शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

..तर दिल्लीला धडक देऊ, जैन बांधवांचा विराट मोर्चाद्वारे केंद्र सरकारला इशारा

By भीमगोंड देसाई | Updated: January 3, 2023 19:26 IST

केंद्र सरकारच्या पर्यावरण वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाने पारसनाथ पर्वताला अभयारण्य म्हणून घोषित केले आहे

कोल्हापूर : झारखंड येथील श्री सम्मेद शिखरजी पारसनाथ पर्वतराज या धार्मिक स्थळाला केंद्र सरकारने जाहीर केलेला पर्यटनाचा दर्जा मागे घ्यावा, या मागणीसाठी मंगळवारी पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील जैन बांधवांचा येथे विराट मोर्चा निघाला. निर्णय मागे घ्यावा, अन्यथा प्रचंड संख्येने दिल्लीला धडक देऊ, असा इशारा मोर्चाद्वारे देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे मागणीचे निवेदन प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना देण्यात आले. मोर्चात ध्वज, मागणीचे फलक, महिलांचा लक्षणीय सहभाग लक्षवेधी ठरला.कोल्हापूर, सांगली, सातारासह उत्तर कर्नाटकातील बेळगाव, विजापूर येथून जैन बांधव मोर्चात सहभागी होण्यासाठी सकाळी दहापासूनच दसरा चौकात एकत्र येत राहिले. शहरातील सर्व बाजूच्या रस्त्यावरून चारचाकी, दुचाकीने बांधव येत राहिले. दरम्यान, ११ वाजता मोर्चा सुरू झाला. जसजसे जैन बांधव येत राहिले, तसे मोर्चात सहभागी होत राहिले. असे चित्र १२ वाजेपर्यंत राहिले. हातात जैन धर्माचा ध्वज, आपण सगळे एक होऊया, शिखरजी तीर्थक्षेत्र वाचवूया, जैन धर्म की जान है, शिखर महान है अशा आशयाचे फलक हातात घेतलेले समाजबांधव, शिखरजी बचावच्या डोक्यावर परिधान केलेली टोपी मोर्चात लक्षवेधी ठरली. मोर्चा आईसाहेब पुतळा, बिंदू चौक, शिवाजी पुतळा, महाद्वार रोड, पापाची तिकटी, सीपीआर चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. येथे स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी आणि जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीनी यांनी मार्गदर्शन केले. शिष्टमंडळाकडून प्रभारी जिल्हाधिकारी शिंदे यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर मोर्चाची सांगता झाली.मोर्चात जगद्गुरू स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी, अभिवन स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी, माजी खासदार कलाप्पाण्णा आवाडे, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर, आमदार प्रकाश आवाडे यांच्यासह जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिल्लीला धडक देऊअनादी काळापासून धार्मिक स्थळ असलेल्या सम्मेद शिखरजीवर पर्यटन सुरू झाले तर पावित्र्य नष्ट होणार आहे. भगवान महावीरांनी अहिंसा, जगा आणि जगू द्या हे तत्त्वज्ञान जगाला दिले. आमच्या तीर्थक्षेत्रासाठी आज जैन समाज रस्त्यावर उतरला आहे. तुम्ही आमच्या हृदयावर घाव घातला आहे, आमच्या संयमाचा बांध फुटू देऊ नका, वेळ पडली तर दिल्लीला धडक देऊ. केंद्र सरकारने शिखरजीला शाश्वत जैन तीर्थक्षेत्र म्हणून जाहीर केल्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशारा स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी व जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांनी केंद्र सरकारला दिला.

मोर्चा मार्गाचे रिंगण

महिला, अबालवृद्ध, तरुण, तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा मार्ग रिंगण बनला होता. मोर्चा मार्गावर श्रावक, श्राविकांनी स्वच्छता केली. घराला कुलूप लावून बांधव सहभागी झाल्याने शहर दुपारपर्यंत गर्दीमय बनले होते. मोर्चा मार्ग पावसाळ्यात नदी तुडुंब भरून वाहावी तसा दिसत होता. मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती. मोर्चा अत्यंत शिस्तबद्ध होता. कुठेही गोंधळ, आरडाओरड किंवा घोषणाबाजी नव्हती.

पावित्र्य नष्ट होणार आहेलक्ष्मीसेन महास्वामीजी म्हणाले, अनेक लोक म्हणताहेत पर्यटनस्थळाचा दर्जा दिला तर बिघडले कुठे, देशाची प्रगती होईल. आमचा प्रगतीला अडथळा नाही. पर्यटनाच्या नावाखाली त्या सिद्धभूमीवर मत्स्यपालन, कुक्कुटपालन, बार, रेस्टॉरंट होणार असून त्यामुळे पावित्र्य नष्ट होणार आहे. गिरनार, पालितानामध्ये सध्या हेच सुरू आहे, अशी अवस्था आम्हाला सम्मेद शिखरजीची होऊ द्यायची नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJain Templeजैन मंदीर