शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

ऊसतोडणीला मजूर द्या...एक महिन्याचे काम देतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 00:07 IST

आयुब मुल्ला ।लोकमत न्यूज नेटवर्कखोची : चालू ऊस गळीत हंगाम अंतिम टप्यात आला आहे. मजुरांच्या कमतरतेमुळे मेटाकुटीला आलेली तोडणी यंत्रणा मात्र सध्या मजूर मिळविण्याच्या प्रयत्नात दिसू लागली आहे. कर्नाटकातील बहुतांश कारखाने बंद झाले आहेत. त्यांच्याकडे असणारी तोडणी वाहतूक यंत्रणा आपल्या कारखान्याला मिळावी यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कारखान्यांचा शेती विभाग प्रयत्न ...

आयुब मुल्ला ।लोकमत न्यूज नेटवर्कखोची : चालू ऊस गळीत हंगाम अंतिम टप्यात आला आहे. मजुरांच्या कमतरतेमुळे मेटाकुटीला आलेली तोडणी यंत्रणा मात्र सध्या मजूर मिळविण्याच्या प्रयत्नात दिसू लागली आहे. कर्नाटकातील बहुतांश कारखाने बंद झाले आहेत. त्यांच्याकडे असणारी तोडणी वाहतूक यंत्रणा आपल्या कारखान्याला मिळावी यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कारखान्यांचा शेती विभाग प्रयत्न करू लागला. मजूर द्या किमान एक महिना उसतोडणीचे काम दिले जाईल, असे आवाहन यानिमित्ताने अनेक कारखान्यांच्या वतीने केले जात आहे. यास प्रतिसादही मिळत आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू होऊन चार महिने संपले. अजून किमान बहुतांश कारखाने एक महिना चालतील, अशी स्थिती आहे. गळीत हंगाम सुरु झाल्यापासून प्रत्येक कारखान्याला ऊसतोडणी मजूर व वाहतुकीच्या समस्येचे ग्रहण लागले आहे. किमान प्रत्येक कारखान्याला पंचवीस टक्के तोडणी मजूर यंत्रणेचा कमतरतेचा फटका बसला. त्यामुळे प्रतिदिन ऊस गाळपक्षमता घटली. याचा एकूणच सर्व संबंधित घटकांवर परिणाम होत गेला.यंत्रणा आता मिळू लागली आहे. बैलगाडी, अंगत, ट्रॅक्टर, ऊसतोडणी यंत्रे मजुरासह कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कारखान्यावर दाखल होत आहे. त्यामुळे किमान शेवटच्या टप्प्यातील कार्यक्षमता टिकण्यास मदत होणार आहे.या दिवसांत अपेक्षित वेळेत जो ऊस जाणे गरजेचे असे वाटते तो आता नक्की जाईल. याचा फायदा शेतकºयांना जास्त होणार आहे. कारखान्यांना ही बाब पूरक ठरणार आहे. याच बरोबर मजूर आणि वाहतूकदारांचाही फायदा होणार आहे.कर्नाटकातील बहुतांश कारखाने बंद झाले आहेत. सुमारे दहा फेब्रुवारीपासून फेब्रुवारी अखेरपर्यंत बहुतेक कारखाने बंद झाले. त्यात बेळगाव जिल्ह्यातील सुमारे वीस कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्याकडे असणारी यंत्रणा मिळविण्यासाठी गेल्या महिन्याभरापासून कोल्हापूर जिल्ह्यातील कारखाने प्रयत्न करीत हो ते. त्यास यश येताना सध्या दिसत आहे.२० टक्के मजूर कमीकर्नाटकातील कारखाने कोल्हापूर जिल्ह्यातील कारखाण्यापेक्षा किमान तीन आठवडे अगोदर सुरू झाले. तेथेही मजूर कमतरतेचा प्रश्न भेडसावलाच. मजुरांची ही कमतरता सगळीकडेच भेड सावली आहे. सोलापूर, जालना, बीड, नांदेड, उस्मानाबाद, परभणी या भागातूनच मजूर जास्त येतात. परंतु गत मान्सूनमध्ये तसेच परतीचा पाऊस तेथे चांगला झाला. त्यामुळे शेती मशागती साठी अनेक मजूर तेथेच थांबले. तसेच त्या भागातील कारखानेही जोमात सुरू झाल्याने लांब जाण्यापेक्षा परिसरातच ऊस तोडणीला प्राधान्य मजुरांनी दिले.त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात तसेच अन्य ठिकाणीही उसतोडमजुर जवळपास अपेक्षेपेक्षा वीस टक्के कमी आले.आता ऊस तोडणी मजूर मिळू लागल्याने कारखाने बºयापैकी गाळप क्षमतेने चालतील असे चित्र निर्माण झाले आहे. बहुतांश कारखान्यांना अशाप्रकारे पंधरा टक्के यंत्रणा मिळाली आहे. ज्या ज्या कारखान्यांनी प्रयत्न केले, त्यांना मजूर मिळविण्यासाठी यश मिळत आहे. यासाठी कमिशन वाढ मिळावी तसेच जाण्या-येण्यापैकी एक प्रवास खर्च मिळावा, अशी तोडणी वाहतूकदारांनी मागणी केली असून, त्यास काहीसा प्रतिसादही कारखान्याकडून दिला असल्याचे समजते.