शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

घनवट, चंदनशिवेंचे ३८ कॉल संशयास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 00:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : वारणानगर (ता. पन्हाळा) येथील शिक्षक कॉलनी चोरी प्रकरणातील मुख्य सूत्रधार सांगलीचे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निलंबित पोलीस निरीक्षक विश्वनाथ ज्ञानदेव घनवट (वय ५३, रा. वडगाव शेरी, पुणे) व सहायक पोलीस निरीक्षक सूरज विष्णू चंदनशिवे (३६, रा. वासूद, ता. सांगोला, जि. सोलापूर) यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : वारणानगर (ता. पन्हाळा) येथील शिक्षक कॉलनी चोरी प्रकरणातील मुख्य सूत्रधार सांगलीचे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निलंबित पोलीस निरीक्षक विश्वनाथ ज्ञानदेव घनवट (वय ५३, रा. वडगाव शेरी, पुणे) व सहायक पोलीस निरीक्षक सूरज विष्णू चंदनशिवे (३६, रा. वासूद, ता. सांगोला, जि. सोलापूर) यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. दोघांचे मोबाईल कॉल डिटेक्शन तपासले असता ३८ कॉल संशयास्पद आहेत.संबंधितांना चौकशीसाठी बोलाविले आहे. या चोरी प्रकरणात कोल्हापूर कनेक्शन असल्याचेही तपासात पुढे आले आहे. परिस्थितिजन्य पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असून, घनवट व चंदनशिवे तपासकामाला सहकार्य करीत नसल्याचे वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले.विश्वनाथ घनवट, सहायक पोलीस निरीक्षक सूरज चंदनशिवे हे गुरुवारी (दि. ३) सीआयडी पोलिसांना शरण आले. शुक्रवारी (दि. ४) दोघांना पन्हाळा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या दोघांकडे दोन दिवसांपासून कसून चौकशी सुरू आहे. चोरीची रक्कम गुंतविली कुठे? या प्रश्नाचे उत्तर अद्याप तपास अधिकाºयांना मिळालेले नाही. दोघांचे मोबाईल कॉल डिटेक्शन तपासले असता चोरीच्या घटनेपासून गुन्हा दाखल होईपर्यंत काही व्यक्तींना वारंवार फोन झाले आहेत. सुमारे ३८ कॉल संशयास्पद असून, ज्यांच्याशी संपर्क झाला त्यांना चौकशीसाठी पोलिसांनी नोटीस पाठविली आहे. कोणत्या कारणासाठी हे कॉल झाले यासंबंधी विचारणा केली जाणार आहे.नातेवाइकांचे जबाब घेणारगुन्हा दाखल झाल्यापासून घनवट व चंदनशिवे पसार होते. त्यांचे मोबाईल पाच महिने बंद होते. घनवट हा अहमदनगर, पुणे, सोलापूर येथील नातेवाईक, मित्रांकडे वास्तव्यास होता. त्यांचेही जबाब घेतले जाणार आहेत.संशयित मैनुद्दीन मुल्ला याच्याकडे चोरीचे पैसे आहेत, अशी टीप देणाºया खबºयांना या दोघांनी बक्षीस स्वरूपात पैसे दिले होते. त्यांचेही जबाब घेतले जाणार आहेत. सीआयडीचे पथक अन्य आरोपींच्या मागावर असून, लवकरच त्यांना अटक केली जाणार असल्याचे तपास अधिकाºयांनी सांगितले.चोरीदरम्यान दोन शासकीय व दोन खासगी वाहनांचा वापर केला होता. ती वाहने जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यावरील चालकांचे जबाब ‘सीआयडी’ने घेतले आहेत.