शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर सुविधा, कडेकोड सुरक्षा; प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

गडहिंग्लज साखर कारखाना सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:25 IST

* 'ब्रिस्क'चे म्हणणे : कंपनीचा खर्च देण्याची अट निविदेत समाविष्ट करा गडहिंग्लज : शासनाच्या आदेशाप्रमाणे 'ब्रिस्क' कंपनीने आर्थिक अडचणीतील ...

* 'ब्रिस्क'चे म्हणणे : कंपनीचा खर्च देण्याची अट निविदेत समाविष्ट करा

गडहिंग्लज :

शासनाच्या आदेशाप्रमाणे 'ब्रिस्क' कंपनीने आर्थिक अडचणीतील गडहिंग्लज साखर कारखाना ४३ कोटींच्या बदल्यात १० वर्षांसाठी चालवायला घेतला होता. परंतु, कराराची मुदत अद्याप दोन वर्षे बाकी असली तरी यापुढे कंपनीला कारखाना चालविणे शक्य नाही. त्यामुळे पुढील हंगामाच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी कारखान्याचा ताबा तत्काळ संचालक मंडळाकडे द्यावा आणि दबावापोटी व करारापूर्वी माहिती न दिल्यामुळे अत्यावश्यक बाबींसाठी केलेला खर्च मुदतीत कंपनीला देणे निविदेत बंधनकारक करावे, अशी विनंती 'ब्रिस्क'ने पत्रात केली आहे.

पत्रात म्हटले आहे, कंपनीने उत्पादन केलेली ५,८८,०६५ क्विंटल साखर कारखान्याच्या गोदामात आणि रेक्टिफाईड स्पिरीट व मोलॅसिस टाक्यांमध्ये शिल्लक आहे. विक्री होईपर्यंत हा साठा कंपनीकडे राहिल, तो बाहेर नेताना आडकाठी करता येणार नाही. शेतकºयांची एफआरपी, तोडणी-वाहतूक बीले, डिपॉझीट, कमिशन इत्यादी तसेच कारखाना ताब्यात देईपर्यंतचा पगार, महागाई फरक, निवृत्त कामगारांची देणी कराराप्रमाणे पूर्ण भागविण्याची हमी कंपनी घेत आहे.

कंपनीची जी येणे रक्कम शासन निश्चित करणार आहे किंवा कारखाना कंपनीकडून जी येणे रक्कम काढणार आहे. त्यासाठी दोन आठवड्याची मुदत देऊन कंपनी आणि कारखान्याला लेखी म्हणणे देण्यास सांगावे. दोघांच्या पत्राप्रमाणे येणी-देणी अंतिम करून कारखाना चालविण्यासाठी निविदा काढताना कारखाना चालवायला पुढे येणाऱ्याला किंवा स्व:बळावर चालवायला घेणाऱ्या संचालक मंडळाला ही रक्कम मुदतीत देणे बंधनकारक करावे, अशी विनंती कंपनीने केली आहे.

--------------------------------

२) कंपनी जाणारच असल्यास नाईलाज आहे

कारखान्याचे म्हणणे : सर्व देणी देवून कारखाना सोडावा

गडहिंग्लज :

आजअखेर कंपनी व कारखाना प्रशासनात कोणताही वाद अगर मतभेद झालेले नाहीत. त्यामुळे कंपनीने मध्येच सोडून जावे असे कारखान्याचे म्हणणे नाही. कंपनीचे नुकसान व्हावे व कारखाना सोडून जावे, असे कोणतेही चुकीचे वर्तन संचालक मंडळ किंवा कामगारांकडून झालेले नाही. तरीदेखील कंपनीचा कारखाना सोडण्याचा आग्रह असेल तर नाईलाज आहे. शेतकरी, कामगार आणि कारखान्याची सर्व देणी देऊन कंपनीने कारखाना सोडावा, असे लेखी म्हणणे कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे व उपाध्यक्ष संग्रामसिंह नलवडे यांनी दिले आहे.

पत्रात म्हटले आहे, कंपनीकडून कारखान्याला ४३ कोटीपैकी ३ कोटी २६ लाख, कार्यालयीन खर्चासाठीचे १ कोटी २५ लाख ५० हजार येणे आहे. कामगार सोसायटीचे २ कोटी, पहिल्या हंगामात घेतलेल्या कारखान्याच्या स्टोअरमधील साहित्य व ऊसबिलातील कपातीचे मिळून ६३ लाख येणी आहे.

सभासदांना दिलेल्या सवलतीच्या साखरेमुळे १३ कोटी २८ लाखाचे नुकसान झाल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. परंतु, तत्कालीन संचालक मंडळ व कंपनीत झालेल्या चर्चेनुसार अन्य कारखान्यांप्रमाणेच कंपनीने ही साखर दिली आहे. त्या साखरेच्या दरातील फरकाची रक्कम देण्यासंदर्भात कोणताही पत्रव्यवहार झालेला नाही. २०१३ पूर्वी प्रदूषण मंडळाची क्लोझर नोटीस कारखान्याला कधीही आलेली नाही. प्रदूषण नियंत्रणासाठी व मशीनरीच्या आधुनिकीकरणाची माहिती कंपनीने कारखान्याला दिलेली नाही. त्यामुळे प्रदूषण नियंत्रणाच्या ८ कोटी ८२ लाख व मशिनरी आधुनिकीकरणाच्या ९ कोटी ३७ लाखाच्या खर्चाला कारखाना जबाबदार नाही. करारावेळी बाजूला काढून ठेवलेल्या १७ कोटी ९३ लाखाच्या ड्यूडीलीजन्स रक्कमेतील युनियन बँकेचे बेसलडोस कर्ज २ कोटी ४१ लाख व स्टेट बँकेचे ५ कोटी ५० लाख मिळून ७ कोटी ९१ लाख कर्जाची परतफेड केल्याबद्दल २ वर्षे मुदत वाढवून देण्याचा संचालक मंडळाचा निर्णय झाला आहे. परंतु, त्याबाबत कंपनीचे उत्तर आलेले नाही, असेही पत्रात म्हटले आहे.

यावेळी कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे, उपाध्यक्ष संग्रामसिंह नलवडे, संचालक सतीश पाटील, प्रकाश पताडे, अमर चव्हाण, विद्याधर गुरबे, बाळकृष्ण परीट, 'ब्रिस्क' कंपनीचे संचालक चंद्रकांत गायकवाड, सरव्यवस्थापक वसंत गुजर, प्रशासन अधिकारी श्याम हरळीकर, कारखान्याचे वित्त व्यवस्थापक बापू रेडेकर आदी उपस्थित होते.

-----------------------------------------

*

चौकट

२०१३-१४ पासून गडहिंग्लज साखर कारखाना 'ब्रिस्क' कंपनीला सहयोग तत्वावर १० वर्षांसाठी चालवायला देण्यात आला आहे. परंतु, पोषक वातावरण नसल्याच्या कारणावरून कंपनीने मुदत संपण्यापूर्वीच कारखाना सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भात सहकार खात्याचे अप्पर सचिव अरविंदकुमार यांच्यासमोर बुधवारी (३१) दुसरी सुनावणी झाली. यावेळी कंपनी व कारखान्याने आपली बाजू लेखी पत्राद्वारे मांडली.

--------------------------------

* गडहिंग्लज कारखाना फोटो : ३१०३२०२१-गड-०५