूतन जिल्हाधिकारी सुभेदार यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिकारी सैनीयांची बदली झाली असली तरी अद्याप त्यांच्या नेमणुकीचे ठिकाण निश्चित झालेले नाही.सुभेदार म्हणाले, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्णात यापूर्र्वी काम केले असल्याने जिल्ह्णातील महत्त्वाच्या प्रश्नांची आपल्याला माहिती आहे. सातबारा संगणकीकरणाला गती देण्याबरोबरच पर्यटन विकासाला चालना देणार आहे. कोल्हापूर जिल्हा हा विकासाचा ध्यास असलेल्या लोकांचा जिल्हा आहे. चांगल्या, नव्या कल्पना लोक स्वीकारतात व त्यामध्ये सहभागी होतात. जिल्ह्णात अ‍ॅग्रो टुरिझमला चांगली संधी असून त्याचा विकास करून शेतकऱ्यांना लाभ मिळवून देऊ. विमानतळ लवकर सुरू झाला तर दळणवळण वाढेल. त्यामुळे त्यासाठीही प्राधान्याने प्रयत्न केले जातील. जिल्ह्णातील गावे टंचाईग्रस्त घोषित करण्यात आली असून, या गावांमध्ये तातडीच्या उपाययोजना केल्या जातील. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत १८ गावे शासकीय निकषांनुसार निवडण्यात आली असली तरी ५६ गावांमध्ये हे अभियान राबविण्याची आवश्यकता आहे. तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. या सर्व गावांमधून जलयुक्त शिवारची कामे प्राधान्याने करण्यात येतील. तसेच पंचगंगेच्या प्रदूषण प्रश्नासह जोतिबा विकास आराखडा विमानतळ, आदी प्रश्नांवरही येणाऱ्या काळात लक्ष केंद्रित करण्यात येईल.