शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

कचरा, दूषित पाण्यासह खड्ड्यांपासून होणार मुक्ती

By admin | Updated: January 2, 2015 00:18 IST

महापालिकेचा पुढाकार : शहरवासीयांचे जगणे होणार सुखकर; रंकाळा घेणार मुक्त श्वास

संतोष पाटील - कोल्हापूरसिग्नलसह रस्ते, काळम्मावाडी पाईपलाईन योजना मार्गी लावण्यात महापालिका प्रशासनाला यश आले. नवीन वर्षात पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीसाठी ‘मैलाचा दगड’ ठरणारे सांडपाणी प्रक्रिया केंद्र, ७२ किलोमीटरच्या ड्रेनेज लाईनसह कचऱ्यापासून मुक्तीसाठी टाकाळा खणीतील लँडफिल साईट ही शहरवासीयांसाठी महापालिकेने दिलेली ‘गुड न्यूज’ ठरणार आहे.होर्डिंग्जना दणकाउच्च न्यायालयात दाखल जनहित याचिका तसेच महाराष्ट्र सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपीकरण प्रतिबंधक कायदा १९९५च्या अनुषंगाने महापालिका प्रशासनाने हद्दीतील अवैध जाहिरात फलक (होर्डिंग) हटविण्याची मोहीम हाती घेतली आहे. कायद्याचा बडगा हाती घेत महापालिकेने कारवाईचा जोर सुरू ठेवण्याचा निर्धार केल्याने नवीन वर्ष शहरासाठी होर्डिंगमुक्तीचे असेल.वाहतुकीला शिस्तशहरातील वाहनांबरोबरच बाहेरगावाहून येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. अरुंद रस्ते व बेशिस्त पार्किंगमुळे शहरातील वाहतूक कासवगतीने सुरू असते. कोंडा ओळ, फोर्ड कॉर्नर, संभाजीनगर, ताराराणी पुतळा, व्हीनस कॉर्नर, सीपीआर चौक, आदी २२ महत्त्वाच्या ठिकाणी सिग्नल व्यवस्था करण्यात महापालिकेला यश आले. येत्या वर्षभरात मल्टिलेव्हल पार्किंगसह अवैध बांधकामाला चाप लावून पार्किंगची व्यवस्था करण्याचे नियोजन प्रशासनाने केल्याचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी स्पष्ट केले.पेड प्रीमियममुळे घरांच्या किमती घटणारकोल्हापूर महापालिकेने दिलेल्या ३३ टक्के पेड-प्रीमियमच्या प्रस्तावास राज्य शासनाने हिरवा कंदील दाखविला. यातील महापालिकेला उत्पन्नातील सर्व हिस्सा देण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षीपासूनच किमान २५ कोटी रुपयांचे उत्पन्न महापालिकेला मिळणार आहे. यामध्ये दरवर्षी किमान १० ते १५ टक्के वाढ अपेक्षित असली तरी घरांच्या किमतींमध्ये मोठा फरक होऊन त्या अधिक स्वस्त होण्याची शक्यता आहे.शाहू स्मारकाची आसदि. ७ जानेवारी २०१४ रोजी कोल्हापुरातील छत्रपती शाहू मिलच्या २७ एकर जागेवर उभारावयाच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या भव्य स्मारकाच्या संकल्पचित्र आराखड्यास तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने मान्यता दिली. हे स्मारक उभारताना छत्रपती शाहू महाराजांचा सामाजिक समतेचा दृष्टिकोन प्रतिबिंबित होईल, याकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे. यासाठीचा २७९ कोटींचा प्राथमिक आराखडा प्रशासनाने तयार केला असून, नव्या सरकारच्या मान्यतेनंतर लवकरच स्मारकाच्या कामास सुरुवात होणार आहे.रंकाळ्यासाठी १०० कोटींचा प्रस्तावराष्ट्रीय सरोवर संवर्धन योजनेतून रंकाळा प्रदूषण मुक्तीसाठी पहिल्या टप्प्यात ८.६६ कोटींचा निधी आला. केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी रंकाळ्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची घोषणा केली आहे. रंकाळ्याला ११८ वर्षे पूर्ण झाल्याने नाशिकच्या धरण सुरक्षा संस्थेकडून (डॅम सेफ्टी आॅर्गनायझेशन) पाहणी करावी, रंकाळ्याच्या नैसर्गिक पुनर्भरण व मजबुतीकरणासाठी १०० कोटींचा निधी उपलब्ध करावा, अशी विनंती महापालिका प्रशासनाने राज्य शासनाकडे केली आहे. नव्या वर्षात रंकाळ्यासाठी निधीचा पाऊस पडणार आहे.१०४ नव्या कोऱ्या बसेसकेंद्र सरकारकडून प्राप्त ४४ कोटी रुपयांच्या निधीच्या जोरावर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची धमनी असलेल्या के.एम.टी.ला ऊर्जितावस्था येणार आहे. १०४ नव्या बसेस मार्च २०१५पर्यंत के.एम.टी.च्या ताफ्यात दाखल होणार आहेत. जीपीएस यंत्रणेसह अत्याधुनिक वर्कशॉप व पिकअप शेडस्मुळे शहरातील के.एम.टी.चा प्रवास अधिक सुखकर होण्यास मदत होणार आहे.खड्डेमुक्त कोल्हापूरसंपूर्ण शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. खड्ड्यांमुळे नागरिकांतून संताप व्यक्त होऊ लागल्यानंतर जाग्या झालेल्या प्रशासनाने शहरातील लहान-मोठे १५० हून अधिक रस्ते करण्याची योजना आखली. गेली साडेतीन वर्षे रखडलेली ३९ किलोमीटर रस्त्यांची १०८ कोटींची नगरोत्थान योजनाही ठेकेदारांच्या प्रतिसादामुळे मार्गी लागली आहे. यामुळे नवीन वर्ष ‘खड्डेमुक्त कोल्हापूर’चे ठरणार आहे.काळम्मावाडी योजनाकेंद्र व राज्य शासनासह महापालिकेचा हिस्सा असलेल्या ४७९ कोटींच्या ५२ किलोमीटरच्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेच्या कामाची सुरुवात खऱ्या अर्थाने नव्या वर्षात होणार आहे. रस्त्याकडेच्या जागेतून पाईपलाईन टाकण्यासाठी जिल्हा परिषद, ‘पीडब्ल्यूडी’कडे परवानगीची मागणी महापालिकेने केली आहे. ठेकेदाराने मागणी केलेल्या स्पायरल वेल्डेड पाईपचा पुरवठा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. डिसेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत योजना पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाईपलाईनच्या कामास नव्या वर्षातच प्रारंभ होणार आहे.पंचगंगा प्रदूषणप्रश्नी सजगताउच्च न्यायालयाने नेमलेल्या दि नॅशनल एन्व्हायर्न्मेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (निरी)ने राधानगरी धरण ते नृसिंहवाडीपर्यंतच्या नऊ ठिकाणांच्या पाण्याची तपासणी केली. न्यायालयाने याप्रश्नी उच्चस्तरीय समिती नेमून दर तीन महिन्यांनी आढावा अहवाल देण्याचे आदेश दिले. परिणामी प्रदूषणास जबाबदार घटकांना चाप बसून याप्रश्नी सजगता निर्माण होण्यास मदत होणार आहे.