शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
3
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
4
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
5
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
6
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
7
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
8
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
9
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
10
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
11
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
12
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
13
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
14
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
15
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
16
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
17
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
18
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
19
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
20
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय

अभिमत विद्यापीठातील मुली मोफत शिक्षणापासून वंचित, योजनेत समावेश नाही; पालकांमध्ये नाराजी

By पोपट केशव पवार | Updated: July 20, 2024 17:13 IST

महाविद्यालय प्रशासन व पालकांमध्ये वादाचे प्रकार

पोपट पवारकाेल्हापूर : राज्य सरकारने व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, इतर मागास प्रवर्ग व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थिनींची शंभर टक्के शुल्कमाफी करण्याचा निर्णय नुकताच घेतला; मात्र यामध्ये खासगी अभिमत विद्यापीठ व स्वयंअर्थसहायित विद्यापीठे वगळल्याने चांगल्या शिक्षणसंस्थांमध्ये प्रवेश घेण्याचा मार्ग बंद झाला आहे. काेणत्या महाविद्यालयांत प्रवेश मिळेल किंवा मिळणार नाही याबाबत पालकांमध्येच मोठी संभ्रमावस्था निर्माण झाल्याने महाविद्यालय प्रशासन व पालकांमध्ये वादाचेही प्रकार घडत आहेत.राज्य सरकारने मुलींच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांची शंभर टक्के शुल्कमाफी केली असून याची अंमलबजावणी यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सुरू झाली आहे. हे शुल्क शासकीय महाविद्यालये, निमशासकीय महाविद्यालय, शासन अनुदानित अशासकीय, अंशतः अनुदानित, कायम विनाअनुदानित, तंत्रनिकेतन, सार्वजनिक विद्यापीठे, शासकीय अभिमत/ स्वायत्त विद्यापीठांमध्ये पूर्णपणे माफ असेल; मात्र खासगी अभिमत विद्यापीठ व स्वयंअर्थसहायित विद्यापीठांशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये प्रवेश घ्यायचा झाल्यास विद्यार्थिनींना पूर्ण शुल्क भरावे लागणार आहे.राज्य सरकारने शुल्कमाफीच्या अध्यादेशात तसा उल्लेखही केला आहे; मात्र खासगी अभिमत व स्वयंअर्थसहायित विद्यापीठे, त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालये कोणती याबाबत पालकच अनभिज्ञ असल्याने अपेक्षित महाविद्यालयांमध्ये शुल्कमाफी का नाही याचे उत्तर त्यांनाही मिळेनासे झाले आहे.

शुल्क भरा, सरकारने दिले तर खात्यावर टाकूसध्या अनेक व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे; मात्र कॉलेजकडून पहिल्यांदा शुल्क भरण्यास सांगितले जात असल्याने पालकांमध्येही संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. शासनाने तर शंभर टक्के शुल्कमाफी केली, मग शुल्क कसले असे विचारताच आधी शुल्क भरा. आम्हाला सरकारकडून पैसे आले तर तुमच्या खात्यावर टाकू असे अनेक कॉलेज प्रशासनाकडून सांगितले जात आहे.शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित व्यावसायिक अभ्यासक्रम महाविद्यालयेअभियांत्रिकी-आर्किटेक्ट : २५, शिक्षणशास्त्र : ३६, विधी : ०९, फार्मसी : १५, व्यवस्थापन : १६,स्वयंअर्थसहायितचा उलगडेना अर्थराज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशात स्वयंअर्थसहायित महाविद्यालयांमध्ये मोफत प्रवेश मिळणार नसल्याचे म्हंटले आहे; मात्र ही महाविद्यालये नेमकी कोणती याचा अर्थ पालकांनाच काय शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञ, प्राध्यापकांनाही उलगडेना झाला आहे.एसईबीसीमुळे होतेय दमछाकईडब्लूएस प्रवर्गासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेंतर्गत फी माफीचा लाभ घ्यायचा असेल तर ईडब्लूएस प्रमाणपत्राऐवजी आई व वडील ( दोन्ही पालकांचे ) एकत्रित उत्पन्न प्रमाणपत्र द्यावे लागेल. मराठा समाजातील विद्यार्थिनींना एसईबीसी प्रमाणपत्र द्यावयाचे आहे; मात्र ती काढण्याची प्रक्रिया अत्यंत किचकट असल्याने पालकांची चांगलीच दमछाक होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरEducation Sectorशिक्षण क्षेत्र