शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
Pahalgam Terror Attack : 'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
3
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
4
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
5
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
6
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
7
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
8
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
9
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
10
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
11
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
12
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
13
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
14
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
15
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
16
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
17
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
18
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
19
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
20
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार

डबल ड्यूटी द्या; मात्र मुंबई नको !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:26 IST

कोल्हापूर : मागील वर्षी कोराेना काळात मुंबईतील बससेवेसह बेस्टचे कर्मचारी मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित झाल्यामुळे राज्याच्या इतर जिल्ह्यांतील एस.टी. महामंडळाच्या ...

कोल्हापूर : मागील वर्षी कोराेना काळात मुंबईतील बससेवेसह बेस्टचे कर्मचारी मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित झाल्यामुळे राज्याच्या इतर जिल्ह्यांतील एस.टी. महामंडळाच्या चालक- वाहकांना कर्तव्यासाठी मुंबईला पाठविले होते. त्यामुळे एस.टी.च्या कोल्हापूर विभागातील १२ आगारांमध्ये त्यांची कमतरता जाणवत असून, प्रत्येकाला एकाच वेळी दोन शिफ्टमध्ये काम करावे लागत आहे. येथे कितीही काम करावे लागले तरी चालेल. मात्र, मुंबईला सेवा बजाविण्यास चालक- वाहकांनी नकार दर्शविला आहे.

कोल्हापूर आगारातून मागील वर्षी कोरोनाच्या काळात मुंबईतील बेस्ट सेवेसह महामंडळातील चालक- वाहक मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित झाले. त्यामुळे ही सेवा प्रभावित झाली. ती पुन्हा सुरळीत सुरू राहण्यासाठी राज्याच्या इतर जिल्ह्यांतील वाहक- चालकांना तेथे सेवा देण्यासाठी पाचारण करण्यात आले. मागील वर्षी कोल्हापूर आगारातून १०० बस व ४०० कर्मचारी मुंबईतील विविध बसस्थानकांमध्ये कार्यरत होते. त्यापैकी यात कोल्हापुरातून प्रत्येकी २५ वाहक, चालक अजूनही कार्यरत आहेत. यात कोल्हापुरातून प्रत्येकी २५ वाहक, चालक अजूनही कार्यरत आहेत. यात कोल्हापुरातून प्रत्येकी २५ वाहक, चालक अजूनही कार्यरत आहेत. आजही येथे कर्मचाऱ्यांची मागणी आहे. मात्र, एस.टी.च्या स्थानिक कामगार संघटनांनी त्यास विरोध दर्शविला आहे. येथील कर्मचारी वर्ग तिकडे वर्ग केल्यानंतर अपुऱ्या कर्मचाऱ्यांचा भार इतर कर्मचाऱ्यांवर वाढला. त्यामुळे अनेक वाहक- चालकांना डबल ड्यूटी; अर्थात दोन शिफ्टमध्ये काम करावे लागले आहे. हा अनुभव पाठीशी असताना पुन्हा मुंबईला सेवा बजाविण्यासाठी एस.टी. महामंडळाच्या प्रशासनाचा अट्टहास का सुरू आहे. असा सवाल कामगार संघटनांकडून केला जात आहे. तेथून परत आल्यानंतर अनेकांना कोरोनाबाधित व्हावे लागले होते.

जिल्ह्यातून ४०० कर्मचाऱ्यांना मुंबईला पाठविले होते.

चालक - २५

वाहक - २५

परत आल्यानंतर ४५ जण कोरोनाबाधित

परतल्यानंतर अनेकांना बाधा

मागील वर्षी मुंबईला गेलेल्या वाहकांपैकी ४५ जणांना कोरोनाची बाधा झाली. या काळात महामंडळाने विशेष रजा या कर्मचाऱ्यांना मंजूर केली नाही. याशिवाय जे कर्मचारी कोल्हापुरातच कर्तव्यावर होते त्यांनाही कोरोनाची बाधा झाली. त्यातील पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मात्र, त्यांच्या पश्चात कुटुंबाला ५० लाखाचे विमा कवच असूनही मिळाले नाही. यात अनेक अटी, शर्ती पूर्ण न केल्याचे कारण विमा कंपन्यांनी दाखविले. त्यामुळे चालक-वाहकांचा मुंबईला पुन्हा सेवेस पाठविण्यास तीव्र विरोध आहे.

प्रतिक्रिया

कारवाईची भीती दाखवून पुन्हा मुंबईला सेवा बजाविण्यासाठी महामंडळाचे प्रशासन सज्ज झाले आहे. मुळातच कोल्हापूर विभागात कर्मचारीवर्ग अपुरा आहे. त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांना डबल ड्यूटी करावी लागते. त्यामुळे गरज नसताना येथून चालक- वाहकांना पाठवू नये.

-श्रीमंत गायकवाड, वाहक, कागल

प्रतिक्रिया

मुळातच कोल्हापूर विभागात चालक- वाहक कमी आहेत. येथील काढून मुंबईत पाठवून तेथील कर्मचाऱ्यांचेही काम हिरावून घेतले जात आहे. त्यामुळे प्रशासन तेथे पाठविण्याचा अट्टहास का करत आहे. जोखमीच्या ठिकाणी पाठवून महामंडळ आमच्या कुटुंबाचा विचार करणार आहे की नाही?

-शरद तवटे, वाहक

कोट

कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस अद्यापही दिलेली नाही. त्याचा विचार महामंडळाच्या प्रशासनाने प्राधान्याने करणे गरजेचे आहे. यापूर्वी पाठविलेले प्रत्येकी २५ चालक- वाहक परत बोलवावेत. त्यांची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी. पुन्हा पाठविण्याचा विचार करू नये.

-उत्तम पाटील, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटना

-