शहरं
Join us  
Trending Stories
1
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
2
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केलेली ३२ विमानतळं, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
3
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
4
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
5
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
6
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
7
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
8
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    
9
India Pakistan War :'तुम्ही पाकिस्तानला संपवा, आम्ही त्यांच्यावर मागून हल्ला करतो'; बलुचिस्तानमधून भारताला संदेश
10
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
11
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
12
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
13
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावेच जाहीर केली!
14
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
15
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
16
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
17
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
18
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
19
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
20
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स

विनाखंडित वीज द्या, अन्यथा परिणाम भोगा

By admin | Updated: May 4, 2017 01:02 IST

सतेज पाटील : महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा; शेतकऱ्यांना संयम सुटू न देण्याचे आवाहन

कोल्हापूर : वीज महामंडळाच्या गलथान कारभाराचा शेती आणि शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. वारंवार होणाऱ्या भारनियमनामुळे जिल्ह्यातील शेती करपत आहे. महावितरणने लक्ष देऊन बारा तास विनाखंडित वीजपुरवठा करावा; अन्यथा शेतकऱ्यांचा संयम सुटल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. शेतकऱ्यांचे लाखोंच्या संख्येने मोर्चे निघतील, असा इशारा माजी मंत्री व आमदार सतेज पाटील यांनी बुधवारी दिला. शेतीपंप वीजग्राहकांवर लादलेली विजेची दरवाढ कमी करावी व बारा तास अखंडित वीजपुरवठा करावा, या मागणीसाठी येथील ताराबाई पार्कमधील महावितरणच्या मुख्य कार्यालयावर बुधवारी दुपारी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून निवेदन दिले. याप्रसंगी ते बोलत होते. आमदार पाटील म्हणाले, जिल्ह्यात पाणीसाठा चांगला असल्यामुळे शेतीही चांगली बहरली आहे. मात्र, महावितरणच्या गलथान कारभारामुळे शेतीला वेळेत पाणी देता येणे शेतकऱ्यांना शक्य नाही. याबाबत वारंवार तक्रार करूनही महावितरणचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. आता मात्र आठ दिवसांत त्यांनी या सर्व प्रश्नांवर तोडगा काढावा, अन्यथा महावितरण कार्यालयावर लाखोंचा मोर्चा काढला जाईल. आमदार पाटील म्हणाले, वीज नाही आणि वीजबिल मात्र भरमसाट वाढविले आहे. वीज दरवाढ तत्काळ रद्द झालीच पाहिजे. शेतीला चालना मिळायला हवी, ही घोषणा करणारे सरकार शेतकऱ्यांना वीज परवाने वेळेत मिळू देत नाही. जिल्ह्यात आतापर्यंत ४१७५ परवाने प्रलंबित आहेत. हे परवाने तत्काळ मिळाले पाहिजेत. यावेळी, उपमहापौर अर्जुन माने, करवीर पंचायत समिती सभापती प्रदीप झांबरे, गगनबावडा समिती सभापती मंगल कांबळे, बाजार समिती सदस्य विलास साठे, दशरथ माने, जिल्हा परिषद सदस्य बजरंग पाटील उपस्थित होते.शेतकऱ्यांना भटकण्याची वेळगगनबावडा, करवीर, आजरा, गडहिंग्लज या तालुक्यांतील शेतकऱ्यांना विजेसाठी दाही दिशा भटकण्याची वेळ आली आहे. खांबावरील फ्युज गेल्यानंतर ती शेतकऱ्यांना बदलावी लागते, यासारखे दुर्दैव नाही, असेही ते म्हणाले. तरीही वीज जाते कोठे?एकीकडे शंभर टक्के वीजबिलाची वसुली असणाऱ्यांना चोवीस तास वीज द्यायची घोषणा करायची आणि सात ते आठ तासच द्यायची. यातही एक-दोन तास भारनियमन करून शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहायचा, हा खोडसाळपणा आता बंद केला पाहिजे. भाजप सरकार एकीकडे बारा तास वीज देण्याची घोषणा करीत आहे. राज्यात कोणताही नवीन उद्योग आलेला नाही. तरीही निर्मिर्ती होणारी वीज जाते कुठे? असा सवालही सतेज पाटील यांनी केला.