शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
4
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
8
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
9
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
10
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
11
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
12
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
13
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
14
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
15
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
16
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
17
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
18
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
19
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
20
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO

सीए मिळतात, पण अकाऊंटंट नाही

By admin | Updated: June 14, 2017 01:28 IST

सध्या नागपुरात जवळपास १० हजार अकाऊंटंट कार्यरत असून जीएसटी लागू झाल्यानंतर २५ हजारांपेक्षा जास्त अकाऊंटंटची गरज राहील.

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : महापालिकेमार्फत सुरू असलेल्या नगरोत्थान योजनेतील अपूर्ण कामे पंधरा दिवसांत पूर्ण करावीत, असे आदेश महापौर हसिना फरास यांनी सोमवारी (दि. १२) झालेल्या बैठकीत संबंधित ठेकेदार व महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीत फुलेवाडी रिंग रोडवर ठेकेदारास मारहाण झाल्याप्रकरणी संबंधितांवर फौजदारी का केली नाही? अशी विचारणा गटनेते शारंगधर देशमुख यांनी केली; परंतु तिची दखल घेण्यात आली नाही. गेल्या आठवड्यात झालेल्या स्थायी समितीच्या सभेत नगरोत्थान योजनेमधून सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्याची मागणी करण्यात आली होती. यानुसार ताराराणी सभागृहात पदाधिकारी, अधिकारी व संबंधित ठेकेदार यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये निर्माण कन्स्ट्रक्शनच्या विनय जोशी यांनी त्यांच्याकडे मंजूर असलेल्या कामापैकी ९८ टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम येत्या आठ दिवसांत पूर्ण करीत असल्याचे सांगितले. आर. ई. इन्फ्राच्या अविनाश कुलकर्र्णी यांनी त्यांच्या पॅकेजमधील रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या उर्वरित २० टक्के कामे पावसाळा संपल्यानंतर करणार असल्याचे सांगितले. आर. ई. इन्फ्रा कंपनीने दुधाळीतील रस्त्यांवर तीन फूट चॅनेलची भिंत उभी केली होती, ती फोडण्यात आली. यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान झाले आहे. संबंधित कन्सल्टंट, ठेकेदार व अभियंत्यावर कारवाई करा. रामानंदनगर येथील नाल्याचे काम चांगले झालेले नाही. गटारीचे आउटलेट नाल्याला जोडलेले नाही. स्टॉर्मवॉटरचे काम करताना नाल्यातील गाळ काढण्याची जबाबदारी ठेकेदाराची आहे. ठेकेदाराकडून गाळ काढून घ्या, अशी मागणी शारंगधर देशमुख यांनी केली. फुलेवाडी रिंग रोड ते साईबाबा मंदिर कळंबा या पाच किलोमीटर रस्त्याचे काम व्हीयूबी ही कंपनी करीत आहे. थेट पाईपलाईनचे काम करताना संबंधित ठेकेदाराने रस्ता खोदला आहे. तो मंजूर एस्टिमेटप्रमाणेच दोन्ही बाजूंनी केला जाईल. यामध्ये कोणताही दुजाभाव केला जाणार नाही, असा खुलासा शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी केला. बैठकीस उपमहापौर अर्जुन माने, शिक्षण सभापती अजिंक्य चव्हाण, विरोधी पक्षनेता किरण शिराळे, गटनेते सत्यजित कदम, विजय सूर्यवंशी, प्रभाग सभापती अफजल पीरजादे, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, नगरसेवक राहुल चव्हाण, अभिजित चव्हाण, नगरसेविका माधुरी लाड, उपशहर अभियंता रमेश मस्कर, आर. के. जाधव, हर्षजित घाटगे, जलअभियंता सुरेश कुलकर्णी, कन्सल्टंट कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते....तर ‘जशास तसे उत्तर’ देऊलोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : फुलेवाडी जकात नाका ते कळंबा साई मंदिर या नगरोत्थान योजनेतून सुुरू असलेल्या पाच किलोमीटर रस्त्याचे काम तातडीने पूर्ण झाले पाहिजे. या कामामध्ये जर कोणी स्वत:च्या प्रसिद्धीसाठी दहशतीचा वापर करत असेल तर त्यास ‘जशास तसे उत्तर’ दिले जाईल, असा इशारा महानगरपालिकेचे नगरसेवक राहुल माने, वनिता देठे, अभिजित चव्हाण, प्रतीक्षा पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे मंगळवारी दिला. रस्त्याच्या कामावरून होत असलेल्या स्टंटबाजीचा निषेध करून या नगरसेवकांनी पत्रकात पुढे म्हटले आहे की, फुलेवाडी रिंगरोड हा फक्त एका प्रभागाचा प्रश्न नसून तो संपूर्ण उपनगराचा आहे. तो पूर्ण व्हावा यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले आहेत; परंतु फक्त श्रेयवादातून स्वयंघोषित नगरसेवकाने केलेल्या स्टंटबाजीमुळे व विकासकामांना कायम आडकाठी करणाऱ्या त्यांच्या नेत्यामुळेच हे काम थांबले आहे. ‘स्वयंघोषित कार्यकर्त्या’ने फक्त त्यांच्या प्रभागातीलच काम झाले नसल्याचा दावा केला आहे. तो चुकीचा आहे. वनिता देठे यांच्या प्रभागातील रस्तासुद्धा झालेला नाही. प्रतीक्षा पाटील यांच्या प्रभागातील कामेही अर्धवट आहेत.अशा स्वयंघोषित कार्यकर्त्यामुळे तसेच त्यांच्या नेत्यांमुळे शहरातील अनेक विकासकामे रेंगाळली असून विकसक कंपन्या काम करण्यास तयार नाहीत, ही वस्तुस्थिती आहे म्हणून अशा प्रवृत्तीचा आम्ही निषेध करत आहे, असेही पत्रकात म्हटले आहे.