शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

उद्योगपतींसाठीच ‘अमृत’ योजनेचा घाट : एन. डी. पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 01:01 IST

कोल्हापूर : इचलकरंजी येथील प्रस्तावित‘अमृत जलसिंचन योजना’ नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी नसून, त्यांच्या आडून उद्योगपतींना पाणी देण्याचा घाट असल्याचा आरोप ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी केला. ‘माझ्या ७५ वर्षांच्या जीवनात मी जो निर्णय घेतला, तो विचारपूर्वक घेतला असून, कोणीपण येऊन मला बदनाम करायला ‘एन. डी.’ म्हणजे पालापाचोळा नव्हे!’ ...

कोल्हापूर : इचलकरंजी येथील प्रस्तावित‘अमृत जलसिंचन योजना’ नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी नसून, त्यांच्या आडून उद्योगपतींना पाणी देण्याचा घाट असल्याचा आरोप ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी केला. ‘माझ्या ७५ वर्षांच्या जीवनात मी जो निर्णय घेतला, तो विचारपूर्वक घेतला असून, कोणीपण येऊन मला बदनाम करायला ‘एन. डी.’ म्हणजे पालापाचोळा नव्हे!’ अशा शब्दांत प्रा. पाटील यांनी इचलकरंजीतील नेत्यांना सुनावले.इचलकरंजी येथील पाणी योजनेवरून वाद सुरू आहे, त्याबाबत रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत प्रा. पाटील यांनी आपली भूमिका अधोरेखित केली. प्रा. पाटील म्हणाले, इचलकरंजीतील नागरिकांना पिण्याचे पाणी देण्यास आमचा विरोध नाही. ही आपली सुरुवातीपासूनची भूमिका आहे; पण तेथील नेत्यांचा दानोळी डोहातूनच उपसा करण्याचा आग्रह आहे. यामध्ये आपणाला मखलाशी दिसत असून, जीवन प्राधिकरणाकडील नगरपालिकेच्या माहितीनुसार ८०० एच. पी.च्या पाच विद्युत पंपांनी चार फूट व्यासाच्या पाईपमधून ‘वारणा’ नदीतून पाणी उपसा करण्याचे नियोजन आहे. याद्वारे सारी वारणा नदीच उपसा करण्याचा डाव असून, ही लबाडी खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. मुख्यमंत्र्यांनी याबाबत बैठक बोलावली आहे. त्यानंतर पाणी परिषदेचा निर्णय घेणार असल्याचे प्रा. पाटील यांनी सागिंतले.इचलकरंजीतील काळ्या ओढ्याची चित्रफीत दाखवत आमदार उल्हास पाटील म्हणाले, ओढ्यात सोडलेले रसायनयुक्त पाणी थेट पंचगंगेत मिसळते. त्यामुळे शिरोळमधील १८ हजार लोकांना कॅन्सरने ग्रासले आहे. या मंडळींनीच वारणा उजव्या कालव्याला विरोध केला. तो झाला असता तर आज ही वेळ आलीच नसती. आमदार डॉ. सुजित मिणचेकर, विक्रांत पाटील, भगवान काटे, आदी उपस्थित होते.जुन्या योजनेत ‘ढपला’मजलेवाडी येथील जुन्या योजनेच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी कोणाची होती ? जमिनीतून पाईप टाकणार तर ती कोणत्या दर्जाची असावी? याचा अभ्यास न करता केवळ ‘ढपला’ पाडण्याचे काम केल्याचा आरोपही प्रा. पाटील यांनी केला.‘वारणा’चे पाणीवाटप, टीएमसीएकूण क्षमता ३४पिण्यासाठी ९.५शेतीसाठी ८उद्योग १.२वाघुर्डी ७मृत साठा ७पाण्याची वाफ १.५मिशीतील जांभूळजांभळाच्या झाडाखाली झोपल्यानंतर एका व्यक्तीच्या मिशीवर जांभूळ पडते आणि ते तिथेच अडकते. त्याला वाटते, दुसऱ्या कुणीतरी येऊन ते मिशीतील जांभूळ आपल्या तोंडात घालावे, अशी स्थिती सध्या इचलकरंजीच्या नेत्यांची झाल्याची टीका प्रा. पाटील यांनी केली.शनिवारी रॅली‘वारणा’, ‘कृष्णा’ व ‘पंचगंगा’ काठांवरून शनिवारी (दि. २) सकाळी आठ वाजता मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. तीन रॅली किणी येथे एकत्र येऊन ती वारणानगर येथे जाणार आहे.‘चिंगी’ महिन्याची आणि तिची ‘वरात!’नगरपालिकेने २०४९ ची लोकसंख्या गृहीत धरून पाणी योजना केली आहे. हे म्हणजे ‘चिंगी’ अजून महिन्याची झाली नाही तोपर्यंत तिच्या वरातीत बॅँड कोणता आणायचा, याची तयारी आहे, असे पालकमंत्र्यांना मुंबईतील बैठकीत म्हटलो, ते जरा त्यांना झोंबल्याचे प्रा. पाटील यांनी सांगितले.