शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

गांधीनगरकरांना नियमांचाच विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:24 IST

नागरिकांनी स्वतः शिस्त लावण्याची गरज गांधीनगर : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने संचारबंदी नाइलाजाने जाहीर केली खरी; ...

नागरिकांनी स्वतः शिस्त लावण्याची गरज

गांधीनगर : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने संचारबंदी नाइलाजाने जाहीर केली खरी; पण या निर्णयाला गांधीनगर व्यापारी पेठेत हरताळ फासण्याचे काम सुरू आहे. अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन होऊन नागरिक मुक्त संचार करत आहेत. लोकांना या संसर्ग रोगाचे गांभीर्य लक्षात येईना, असे झाले आहे. सकाळी सात ते अकरा या वेळेत अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. या सेवेच्या नावाखाली अनेक जण विनाकारण बाजारपेठेत फिरताना दिसत आहेत. काही व्यापारी तर अत्यावश्यक सेवेच्या नियमावलीत नसतानाही शटर खाली करून आतून व्यवसाय सुरू ठेवत आहेत. हे चित्र गांधीनगरात अनेक ठिकाणी दिसत असल्याने कोरोना संसर्गाचा धोका वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे कोरोना नियमांना केराची टोपली दाखवीत असलेल्या नागरिकांना पोलिसांचीही भीती राहिली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. सकाळी सिंधू मार्केटच्या व्यापारी लाइन, तसेच शिरू चौक, शाळेच्या ग्राउंडमधील भाजी मंडईत खरेदीसाठी मोठी गर्दी होत असून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. त्यामुळे येथे कोरोना महामारीच्या संसर्गवाढीला आमंत्रण दिले जात असल्याचे चित्र आहे.

चौकट : गांधीनगर ग्रामपंचायतीने सुरुवातीला विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईचा सपाटा लावला होता; पण गेल्या दोन-तीन दिवसांपासून ग्रामपंचायतीची कारवाई सुस्त झाली आहे. त्यामुळे लोक रस्त्यावरून बिनधास्त विना मास्क फिरत आहेत. गांधीनगर पोलिसांनीही मोकाट फिरणाऱ्या वाहनधारकांवर वाहन जप्तीची जुजबी कारवाई सुरू केली. नंतर चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. त्यामुळे याचा फटका अत्यावश्यक कामासाठी बाहेर फिरणाऱ्यांना होत आहे.

फोटो : ०६ गांधीनगर बाजारपेठ

ओळ:- गांधीनगरमध्ये खरेदीसाठी झुंबड उडाली आहे.

२) एका दुकानामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे. (छाया : बाबासाहेब नेर्ले)