शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

गणेशमूर्ती, निर्माल्य दानाचा ‘कोल्हापुरी पॅटर्न’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 03:41 IST

त्यापासून खत निर्मिती केली जाते. गेल्या २५ वर्षांपासून सुरू असलेली ही चळवळ आता कोल्हापूरकरांची उत्सव साजरा करण्याची पद्धती बनली आहे.

कोल्हापूर : वाजत-गाजत आलेल्या गणपती बाप्पांचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करताना पुरोगामी चळवळीचा वारसा लाभलेल्या कोल्हापुरात ३ लाखांवर गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन केले जाते. तर शंभर टक्के निर्माल्य दान केले जाते. त्यापासून खत निर्मिती केली जाते. गेल्या २५ वर्षांपासून सुरू असलेली ही चळवळ आता कोल्हापूरकरांची उत्सव साजरा करण्याची पद्धती बनली आहे.कोल्हापूरला राजर्षी शाहू महाराजांचा सामाजिक, सांस्कृतिक, पुरोगामी विचारांचा वारसा लाभला आहे. जे-जे चांगलं ते अंगीकारत कोल्हापूरकरांनी नवा आदर्श राज्याला दिला. त्याचाच एक भाग म्हणजे पर्यावरणपूरक आणि विधायक गणेशोत्सव आहे.>नागपूर । तलावात विसर्जनाला बंदीपर्यावरण संवर्धनाचा विचार करता शहरातील तलावात विसर्जनाला बंदी घालण्यात आली आहे. महापालिकेच्या १० झोन क्षेत्रात २५० कृत्रिम तलावांची व्यवस्था केली जाणार आहे; सोबतच येथे निर्माल्य संकलन केले जाईल, अशी माहिती मनपा उपायुक्त डॉ. प्रदीप दासरवार यांनी दिली.>अकोला । वºहाडात घरीच विसर्जनअकोलेकरांनी गणेश मूर्तींचे शक्यतोवर घरीच विसर्जन करण्याचे आवाहन महापौर अर्चना मसने यांनी केले आहे. काही ठिकाणी गणेश घाट निर्माण केले जातील. वाशिम व बुलडाण्यात घरोघरीच गणेश विसर्जन करावे, यावर भर दिला जाणार आहे.>अहमदनगर। पालिकेची वाहने सज्जविसर्जनाच्या दिवशी गणेश मूर्ती घेण्यासाठी महापालिकेची वाहने तैनात असतील. या वाहनात मूर्ती विसर्जनासाठी नागरिकांनी द्यायची आहे. या वाहनातून सर्व मूर्ती तलावात विसर्जित केल्या जाणार आहेत. पर्यायी व्यवस्था म्हणून प्रत्येक प्रभागातही विसर्जन कुंड तयार करणार आहे.>कोल्हापूर । पूरग्रस्तांना मदतीचा हातकोल्हापूर शहरसह जिल्ह्यातसात हजारांवर गणेश मंडळे आहेत. गेल्यावर्षी गणेशोत्सवाआधी कोल्हापुरात महापूर आला आणि होत्याचं नव्हतं झालं. मंडळांनी एक रुपयाचीही वर्गणी न घेता साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला. तसेच स्वखर्चातून पूरग्रस्तांना जीवनावश्यक साहित्यांपासून ते त्यांचे घर उभारून देण्यापर्यंतची मदत केली.>औरंगाबाद । विहिरींची सफाई लवकरच पूर्णशहरात दरवर्षी ११ ठिकाणच्या विहिरींमध्ये श्री गणेश विर्सजन व्यवस्था असते. महापालिकेने या विहिरींची सफाई तसेच त्या ठिकाणी मुरुम टाकून रस्ता तयार करणे, लाकडांचे बॅरिगेट्स लावण्यासह इतर कामांच्या निविदा मागविल्या. सर्व विहिरींच्या सफाईचे काम ४४ लाख रुपयांमध्ये देण्यात आले असून ते पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.>नाशिक। नैसर्गिक जलस्रोतांपेक्षा कृत्रिम कुंडांवर यंदाही भरनाशिक महापालिकेने दरवर्षीप्रमाणे यंदाही नैसर्गिक जलस्रोतांपेक्षा कृत्रिम कुंडांवर अधिक भर दिला आहे. नाशिक शहरातील गोदावरी, नंदिनी, वालदेवी या तीन नद्यांवरील ३२ ठिकाणी विसर्जन स्थळे अधिकृत असल्याचे घोषित करण्यात आले आहे. मात्र त्याचबरोबर विविध प्रभागांमध्ये ३५ कृत्रिम कुंड तयार करण्यात येणार आहेत. तसेच विसर्जित मूर्ती दानाचा उपक्रम राबवून नद्या प्रदूषणविरहित ठेवण्यावर भर देण्यात येणार आहे.