शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
2
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
3
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
4
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
5
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
6
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
7
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
8
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
9
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
10
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
11
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
12
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
13
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
14
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
15
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
16
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
17
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
18
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
19
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
20
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर

कोल्हापूर विमानतळास राजाराम महाराजांचे नाव द्या

By admin | Updated: August 1, 2015 00:10 IST

समर्थकांचे धरणे : आश्वासनानंतर आंदोलन मागे

कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळास छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव द्यावे, या मागणीसाठी शुक्रवारी राजाराम महाराजांच्या जयंतीदिनी व्हीनस कॉर्नर चौकातील छत्रपती राजाराम महाराजांच्या पुतळ्यासमोर राजाराम महाराज प्रेमींतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले.कोल्हापूर विमानतळाचा इतिहास पाहता, छत्रपती राजाराम महाराजांनी प्रथमत: कोल्हापूर संस्थानामध्ये वाहतुकीच्या दृष्टीने, व्यापारवाढीसाठी व प्रजेच्या दृष्टीने विमानतळ असावा, या हेतूने केलेले प्रयत्न उल्लेखनीय आहेत. आजच्या उजळाईवाडी विमानतळाच्या परिसरास पूर्वी ‘उदासीबुवाचा माळ’ असे संबोधले जात होते. या माळावर राजाराम महाराजांनी १९३०-३५ या कालावधीत विमानतळाचे काम सुरू केले. त्यासाठी १७० एकर जमिनीचा परिसर हस्तगत केला होता. सिंगल इंजिन व्हिजन टाईप एअरक्राफ्ट अशा प्रकारची छोटी विमाने की जी एका पंख्यावर दुसरा लहान पंखा अशी चार पंख्यांनिशी होती, अशी विमाने कार्यरत होती. विमानतळाचे उद्घाटन ४ मे १९४० रोजी छत्रपती राजाराम महाराज यांच्या हस्ते झाले. सन १९७८-७९ मध्ये या विमानतळाचे विस्तारीकरण करण्यात आले. त्यांनी दूरदृष्टी ठेवून केलेल्या कार्याच्या स्मृती चिरंतन राहण्यासाठी या विमानतळाला राजाराम महाराजांचे नाव द्यावे, ही राजाराम महाराजप्रेमींची मागणी आहे. यासाठी राज्य शासन, महापालिका व जिल्हा परिषद यांचे ठराव झाले आहेत. तरीही अजून नामकरण झालेले नाही. या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. भरपावसात हे आंदोलन सुरू होते. दुपारी एकच्या सुमारास खासदार राजू शेट्टी यांचे प्रतिनिधी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, श्रीकांत घाटगे यांनी प्रश्न मार्गी लावण्यासाठी योग्य ते करू, असे लेखी आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्याचबरोबर आंदोलकांची दूरध्वनीवरून खासदार शेट्टी यांच्याशी चर्चा करून दिली. यावेळी शेट्टी यांनी भारतीय विमान प्राधिकरणाचे अधिकारी व विमान वाहतूक मंत्री यांच्यासोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.आंदोलनात उदयसिंह राजेयादव, वसंत सिंघण, आदित्य मैंदर्गीकर, अ‍ॅड. प्रताप जाधव, विजय जाधव, बाळासाहेब निकम, इम्रान शरीफ, दिलीप टोणपे, अशोक सडोलीकर, अशोक मानकर, ज्ञानेश पोतदार, मनवीर केसरकर, पीयूष चव्हाण, सोमेश्वर सोलापुरे, इम्रान शेख, मनीषा शिंदे, रंजना कारंडे, आदींसह राजाराम महाराजप्रेमी सहभागी होते. (प्रतिनिधी)