शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ठरलेली उचल द्या; अन्यथा फिरणे मुश्कील करू- राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 00:29 IST

हंगाम सुरू होण्यापूर्वीच्या समझोत्यात ठरल्याप्रमाणे उसाची पहिली उचल द्या; अन्यथा साखर कारखानदारांना फिरणे मुश्कील करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

कोल्हापूर : हंगाम सुरू होण्यापूर्वीच्या समझोत्यात ठरल्याप्रमाणे उसाची पहिली उचल द्या; अन्यथा साखर कारखानदारांना फिरणे मुश्कील करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी दिला. साखर कारखानदार व व्यापाºयांच्या संगनमताने साखरेचे दर पाडले गेले; त्यामुळे गेल्या दोन महिन्यांतील साखर खरेदी व विक्रीची चौकशी करण्याची मागणी आयकर विभाग, ‘ईडी’ व ‘सेबी’कडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.साखरेचे दर घसरल्याने कारखान्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेबरोबर झालेला समझोता बाजूला ठेवून प्रतिटन २५०० रुपये उचल देण्यास सुरुवात केली आहे. त्याला विरोध करीत कारखान्यांवर कारवाईच्या मागणीसाठी शनिवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चाचे सभेत रुपातंर झाले.शेट्टी म्हणाले, साखरेचे दर जाणीवपूर्वक पाडले जात असून, कारखान्यांच्या अध्यक्षांनी दुसºयाच्या नावावर कमी दराने साखरेची खरेदी करायची, साठेबाजी करून नंतर चढ्या दराने तिची विक्री करण्याचे उद्योग सुरू आहेत. गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बॅँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी साखरेचे कृत्रिम दर पाडण्याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तीच मागणी आमची असून साखर दराचे तुणतुणे बंद करून प्रसंगी कर्जे काढा; पण ठरल्याप्रमाणे आमचे पैसे द्या.‘आयकर,’ ‘ईडी,’‘सेबी’वर चाल करूयेत्या आठ दिवसांत आयकर, ईडी, सेबीकडे जाऊन या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करणार आहे. या विभागांनी कारखानदारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावरही चाल करून जाऊ.- खा. राजू शेट्टी, संस्थापक, स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टी