शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

भाजपला सत्ता द्या, विकास घडवू

By admin | Updated: May 21, 2017 00:53 IST

सदाभाऊ खोत : शिराळ्यातील मरिआई चौकात प्रचारसभा

लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : शिराळा नगरपंचायतीवर भाजपची सत्ता द्या, वीज, पाणी, रस्ते, आरोग्य, औद्योगिक विकासाला चालना देऊन या शहराच्या बाजारपेठेचा विकास करू, याचबरोबर पारंपरिक नागपंचमी सुरू करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले. यावेळी त्यांनी निवडणुकीतील दादागिरी ठेचून काढण्यासाठी फुटा-फुटावर राज्य राखीव दल तैनात करू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. येथील मरिआई चौकात भाजपच्या नगरपंचायत निवडणूक उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. खोत म्हणाले की, केंद्रात, राज्यात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे विकास साधायचा असेल तर, येथेही भाजपची सत्ता असणे गरजेचे आहे. बैलगाडी शर्यतीला परवानगी मिळाली आहे. त्याप्रमाणे नागपंचमीला पूर्ववैभव प्राप्त करून देऊ. यावेळी आ. शिवाजीराव नाईक यांनी नागपंचमीस आम्हीस परवानगी मिळवू व आमचीच सत्ता येणार आहे. त्यामुळे यापुढे नागपंचमीचे नावही विरोधक घेणार नाहीत. आज देशात, राज्यात परिवर्तन घडले आहे, तसे परिवर्तन या शहरातही घडेल. तालुक्याचा सर्वांगीण विकास आपल्या माध्यमातून झाला आह.नागपंचमीबाबत कायदा दुरुस्तीसाठी पाठपुरावा सुरू आहे. विरोधकांनी यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे कोणती संस्कृती घ्यायची, हे आता शिराळकरांनी ठरवायचे आहे, असे रणधीर नाईक यांनी सांगितले. यावेळी इस्लामपूर नगराध्यक्ष निशिकांत पाटील, महाडिक युवाशक्तीचे सम्राट महाडिक, अ‍ॅड. नरेंद्र सूर्यवंशी, अ‍ॅड. नेहा सूर्यवंशी, सत्यजित कदम, विनायक गायकवाड, विद्याधर कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी उदयसिंगराव नाईक, रणजितसिंह नाईक, वैशाली नाईक, केदार नलवडे, सुखदेव पाटील, दिलीप कदम, बंडा डांगे, नंदाताई कदम, सारिका पाटील आदी उपस्थित होते. आमच्याकडेच यावे लागेल पंधरा वर्षांत विरोधकांनी नागपंचमीबाबत काहीही केले नाही. आता विरोधकांची सत्ता नसल्याने नागपंचमीच काय, कोणताही प्रश्न असला तरी, त्यासाठी आमच्याकडेच यावे लागेल, असे खोत यांनी सांगितले.