शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

विनाखंडित वीज द्या, अन्यथा परिणाम भोगा

By admin | Updated: May 4, 2017 01:02 IST

सतेज पाटील : महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा; शेतकऱ्यांना संयम सुटू न देण्याचे आवाहन

कोल्हापूर : वीज महामंडळाच्या गलथान कारभाराचा शेती आणि शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. वारंवार होणाऱ्या भारनियमनामुळे जिल्ह्यातील शेती करपत आहे. महावितरणने लक्ष देऊन बारा तास विनाखंडित वीजपुरवठा करावा; अन्यथा शेतकऱ्यांचा संयम सुटल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. शेतकऱ्यांचे लाखोंच्या संख्येने मोर्चे निघतील, असा इशारा माजी मंत्री व आमदार सतेज पाटील यांनी बुधवारी दिला. शेतीपंप वीजग्राहकांवर लादलेली विजेची दरवाढ कमी करावी व बारा तास अखंडित वीजपुरवठा करावा, या मागणीसाठी येथील ताराबाई पार्कमधील महावितरणच्या मुख्य कार्यालयावर बुधवारी दुपारी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून निवेदन दिले. याप्रसंगी ते बोलत होते. आमदार पाटील म्हणाले, जिल्ह्यात पाणीसाठा चांगला असल्यामुळे शेतीही चांगली बहरली आहे. मात्र, महावितरणच्या गलथान कारभारामुळे शेतीला वेळेत पाणी देता येणे शेतकऱ्यांना शक्य नाही. याबाबत वारंवार तक्रार करूनही महावितरणचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. आता मात्र आठ दिवसांत त्यांनी या सर्व प्रश्नांवर तोडगा काढावा, अन्यथा महावितरण कार्यालयावर लाखोंचा मोर्चा काढला जाईल. आमदार पाटील म्हणाले, वीज नाही आणि वीजबिल मात्र भरमसाट वाढविले आहे. वीज दरवाढ तत्काळ रद्द झालीच पाहिजे. शेतीला चालना मिळायला हवी, ही घोषणा करणारे सरकार शेतकऱ्यांना वीज परवाने वेळेत मिळू देत नाही. जिल्ह्यात आतापर्यंत ४१७५ परवाने प्रलंबित आहेत. हे परवाने तत्काळ मिळाले पाहिजेत. यावेळी, उपमहापौर अर्जुन माने, करवीर पंचायत समिती सभापती प्रदीप झांबरे, गगनबावडा समिती सभापती मंगल कांबळे, बाजार समिती सदस्य विलास साठे, दशरथ माने, जिल्हा परिषद सदस्य बजरंग पाटील उपस्थित होते.शेतकऱ्यांना भटकण्याची वेळगगनबावडा, करवीर, आजरा, गडहिंग्लज या तालुक्यांतील शेतकऱ्यांना विजेसाठी दाही दिशा भटकण्याची वेळ आली आहे. खांबावरील फ्युज गेल्यानंतर ती शेतकऱ्यांना बदलावी लागते, यासारखे दुर्दैव नाही, असेही ते म्हणाले. तरीही वीज जाते कोठे?एकीकडे शंभर टक्के वीजबिलाची वसुली असणाऱ्यांना चोवीस तास वीज द्यायची घोषणा करायची आणि सात ते आठ तासच द्यायची. यातही एक-दोन तास भारनियमन करून शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहायचा, हा खोडसाळपणा आता बंद केला पाहिजे. भाजप सरकार एकीकडे बारा तास वीज देण्याची घोषणा करीत आहे. राज्यात कोणताही नवीन उद्योग आलेला नाही. तरीही निर्मिर्ती होणारी वीज जाते कुठे? असा सवालही सतेज पाटील यांनी केला.