शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

रक्कम मिळण्यास आॅक्टोबर उजाडणार?

By admin | Updated: June 27, 2017 01:17 IST

कर्जमाफीच्या याद्या निकषांनुसार : तपासण्यास तीन महिने; पात्र शेतकऱ्यांनाच लाभ देण्यासाठी सरकार आग्रही

लोकमत न्यूज नेटवर्क---कोल्हापूर : राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केल्याने शेतकऱ्यांसह विकास संस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असला तरी ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होण्यास किमान तीन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. अद्याप कर्जमाफीचे निकष आलेले नाहीत. त्यानंतर निकषांनुसार याद्या तयार होणार, तपासण्या झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग केले जाणार आहेत. त्यामुळे थकबाकीदारांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास आॅक्टोबर महिना उजाडेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. दीड लाखापर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ केले. दीड लाखापेक्षा अधिक थकबाकीदारांबरोबरच नियमित कर्ज भरणाऱ्यांनाही राज्य सरकारने दिलासा दिला आहे. जिल्हा बॅँकेशी संलग्न असणाऱ्या ४९ हजार शेतकऱ्यांचे १७३ कोटींचे कर्ज माफ होणार आहे. त्यामुळे शेतकरी, विकास संस्था व जिल्हा बॅँकेने नि:श्वास सोडला आहे; पण कर्जमाफीची घोषणा जूनमध्ये झाली असली तरी तिचे पैसे थकबाकीदाराच्या खात्यावर जमा होण्यास किमान तीन महिन्यांचा कालावधी जाणार आहे. केंद्र सरकारच्या कर्जमाफीत मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याचे सांगत कर्जमाफी खऱ्या थकबाकीदार शेतकऱ्यालाच मिळाली पाहिजे, यासाठी सरकार आग्रही असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. कोणत्याही परिस्थितीत कर्जमाफीत बोगसगिरी चालू देणार नसल्याचे संकेत सरकारने दिले आहेत. कर्जमाफीची घोषणा करताना कोणाला लाभ मिळणार हेही सांगितले आहे. याबाबतचे सुस्पष्ट परिपत्रक अद्याप बॅँकांना उपलब्ध झालेले नाही.हे परिपत्रक आल्यानंतर विकास संस्थांकडून निकषपात्र शेतकऱ्यांच्या याद्या मागविल्या जाणार आहेत. या याद्या जिल्हा बॅँकेच्या यंत्रणेकडून तपासल्या जाणार आहेत. त्यानंतर सहकार विभागाच्या पातळीवरून तपासणी होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे याद्या, तपासण्या व अंतिम यादी यांसाठी किमान तीन महिन्यांचा कालावधी जाईल, अशी शक्यता बॅँकिंग क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे. आधी खात्री, मगच पैसे जमा?कर्जमाफीच्या संपूर्ण निकषांचे काटेकोर पालन करणाऱ्या थकबाकीदारांनाच लाभ झाला पाहिजे, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यामुळे निकष व त्यानुसार पात्र शेतकऱ्यांची संख्या अंतिम केली जाणार आहे. यासाठी सहकार खात्याच्या वतीने विशेष तपासणी यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. रिझर्व्ह बॅँकेच्या परिपत्रकाकडे नजराजुन्या ५०० व १००० रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास केंद्रीय अर्थ विभागाने परवानगी दिली आहे; पण आदेश देऊन आठ दिवस उलटले तरी जिल्हा बॅँकांनी पैसे कोठे भरायचे याबाबत स्पष्टता नसल्याने गोंधळ आहे. शनिवार (दि. २४) पासून तीन दिवस रिझर्व्ह बॅँकेला सुटी असल्याने आज, मंगळवारी काहीतरी निर्णय होईल, असा अंदाज असल्याने रिझर्व्ह बॅँकेच्या परिपत्रकाकडे नजरा लागल्या आहेत.