शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले
2
'जिनपिंग यांची ही गोष्ट चांगली नाही', ट्रम्प यांची थेट प्रतिक्रिया, जिनपिंग यांनी लगेच हिशेब चुकता केला
3
मोंथाने समुद्राच्या तळातून ब्रिटीशकालीन जहाज बाहेर आणले; शेवटचे दहा वर्षांपूर्वी दिसलेले...
4
"टॅरिफनं महागाई वाढवली," पॉवेल यांचा पुन्हा ट्रम्प यांच्यावर निशाणा; फेड रिझर्व्हनं केली व्याजदरात कपात
5
मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता
6
Post Office ची जबरदस्त स्कीम; केवळ व्याजातूनच महिन्याला होईल ₹२०,५००ची कमाई, कर सवलतीचाही फायदा
7
'ती' रात्र, रूम नंबर ११४ अन् १७ तासांचे रहस्य! महिला डॉक्टर आत्महत्या, हॉटेल रूममधील वस्तुस्थिती
8
'तो' किंचाळला, रक्ताच्या थारोळ्यात.... १ कोटीची लॉटरी लागलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू
9
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
10
भयंकर! हिट अँड रननंतर कारने बाईकस्वाराला १.५ किमी फरफटतं नेलं; धडकी भरवणारा Video
11
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
12
'साईबाबा' फेम अभिनेते सुधीर दळवींना मदत केल्याने रणबीर कपूरची बहीण झाली ट्रोल, नेमकं काय घडलं?
13
"खरं सांगायचं तर..."; फिल्मफेअर पुरस्कार विकत घेतल्याच्या आरोपांवर अभिषेक बच्चन स्पष्टच म्हणाला
14
पती झाला हैवान! लेकासमोरच पत्नीची निर्घृण हत्या, डोळ्यांना, चेहऱ्याला...; अपघाताचा रचला बनाव
15
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
16
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
17
वेतन वाढेल, जबाबदारी? आठव्या वेतन आयोगाने सरकारवरील बोजा २० ते २५ हजार कोटींनी वाढणार
18
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
19
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
20
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?

ऊसतोडणीला मजूर द्या...एक महिन्याचे काम देतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 00:07 IST

आयुब मुल्ला ।लोकमत न्यूज नेटवर्कखोची : चालू ऊस गळीत हंगाम अंतिम टप्यात आला आहे. मजुरांच्या कमतरतेमुळे मेटाकुटीला आलेली तोडणी यंत्रणा मात्र सध्या मजूर मिळविण्याच्या प्रयत्नात दिसू लागली आहे. कर्नाटकातील बहुतांश कारखाने बंद झाले आहेत. त्यांच्याकडे असणारी तोडणी वाहतूक यंत्रणा आपल्या कारखान्याला मिळावी यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कारखान्यांचा शेती विभाग प्रयत्न ...

आयुब मुल्ला ।लोकमत न्यूज नेटवर्कखोची : चालू ऊस गळीत हंगाम अंतिम टप्यात आला आहे. मजुरांच्या कमतरतेमुळे मेटाकुटीला आलेली तोडणी यंत्रणा मात्र सध्या मजूर मिळविण्याच्या प्रयत्नात दिसू लागली आहे. कर्नाटकातील बहुतांश कारखाने बंद झाले आहेत. त्यांच्याकडे असणारी तोडणी वाहतूक यंत्रणा आपल्या कारखान्याला मिळावी यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कारखान्यांचा शेती विभाग प्रयत्न करू लागला. मजूर द्या किमान एक महिना उसतोडणीचे काम दिले जाईल, असे आवाहन यानिमित्ताने अनेक कारखान्यांच्या वतीने केले जात आहे. यास प्रतिसादही मिळत आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू होऊन चार महिने संपले. अजून किमान बहुतांश कारखाने एक महिना चालतील, अशी स्थिती आहे. गळीत हंगाम सुरु झाल्यापासून प्रत्येक कारखान्याला ऊसतोडणी मजूर व वाहतुकीच्या समस्येचे ग्रहण लागले आहे. किमान प्रत्येक कारखान्याला पंचवीस टक्के तोडणी मजूर यंत्रणेचा कमतरतेचा फटका बसला. त्यामुळे प्रतिदिन ऊस गाळपक्षमता घटली. याचा एकूणच सर्व संबंधित घटकांवर परिणाम होत गेला.यंत्रणा आता मिळू लागली आहे. बैलगाडी, अंगत, ट्रॅक्टर, ऊसतोडणी यंत्रे मजुरासह कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कारखान्यावर दाखल होत आहे. त्यामुळे किमान शेवटच्या टप्प्यातील कार्यक्षमता टिकण्यास मदत होणार आहे.या दिवसांत अपेक्षित वेळेत जो ऊस जाणे गरजेचे असे वाटते तो आता नक्की जाईल. याचा फायदा शेतकºयांना जास्त होणार आहे. कारखान्यांना ही बाब पूरक ठरणार आहे. याच बरोबर मजूर आणि वाहतूकदारांचाही फायदा होणार आहे.कर्नाटकातील बहुतांश कारखाने बंद झाले आहेत. सुमारे दहा फेब्रुवारीपासून फेब्रुवारी अखेरपर्यंत बहुतेक कारखाने बंद झाले. त्यात बेळगाव जिल्ह्यातील सुमारे वीस कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्याकडे असणारी यंत्रणा मिळविण्यासाठी गेल्या महिन्याभरापासून कोल्हापूर जिल्ह्यातील कारखाने प्रयत्न करीत हो ते. त्यास यश येताना सध्या दिसत आहे.२० टक्के मजूर कमीकर्नाटकातील कारखाने कोल्हापूर जिल्ह्यातील कारखाण्यापेक्षा किमान तीन आठवडे अगोदर सुरू झाले. तेथेही मजूर कमतरतेचा प्रश्न भेडसावलाच. मजुरांची ही कमतरता सगळीकडेच भेड सावली आहे. सोलापूर, जालना, बीड, नांदेड, उस्मानाबाद, परभणी या भागातूनच मजूर जास्त येतात. परंतु गत मान्सूनमध्ये तसेच परतीचा पाऊस तेथे चांगला झाला. त्यामुळे शेती मशागती साठी अनेक मजूर तेथेच थांबले. तसेच त्या भागातील कारखानेही जोमात सुरू झाल्याने लांब जाण्यापेक्षा परिसरातच ऊस तोडणीला प्राधान्य मजुरांनी दिले.त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात तसेच अन्य ठिकाणीही उसतोडमजुर जवळपास अपेक्षेपेक्षा वीस टक्के कमी आले.आता ऊस तोडणी मजूर मिळू लागल्याने कारखाने बºयापैकी गाळप क्षमतेने चालतील असे चित्र निर्माण झाले आहे. बहुतांश कारखान्यांना अशाप्रकारे पंधरा टक्के यंत्रणा मिळाली आहे. ज्या ज्या कारखान्यांनी प्रयत्न केले, त्यांना मजूर मिळविण्यासाठी यश मिळत आहे. यासाठी कमिशन वाढ मिळावी तसेच जाण्या-येण्यापैकी एक प्रवास खर्च मिळावा, अशी तोडणी वाहतूकदारांनी मागणी केली असून, त्यास काहीसा प्रतिसादही कारखान्याकडून दिला असल्याचे समजते.