शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

गणेशमूर्ती, निर्माल्य दानाचा ‘कोल्हापुरी पॅटर्न’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 03:41 IST

त्यापासून खत निर्मिती केली जाते. गेल्या २५ वर्षांपासून सुरू असलेली ही चळवळ आता कोल्हापूरकरांची उत्सव साजरा करण्याची पद्धती बनली आहे.

कोल्हापूर : वाजत-गाजत आलेल्या गणपती बाप्पांचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करताना पुरोगामी चळवळीचा वारसा लाभलेल्या कोल्हापुरात ३ लाखांवर गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन केले जाते. तर शंभर टक्के निर्माल्य दान केले जाते. त्यापासून खत निर्मिती केली जाते. गेल्या २५ वर्षांपासून सुरू असलेली ही चळवळ आता कोल्हापूरकरांची उत्सव साजरा करण्याची पद्धती बनली आहे.कोल्हापूरला राजर्षी शाहू महाराजांचा सामाजिक, सांस्कृतिक, पुरोगामी विचारांचा वारसा लाभला आहे. जे-जे चांगलं ते अंगीकारत कोल्हापूरकरांनी नवा आदर्श राज्याला दिला. त्याचाच एक भाग म्हणजे पर्यावरणपूरक आणि विधायक गणेशोत्सव आहे.>नागपूर । तलावात विसर्जनाला बंदीपर्यावरण संवर्धनाचा विचार करता शहरातील तलावात विसर्जनाला बंदी घालण्यात आली आहे. महापालिकेच्या १० झोन क्षेत्रात २५० कृत्रिम तलावांची व्यवस्था केली जाणार आहे; सोबतच येथे निर्माल्य संकलन केले जाईल, अशी माहिती मनपा उपायुक्त डॉ. प्रदीप दासरवार यांनी दिली.>अकोला । वºहाडात घरीच विसर्जनअकोलेकरांनी गणेश मूर्तींचे शक्यतोवर घरीच विसर्जन करण्याचे आवाहन महापौर अर्चना मसने यांनी केले आहे. काही ठिकाणी गणेश घाट निर्माण केले जातील. वाशिम व बुलडाण्यात घरोघरीच गणेश विसर्जन करावे, यावर भर दिला जाणार आहे.>अहमदनगर। पालिकेची वाहने सज्जविसर्जनाच्या दिवशी गणेश मूर्ती घेण्यासाठी महापालिकेची वाहने तैनात असतील. या वाहनात मूर्ती विसर्जनासाठी नागरिकांनी द्यायची आहे. या वाहनातून सर्व मूर्ती तलावात विसर्जित केल्या जाणार आहेत. पर्यायी व्यवस्था म्हणून प्रत्येक प्रभागातही विसर्जन कुंड तयार करणार आहे.>कोल्हापूर । पूरग्रस्तांना मदतीचा हातकोल्हापूर शहरसह जिल्ह्यातसात हजारांवर गणेश मंडळे आहेत. गेल्यावर्षी गणेशोत्सवाआधी कोल्हापुरात महापूर आला आणि होत्याचं नव्हतं झालं. मंडळांनी एक रुपयाचीही वर्गणी न घेता साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला. तसेच स्वखर्चातून पूरग्रस्तांना जीवनावश्यक साहित्यांपासून ते त्यांचे घर उभारून देण्यापर्यंतची मदत केली.>औरंगाबाद । विहिरींची सफाई लवकरच पूर्णशहरात दरवर्षी ११ ठिकाणच्या विहिरींमध्ये श्री गणेश विर्सजन व्यवस्था असते. महापालिकेने या विहिरींची सफाई तसेच त्या ठिकाणी मुरुम टाकून रस्ता तयार करणे, लाकडांचे बॅरिगेट्स लावण्यासह इतर कामांच्या निविदा मागविल्या. सर्व विहिरींच्या सफाईचे काम ४४ लाख रुपयांमध्ये देण्यात आले असून ते पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.>नाशिक। नैसर्गिक जलस्रोतांपेक्षा कृत्रिम कुंडांवर यंदाही भरनाशिक महापालिकेने दरवर्षीप्रमाणे यंदाही नैसर्गिक जलस्रोतांपेक्षा कृत्रिम कुंडांवर अधिक भर दिला आहे. नाशिक शहरातील गोदावरी, नंदिनी, वालदेवी या तीन नद्यांवरील ३२ ठिकाणी विसर्जन स्थळे अधिकृत असल्याचे घोषित करण्यात आले आहे. मात्र त्याचबरोबर विविध प्रभागांमध्ये ३५ कृत्रिम कुंड तयार करण्यात येणार आहेत. तसेच विसर्जित मूर्ती दानाचा उपक्रम राबवून नद्या प्रदूषणविरहित ठेवण्यावर भर देण्यात येणार आहे.