शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

ग्रा. पं. निवडणुकीत विरोधकांना ताकद दाखवा-- प्रकाश आवाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 00:21 IST

हुपरी : काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांना बाजूला ठेवून कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडीची ध्येयधोरणे मान्य असणाºया इतर कोणत्याही समविचारी पक्षाशी व गटांशी स्थानिक पातळीवर युती

ठळक मुद्दे रेंदाळ, यळगूड, पट्टणकोडोलीतील कार्यकर्त्यांशी चर्चागेल्या सहा महिन्यांपासून काँग्रेस पक्षाचे काम थांबविले आहे.काँग्रेसच्या जिल्हा पदाधिकाºयांकडून केवळ व्यक्तिद्वेषातून पदोपदी सापत्नभावाची वागणूक

लोकमत न्यूज नेटवर्कहुपरी : काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांना बाजूला ठेवून कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडीची ध्येयधोरणे मान्य असणाºया इतर कोणत्याही समविचारी पक्षाशी व गटांशी स्थानिक पातळीवर युती करून हातकणंगले व शिरोळ तालुक्यांतील सर्वच ग्रामपंचायतींच्या निवडणुका पूर्ण ताकदीनिशी लढवून विरोधकांना आपली राजकीय ताकद दाखवून द्या, असे आवाहन जवाहर साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी गुरुवारी केले.

ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. २२ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर जवाहर कारखाना परिसरातील रेंदाळ, यळगूड, तळंदगे, पट्टणकोडोली, इंगळी, रांगोळी आदी गावांतील आवाडे गटाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी माजी मंत्री प्रकाश आवाडे, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विलासराव गाताडे यांची भेट घेऊन स्थानिक पातळीवरती करावयाच्या आघाड्या व युतीबाबत यावेळी सविस्तर चर्चा केली.

माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे व माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी गेल्या ४० वर्षांपासून काँग्रेस पक्षात कार्यरत राहून गावोगावी पक्ष वाढविण्यासाठी परिश्रम घेतले. राजकीय, सहकार, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत राहून अनेक संस्था उभारून त्या यशस्वीपणे चालवून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरती नावलौकिक प्राप्त केला आहे. आवाडे म्हटले की काँग्रेस असे जणू समीकरणच जिल्ह्याच्या पूर्व भागात गेली अनेक वर्षे निर्माण झाले होते. इतका नावलौकिक प्राप्त केलेल्या आवाडे पिता-पुत्रांना काँग्रेसच्या जिल्हा पदाधिकाºयांकडून केवळ व्यक्तिद्वेषातून पदोपदी सापत्नभावाची वागणूक देण्यात येत आहे. त्यामुळे माजी मंत्री आवाडे यांनी गेल्या सहा महिन्यांपासून काँग्रेस पक्षाचे काम थांबविले आहे.जिल्हा ताराराणी विकास आघाडीची स्थापना करानुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आपल्या आघाडीच्या माध्यमांतून सवतासुभा मांडून काँग्रेस पक्षाबरोबरच विरोधकांनाही आपल्या राजकीय शक्तीची जाणीव करून दिली आहे. यापुढेही अशाच पद्धतीने नव्या उमेदीने कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे व गावोगावच्या ग्रामपंचायतींवर आपल्या कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडीची सत्ता स्थापन करावी, असे आवाहन यावेळी माजी मंत्री आवाडे यांनी केले.