शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

‘प्रादेशिक योजना’ लवकर मंजूर करा

By admin | Updated: May 17, 2017 00:36 IST

आराखडा दोषरहित असावा : असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस्च्या बैठकीत मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क --कोल्हापूर : त्रुटींची पूर्तता करून कोल्हापूरच्या प्रादेशिक योजनेचा आराखडा लवकरात लवकर मंजूर करण्यात यावा, अशी मागणी असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस अ‍ॅँड इंजिनिअर्स, कोल्हापूरच्या बैठकीत मंगळवारी करण्यात आली.असोसिएशनच्या कार्यालयात ही बैठक झाली. प्रादेशिक योजना प्रत्यक्षात राबविताना शाखा कार्यालय आणि अभियंते यांना अनेक त्रुटी व अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. असोसिएशन या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. जिल्ह्यातील प्रादेशिक योजनेचा आराखडा दोषरहित असावा, हा असोसिएशनचा उद्देश आहे. त्यासाठी जिल्ह्यातील विविध आर्किटेक्टस असोसिएशनची संयुक्त बैठक घेण्यात आली. नियोजन मंडळाने दि. २८ मार्च २०१७ रोजी अंतिम बैठक घेऊन योजनेचा आराखडा शासनास सादर करण्यासाठी मंजुरी घेतली. यावेळी पालकमंत्री, लोकप्रतिनिधी आणि नियोजन मंडळाचे अध्यक्ष यांना नागरिकांच्या तक्रारींची दखल घेणे भाग पडले. यावर दोन दिवसांत त्रुटी दुरुस्त करून शासनाला आराखडा सादर करण्याच्या अटीवर ३१ मार्च रोजी मंजुरी देण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात २४ एप्रिलअखेर फक्त कव्हरिंग लेटरव्यतिरिक्त कोणतेही नकाशे, शिफारशी या शासनाला पोहोचलेल्या नव्हत्या. याबाबतची माहिती शासनाकडून उपलब्ध झाली आहे. आराखड्यास अंतिम मंजुरी मिळण्यापूर्वी तो नगररचना संचालक यांच्याकडे छाननीसाठी पाठविला जातो. जिल्ह्यातील असोसिएशन्सनी एकत्रित येऊन पुणे येथील नगररचना संचालक यांच्यासमवेत बैठक नियोजित केली आहे. यामध्ये प्रामुख्याने त्रुटी दूर करून लवकर आराखडा मंजूर करावा, असा आग्रह धरण्यात येणार आहे. राज्याच्या नगरविकास विभागाने वेळीच दखल घेऊन आराखड्यामधील त्रुटींची शहानिशा करावी, अशी मागणी करण्यात आली असल्याची माहिती असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस अ‍ॅँड इंजिनिअर्स, कोल्हापूरचे अध्यक्ष सुधीर राऊत यांनी दिली. या बैठकीस असोसिएशनचे माजी अध्यक्ष संदीप घाटगे, रवी पाटील, अतुल शिंदे, सचिन चव्हाण, बाजीराव भोसले, अजित उत्तूरकर, गडहिंग्लज असोसिएशनचे अध्यक्ष शैलेंद्र कावणेकर, आदींसह जयसिंगपूर, हुपरी, शिरोळ, आजरा येथील असोसिएशनचे पदाधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते. ‘विकासासाठी कटिबद्धअसोसिएशन व नागरिकांनी हरकतीवेळी मांडलेल्या मुद्द्यांवरील शिफारशी, आराखड्यामधील त्रुटी दुरुस्त केलेले नकाशे प्रादेशिक योजना कार्यालयाकडून मागूनही मिळत नाहीत. याचा विचार करता प्रादेशिक योजनेच्या कार्यपद्धतीमध्ये पारदर्शकता दिसून येत नाही. जिल्ह्यातील सर्व आर्किटेक्टस, इंजिनिअर्स असोसिएशन्स या विकासासाठी कटिबद्ध आहेत. त्रुटींबाबत विरोध असून दोषविरहित आराखडा स्वागतार्ह असल्याची माहिती असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस अ‍ॅँड इंजिनिअर्स, कोल्हापूरचे अध्यक्ष राऊत यांनी दिली.एक खिडकी’चा प्रभावी अंमल करावाअसोसिएशन आॅफ आर्किटेक्टस अ‍ॅँड इंजिनिअर्स, कोल्हापूरच्या शिष्टमंडळाने महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांची सदिच्छा भेट घेतली. बांधकाम परवानगीसाठीच्या एक खिडकी योजनेचा प्रभावी अंमल करावा. नगररचना विभागात आर्किटेक्टस्, इंजिनिअर्स कक्ष मिळावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. याबाबत सकारात्मक विचार करून निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन आयुक्त डॉ. चौधरी यांनी दिले. शिष्टमंडळात असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर राऊत, सुनील मांजरेकर, अतुल शिंदे, माजी अध्यक्ष बलराम महाजन, मोहन वायचळ, उमेश यादव, रवी पाटील, विजय चोपदार, आदींचा समावेश होेता.