शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

आनंदाची बातमी देऊ - मेंढपाळांना कोणतीच अडचण येऊ देणार नाही :- सतेज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 11:26 IST

लाखाच्यावर कुटुंबांचा शेळ्या-मेंढ्या पालन हाच मुख्य व्यवसाय आहे. प्रत्येक वर्षी पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या काळात हे मेंढपाळ शेळ्या-मेंढ्या घेऊन सांगली,

ठळक मुद्देमेंढपाळांना लॉकडाऊनमधून वगळण्याचा निर्णय लवकरचसतेज पाटील यांचे आश्वासन

कोल्हापूर : पावसाळ्यात कमी पावसाच्या प्रदेशात जाणाऱ्या मेंढपाळ धनगर समाजाला काहीही अडचणी येणार नाहीत. मेंढपाळांना लॉकडाऊनमधून वगळण्यासंदर्भात राज्य शासन लवकरच निर्णय घेईल, असे आश्वासन पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी धनगर समाजाच्या शिष्टमंडळाला दिले.

समाजाचे ज्येष्ठ नेते बाबूराव हजारे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मोजक्या कार्यकर्त्यांसह पालकमंत्री पाटील यांची भेट घेतली. यावेळी लॉकडाऊनमुळे भविष्यात मेंढपाळांना येणा-या अडचणींविषयी चर्चा झाली. जिल्ह्यात धनगर समाजाची सुमारे पाच लाखांहून अधिक लोकसंख्या आहे. लाखाच्यावर कुटुंबांचा शेळ्या-मेंढ्या पालन हाच मुख्य व्यवसाय आहे. प्रत्येक वर्षी पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या काळात हे मेंढपाळ शेळ्या-मेंढ्या घेऊन सांगली,

सातारा, सोलापूर जिल्ह्यांसह मध्य महाराष्ट्र व विजापूर जिल्ह्यासह कर्नाटकमध्ये कमी पावसाच्या प्रदेशात जातात. आपल्याकडे पावसाचे प्रमाण अधिक आहे. खरीप पेरणीमुळे व चराऊ कुरणे आरक्षित केली जातात. त्यामुळे शेळ्या-मेंढ्या फिरविण्यासाठी जागा नसते. मोठ्या पावसात मेंढ्या दगावण्याची शक्यता असते. त्यामुळेच कमी पावसाच्या प्रदेशात म्हणजे हे मेंढपाळ देशावर किंवा चारणीस जातात.

सध्या कोरोनाच्या संकटावर लॉकडाऊन हाच पर्याय आहे; परंतु लॉकडाऊनच्या काळात मेंढपाळांची आडवाआडवी होऊन अनेक अडचणी येण्याची शक्यता आहे. यावेळी राष्ट्रवादी भटक्या विमुक्त जाती संघटना जिल्हा अध्यक्ष कृष्णात पुजारी, दत्तात्रय हजारे, कृष्णात शेळके, बाळासाहेब मोटे, राजेश बाणदार, बाळासाहेब दाईगडे, रंगराव हराळे, के. एस. रानगे उपस्थित होते. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील