शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

मुलींना स्वातंत्र्य मिळाले पाहिजे : सिंधुताई

By admin | Updated: December 30, 2014 23:39 IST

ग्रामीण भागात अजूनही पुण्याई बाकी आहे. या पुण्याईवरच देश उभा आहे. भुकेल्यांना जेवण द्या, दीन-दुबळ्यांना मदत करा

राशिवडे : ग्रामीण भागातील महिला खऱ्या अर्थाने सबला आहेत. कारण त्यांना समोरच्या पुरुषाच्या नजरेत काय चाललंय हे ओळखता येते. मुलींना स्वातंत्र्य जरूर मिळाले पाहिजे, पण मुलींनाही समजायला हवे की मला ‘मादी’ व्हायचे आहे की ‘माय’, असे परखड मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांनी केले. पुंगाव (ता. राधानगरी) येथील नवकवी दत्तात्रय महिपती दुरुगले यांच्या ‘मनमौजी’ काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात व्यक्त केले. दत्तात्रय दुरुगले लिखित ‘मनमौजी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते झाले. यावेळी बालकवी शाम कुरळे, सांगलीचे उपजिल्हाधिकारी शरद काटकर राधानगरीचे पोलीस निरीक्षक ए. आर. गाडे, भोगावती महाविद्यालयाचे प्राचार्य डी. व्ही. मोरे, सरपंच मालुताई बरगे, उपसरपंच लक्ष्मण कुलकर्णी उपस्थित होत्या.सपकाळ म्हणाल्या, महिलांनीच कसे वागवे हे ठरविले पाहिजे. अंग प्रदर्शन करणारे कपडे आपल्या मुलांना देऊच नयेत. युवकांना उद्देशून त्या म्हणाल्या, बाबांनो, पुढे जा. मात्र, मागे वळून पहा, येऊ द्या संकट, येऊ द्या दु:ख, काट्यावरून चालताना तीही एक दिवस फुले बनतील. ग्रामीण भागात अजूनही पुण्याई बाकी आहे. या पुण्याईवरच देश उभा आहे. भुकेल्यांना जेवण द्या, दीन-दुबळ्यांना मदत करा. प्रा. पवन पाटील यांनी सूत्रसंचालन केले. एन. आर. पाटील यांनी स्वागत केले. राजेंद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले. उपसरपंच लक्ष्मण कुलकर्णी यांनी आभार मानले. (वार्ताहर)पुंगाव येथे ‘मनमौजी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन समारंभात बोलताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ, शरद काटकर, डी. व्ही. मोरे, शाम कुरळे, आदी उपस्थित होते.