शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

रक्कम मिळण्यास आॅक्टोबर उजाडणार?

By admin | Updated: June 27, 2017 01:17 IST

कर्जमाफीच्या याद्या निकषांनुसार : तपासण्यास तीन महिने; पात्र शेतकऱ्यांनाच लाभ देण्यासाठी सरकार आग्रही

लोकमत न्यूज नेटवर्क---कोल्हापूर : राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केल्याने शेतकऱ्यांसह विकास संस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असला तरी ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होण्यास किमान तीन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. अद्याप कर्जमाफीचे निकष आलेले नाहीत. त्यानंतर निकषांनुसार याद्या तयार होणार, तपासण्या झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग केले जाणार आहेत. त्यामुळे थकबाकीदारांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास आॅक्टोबर महिना उजाडेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. दीड लाखापर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ केले. दीड लाखापेक्षा अधिक थकबाकीदारांबरोबरच नियमित कर्ज भरणाऱ्यांनाही राज्य सरकारने दिलासा दिला आहे. जिल्हा बॅँकेशी संलग्न असणाऱ्या ४९ हजार शेतकऱ्यांचे १७३ कोटींचे कर्ज माफ होणार आहे. त्यामुळे शेतकरी, विकास संस्था व जिल्हा बॅँकेने नि:श्वास सोडला आहे; पण कर्जमाफीची घोषणा जूनमध्ये झाली असली तरी तिचे पैसे थकबाकीदाराच्या खात्यावर जमा होण्यास किमान तीन महिन्यांचा कालावधी जाणार आहे. केंद्र सरकारच्या कर्जमाफीत मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याचे सांगत कर्जमाफी खऱ्या थकबाकीदार शेतकऱ्यालाच मिळाली पाहिजे, यासाठी सरकार आग्रही असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. कोणत्याही परिस्थितीत कर्जमाफीत बोगसगिरी चालू देणार नसल्याचे संकेत सरकारने दिले आहेत. कर्जमाफीची घोषणा करताना कोणाला लाभ मिळणार हेही सांगितले आहे. याबाबतचे सुस्पष्ट परिपत्रक अद्याप बॅँकांना उपलब्ध झालेले नाही.हे परिपत्रक आल्यानंतर विकास संस्थांकडून निकषपात्र शेतकऱ्यांच्या याद्या मागविल्या जाणार आहेत. या याद्या जिल्हा बॅँकेच्या यंत्रणेकडून तपासल्या जाणार आहेत. त्यानंतर सहकार विभागाच्या पातळीवरून तपासणी होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे याद्या, तपासण्या व अंतिम यादी यांसाठी किमान तीन महिन्यांचा कालावधी जाईल, अशी शक्यता बॅँकिंग क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे. आधी खात्री, मगच पैसे जमा?कर्जमाफीच्या संपूर्ण निकषांचे काटेकोर पालन करणाऱ्या थकबाकीदारांनाच लाभ झाला पाहिजे, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यामुळे निकष व त्यानुसार पात्र शेतकऱ्यांची संख्या अंतिम केली जाणार आहे. यासाठी सहकार खात्याच्या वतीने विशेष तपासणी यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. रिझर्व्ह बॅँकेच्या परिपत्रकाकडे नजराजुन्या ५०० व १००० रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास केंद्रीय अर्थ विभागाने परवानगी दिली आहे; पण आदेश देऊन आठ दिवस उलटले तरी जिल्हा बॅँकांनी पैसे कोठे भरायचे याबाबत स्पष्टता नसल्याने गोंधळ आहे. शनिवार (दि. २४) पासून तीन दिवस रिझर्व्ह बॅँकेला सुटी असल्याने आज, मंगळवारी काहीतरी निर्णय होईल, असा अंदाज असल्याने रिझर्व्ह बॅँकेच्या परिपत्रकाकडे नजरा लागल्या आहेत.