शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

गव्यांचे तुळशी खोऱ्यात वास्तव्य, म्हालसवडे परिसरातील शेतीचे केले प्रचंड नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2021 16:58 IST

तेरसवाडी पैकी मल्लेवाडी येथील लोळजाई पठारावर तर गव्यांची वस्तीच निर्माण झाली आहे. येथून गव्यांचे वेगवेगळे कळप सातेरी महादेव डोंगर व या परिसरातील वाड्या वस्त्या आणि तुळशी खोर्‍यातील शेतकर्‍यांना त्रासदायक ठरू लागले आहेत.

म्हालसवडे : करवीर तालुक्याच्या पश्चिम भागातील तुळशी खोऱ्यात गेल्या काही दिवसापासून रानगव्यांचा वावर वाढला आहे. गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून म्हालसवडे परिसरात गव्यांच्या कळपाने शेतीचे प्रचंड नुकसान केले आहे. तेरसवाडी पैकी मल्लेवाडी येथील लोळजाई पठारावर तर गव्यांची वस्तीच निर्माण झाली आहे. येथून गव्यांचे वेगवेगळे कळप सातेरी महादेव डोंगर व या परिसरातील वाड्या वस्त्या आणि तुळशी खोर्‍यातील शेतकर्‍यांना त्रासदायक ठरू लागले आहेत.म्हालसवडे येथील गायरानात जंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. येथील घनदाट वनराईत गव्यांचे वास्तव्य असलेले शेतकर्‍यांच्या निदर्शनास येत आहे. निकम नाळवा, वरपे नाळवा, पटंगाचा माळ, शिंदे नाळवा इथे रोज रात्री गव्यांचे कळप फिरत आहेत. गव्यांनी येथील शेतातील ऊस व शाळू या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. हेच गवे म्हालसवडे, राशिवडे, सोनाळी व हसुर दुमाला या पंचक्रोशीतील शेतीतून रात्रीचे फिरताना निदर्शनास येत आहेत.यामुळे पिकांना रात्रीच्या वेळेस पाणी पाजावयास जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने या गव्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी नागरिकांतून मागणी होत आहे.कोल्हापुरातही गेल्या दोन दिवसापासून गव्याने ठाण मांडले आहे. भुयेवाडीत तर या बिथरलेल्या गव्याने एकाचा जीवच घेतला तर चौघे जण जखमी झाले. या गव्याच्या मागावर आता वन विभागाची पथके लागली आहेत. मात्र या पथकांनाही या गव्याने चकवा दिला आहे. त्यामुळे शेवट पर्याय म्हणून वन विभागाने आता या गव्यास बेशुद्ध करुन वनक्षेत्रात सोडण्यासाठी कराडहून प्रशिक्षित कर्मचारी शुटर गनसह कोल्हापुरात दाखल झाले आहेत.

"सकाळी लवकर शेतात गेलो असता अचानक एक गवा अंगावर धावून आला. माझ्या शेतातील दहा गुंठे क्षेत्रातील उसाची लागण गव्यांनी पूर्णतः उद्ध्वस्त केली आहे. या गव्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा. - दिलीप वरपे- शेतकरी (म्हालसवडे )

टॅग्स :kolhapurकोल्हापूर