शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

ऊसतोडणीला मजूर द्या...एक महिन्याचे काम देतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 00:07 IST

आयुब मुल्ला ।लोकमत न्यूज नेटवर्कखोची : चालू ऊस गळीत हंगाम अंतिम टप्यात आला आहे. मजुरांच्या कमतरतेमुळे मेटाकुटीला आलेली तोडणी यंत्रणा मात्र सध्या मजूर मिळविण्याच्या प्रयत्नात दिसू लागली आहे. कर्नाटकातील बहुतांश कारखाने बंद झाले आहेत. त्यांच्याकडे असणारी तोडणी वाहतूक यंत्रणा आपल्या कारखान्याला मिळावी यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कारखान्यांचा शेती विभाग प्रयत्न ...

आयुब मुल्ला ।लोकमत न्यूज नेटवर्कखोची : चालू ऊस गळीत हंगाम अंतिम टप्यात आला आहे. मजुरांच्या कमतरतेमुळे मेटाकुटीला आलेली तोडणी यंत्रणा मात्र सध्या मजूर मिळविण्याच्या प्रयत्नात दिसू लागली आहे. कर्नाटकातील बहुतांश कारखाने बंद झाले आहेत. त्यांच्याकडे असणारी तोडणी वाहतूक यंत्रणा आपल्या कारखान्याला मिळावी यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कारखान्यांचा शेती विभाग प्रयत्न करू लागला. मजूर द्या किमान एक महिना उसतोडणीचे काम दिले जाईल, असे आवाहन यानिमित्ताने अनेक कारखान्यांच्या वतीने केले जात आहे. यास प्रतिसादही मिळत आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू होऊन चार महिने संपले. अजून किमान बहुतांश कारखाने एक महिना चालतील, अशी स्थिती आहे. गळीत हंगाम सुरु झाल्यापासून प्रत्येक कारखान्याला ऊसतोडणी मजूर व वाहतुकीच्या समस्येचे ग्रहण लागले आहे. किमान प्रत्येक कारखान्याला पंचवीस टक्के तोडणी मजूर यंत्रणेचा कमतरतेचा फटका बसला. त्यामुळे प्रतिदिन ऊस गाळपक्षमता घटली. याचा एकूणच सर्व संबंधित घटकांवर परिणाम होत गेला.यंत्रणा आता मिळू लागली आहे. बैलगाडी, अंगत, ट्रॅक्टर, ऊसतोडणी यंत्रे मजुरासह कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कारखान्यावर दाखल होत आहे. त्यामुळे किमान शेवटच्या टप्प्यातील कार्यक्षमता टिकण्यास मदत होणार आहे.या दिवसांत अपेक्षित वेळेत जो ऊस जाणे गरजेचे असे वाटते तो आता नक्की जाईल. याचा फायदा शेतकºयांना जास्त होणार आहे. कारखान्यांना ही बाब पूरक ठरणार आहे. याच बरोबर मजूर आणि वाहतूकदारांचाही फायदा होणार आहे.कर्नाटकातील बहुतांश कारखाने बंद झाले आहेत. सुमारे दहा फेब्रुवारीपासून फेब्रुवारी अखेरपर्यंत बहुतेक कारखाने बंद झाले. त्यात बेळगाव जिल्ह्यातील सुमारे वीस कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्याकडे असणारी यंत्रणा मिळविण्यासाठी गेल्या महिन्याभरापासून कोल्हापूर जिल्ह्यातील कारखाने प्रयत्न करीत हो ते. त्यास यश येताना सध्या दिसत आहे.२० टक्के मजूर कमीकर्नाटकातील कारखाने कोल्हापूर जिल्ह्यातील कारखाण्यापेक्षा किमान तीन आठवडे अगोदर सुरू झाले. तेथेही मजूर कमतरतेचा प्रश्न भेडसावलाच. मजुरांची ही कमतरता सगळीकडेच भेड सावली आहे. सोलापूर, जालना, बीड, नांदेड, उस्मानाबाद, परभणी या भागातूनच मजूर जास्त येतात. परंतु गत मान्सूनमध्ये तसेच परतीचा पाऊस तेथे चांगला झाला. त्यामुळे शेती मशागती साठी अनेक मजूर तेथेच थांबले. तसेच त्या भागातील कारखानेही जोमात सुरू झाल्याने लांब जाण्यापेक्षा परिसरातच ऊस तोडणीला प्राधान्य मजुरांनी दिले.त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात तसेच अन्य ठिकाणीही उसतोडमजुर जवळपास अपेक्षेपेक्षा वीस टक्के कमी आले.आता ऊस तोडणी मजूर मिळू लागल्याने कारखाने बºयापैकी गाळप क्षमतेने चालतील असे चित्र निर्माण झाले आहे. बहुतांश कारखान्यांना अशाप्रकारे पंधरा टक्के यंत्रणा मिळाली आहे. ज्या ज्या कारखान्यांनी प्रयत्न केले, त्यांना मजूर मिळविण्यासाठी यश मिळत आहे. यासाठी कमिशन वाढ मिळावी तसेच जाण्या-येण्यापैकी एक प्रवास खर्च मिळावा, अशी तोडणी वाहतूकदारांनी मागणी केली असून, त्यास काहीसा प्रतिसादही कारखान्याकडून दिला असल्याचे समजते.